शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

बोंडअळीच्या सावटातही कपाशीचा पेरा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:03 IST

गतवर्षी संपूर्ण विदर्भात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केली. तसेच कापूस वेचणीचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. असे असतानाही यावर्षी पुन्हा शेतकºयांनी कपाशी पिकाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे वाढलेल्या क्षेत्रावरून दिसून येत आहे.

ठळक मुद्दे९९.५० टक्के पेरणी पूर्ण : सोयाबीनचे क्षेत्र घटले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गतवर्षी संपूर्ण विदर्भात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केली. तसेच कापूस वेचणीचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. असे असतानाही यावर्षी पुन्हा शेतकºयांनी कपाशी पिकाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे वाढलेल्या क्षेत्रावरून दिसून येत आहे.जिल्ह्यात २६ जुलैपर्यंत ९९.५० टक्के क्षेत्रावर कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. खरीप २०१८-१९ मध्ये २ लाख ४ हजार २०३ क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. नियोजित क्षेत्र २ लाख २६ हजार ३६३ निश्चित करण्यात आले होते. आर्वी तालुक्यात २४ हजार ७९८, आष्टी तालुक्यात १० हजार ७८४, कारंजा तालुक्यात २३ हजार ९१०, वर्धा तालुक्यात २९ हजार २००, सेलू तालुक्यात २७ हजार ७५, देवळी तालुक्यात २८ हजार ६४६, हिंगणघाट तालुक्यात ४३ हजार ३९८, समुद्रपूर तालुक्यात ३८ हजार ४१८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. एकूण कपाशीचे क्षेत्र २ लाख २५ हजार २२९ हेक्टर असून आतापर्यंत ९९.५० टक्के हेक्टरवर कपाशीची लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याच्या विविध भागात कपाशीवर रोग आल्याने उत्पादनात घट झाली होती. तसेच किडीमुळे कापूस वेचणीच्या कामावर महिला मजूर येण्यास तयार होत नव्हते. यामुळे गावाबाहेरून मजूर बोलावून अनेक शेतकºयांनी कापसाची वेचणी केली. क्विंटलमागे किमान ६०० रुपये अतिरिक्त खर्च शेतकºयांना कापूस वेचणीसाठी आला. कापसाचा भाव ५ हजार ५०० च्या वर गेला नाही. त्यामुळे कापूस शेती तोट्यात राहिली. यंदाही किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे कृषी विभागाने उन्हाळ्यातच जाहीर केले असतानाही कापूस क्षेत्र खरीप घटलेले नाही. कापसाचा पेरा वाढलेलाच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी सोयाबीनही मोठ्या प्रमाणावर होते. यंदामात्र सोयाबीनचे क्षेत्र घटल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे नियोजन क्षेत्र १ लाख १७ हजार निश्चित करण्यात आले होते. आर्वी तालुक्यात १२ हजार ३५७, आष्टी ८ हजार ६७४, कारंजात १२ हजार १५०, वर्धा १८ हजार ८३५, सेलू ७ हजार ९७०, देवळी १६ हजार ६५५, हिंगणघाट १४ हजार ८५६, समुद्रपूर २० हजार ५४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. २६ जुलैपर्यंत ९५.७६ टक्के लागवड पूर्ण झाली. सोयाबीनकडे वळलेला शेतकरी गतवर्षी कापूस पिकाकडे होता. यंदा हे क्षेत्र घटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविली जात होती. मात्र, कापसाचा पेरा कमी झाल्याचे दिसून येत नाही.निवडणुकीच्या वर्षात दरवाढीची आशा२०१९ हे देशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे कापसाला निश्चितपणे जादा भाव ठेवण्यासाठी सरकारी धोरण कारणीभूत ठरतील. अशी आशा शेतकºयांना आहे. त्यामुळे हमी भाव लक्षात घेऊन शेतकºयांनी कापूस पेरणीकडे आपला कल दाखविला आहे. तसेच राज्य सरकार कापूस उत्पादकांना काही सवलतीच्या योजना देतील त्यामुळे भाव वाढेल, अशी आशा असल्याने कापसाचा पेरा वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती