राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : सीसीआयची खरेदी बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून होता. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव कापूस कवडीमोल भावात विकावा लागला. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार आर्वीतील चार जिनिंगमध्ये सीसीआयच्या कापूस खरेदीला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी गाड्या आणल्याने शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी उसळली होती.सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने अनेक गरजू शेतकऱ्यांना कापूस खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागला. तर काही शेतकऱ्यांनी कापसाला भाव नसल्याने कापसाची घरीच साठवणूक केली. पाच दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी आर्वीत सीसीआयची कापूस केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोमवारी आर्वीतील चार जिनिंग-प्रेसिंगमध्ये सीसीआयची खरेदी सुरू करण्यात आली.सीसीआय कापूस खरेदी करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांना मिळाली असता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस गाड्या विक्रीसाठी आणल्या. पावसाचे दिवस असल्याने कापूस ओला होवून नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापूस भरलेल्या गाड्या जिनिंगमध्ये कापूस गाड्या विक्रीसाठी नेल्या. यापूर्वीच शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची नोंदणी सीसीआयकडे केली होती.कापूस गाड्यांची लांबलचक रांगसीसीआयची कापूस खरेदी सुरू झाल्याचे शेतकऱ्यांना माहिती पडताच. सोमवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी सहकार सभागृहाच्या परिसरात कापूस गाड्या लावल्या होत्या. गाड्यांची चांगलीच लांबलचक रांग लागली होती. त्यामुळे खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची मोठी गर्दी उसळली होती.
गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनाकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी होवू नये, म्हणून कापूस गाड्या आणलेल्या शेतकऱ्यांना त्यांची वाहने येथील सहकार सभागृहाच्या आवारात ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. तेथे शेतकऱ्यांच्या कापूस गाड्यांची नोंदणी करून ग्रेडेशन करून त्यानंतरच चार जिनिंग-प्रेसिंगमध्ये कापूस गाड्या पाठविण्यात आल्या.