शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कापसाने दिला दगा, दोनच वेच्यात झाली उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 15:44 IST

विविध रोगांचा परिणाम कापूस शेतीवर मोठ्या प्रमाणात झाला असून शेतीचा खर्चही निघाला नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याची चिंता कास्तकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

ठळक मुद्देरब्बीसाठी तयारी; पण पाटसऱ्यांची व्यवस्थाच नाही

वर्धा : विदर्भाचे पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कुठे एक तर, कुठे दोनच वेच्यात उलंगवाडी झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. यात खर्चही निघाला नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याची चिंता कास्तकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

कापूस हा विदर्भ पट्ट्यातील प्रमुख पीक मानला जात आहे; पण गेल्या काही वर्षांपासून सरकी आणि रोग यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. नवे नवे संकट त्याचा पिच्छा सोडायला तयार नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. देशाचा आर्थिक कणा शेती नी कास्तकार असताना पद्धतशीरपणे देशोधडीला लावण्याचा कुटिल डाव दिसून येत आहे; पण मार्ग नसल्याने शेतीशिवाय करणार तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, हे मात्र खरे. ज्या कापसाने तारले तोच आज अडचणींचा ठरत आहे. सेवाग्राम ते हमदापूर या पट्ट्यात अशी विदारक स्थिती पाहावयास मिळत आहे.

चानकी येथील अरविंद पन्नासे यांची दोनच वेच्यातच उलंगवाडी झाली. एकरी एवरेच चार ते पाच असा आहे. अशीच काहीशी स्थिती पंढरीनाथ राऊत, गणेश राऊत, माणिक ढुमने तसेच भोसा येथील गणेश कोचे यांची आठ एकरात पराटी होती. एकच वेचा झाला. पात्या आहे, पण बोंडाचा पत्ताच नाही. बोंड अळीचीही शक्यता वर्तविली आहे.

कापूस वेच्याचे वेगवेगळ्या ठिकाणी १५० ते २०० मनकी असा भाव सुरू आहे. यातही वेचाच होत नसल्याने काही वाढून द्या, अशी गळ मजूर घालीत आहेत. कापसाला भाव बरा आहे; पण उत्पादनच कमी असल्याने भाव राहून फरक काय पडणार. एवढी मेहनत आणि पैसा मातीत घालून हातात काय येणार हा प्रश्र्न अनुत्तरित आहेत.

शेतकरी कठानाची तयारी करीत आहेत. यात सेवाग्राम ते हमदापूरपर्यंत उपकालवे, पाटसऱ्या आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यास रब्बीसाठी फायदा. होणार यात शंका नसून या वेळी तर दोन्ही धरणे फुल्ल आहे आणि पाणी सोडणार; पण उपकालवे व पाटसऱ्यांची अवस्था वाईट आहे. खोलीकरण आणि झुडपे काढणे, बांधा टाकते अशी कामे पावसाळा संपल्याबरोबर करणे आवश्यक आहे. पण अद्यापही झालेले नसल्याने पाणी चक्क सैरावैरा पळते. यात वाया जाणे, नाले भरणे, शेताचे नुकसान होण्याचे प्रकार घडतात, अशी माहिती देऊळगावचे सरपंच अश्वजित चाटे, चानकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पन्नासे, बोंडसूला येथील दिलीप जरोदे यांनी दिली असून, तत्काळ व्यवस्था करण्याची मागणी केलेली आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती