शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कापसाने दिला दगा, दोनच वेच्यात झाली उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 15:44 IST

विविध रोगांचा परिणाम कापूस शेतीवर मोठ्या प्रमाणात झाला असून शेतीचा खर्चही निघाला नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याची चिंता कास्तकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

ठळक मुद्देरब्बीसाठी तयारी; पण पाटसऱ्यांची व्यवस्थाच नाही

वर्धा : विदर्भाचे पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कुठे एक तर, कुठे दोनच वेच्यात उलंगवाडी झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. यात खर्चही निघाला नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याची चिंता कास्तकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

कापूस हा विदर्भ पट्ट्यातील प्रमुख पीक मानला जात आहे; पण गेल्या काही वर्षांपासून सरकी आणि रोग यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. नवे नवे संकट त्याचा पिच्छा सोडायला तयार नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. देशाचा आर्थिक कणा शेती नी कास्तकार असताना पद्धतशीरपणे देशोधडीला लावण्याचा कुटिल डाव दिसून येत आहे; पण मार्ग नसल्याने शेतीशिवाय करणार तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, हे मात्र खरे. ज्या कापसाने तारले तोच आज अडचणींचा ठरत आहे. सेवाग्राम ते हमदापूर या पट्ट्यात अशी विदारक स्थिती पाहावयास मिळत आहे.

चानकी येथील अरविंद पन्नासे यांची दोनच वेच्यातच उलंगवाडी झाली. एकरी एवरेच चार ते पाच असा आहे. अशीच काहीशी स्थिती पंढरीनाथ राऊत, गणेश राऊत, माणिक ढुमने तसेच भोसा येथील गणेश कोचे यांची आठ एकरात पराटी होती. एकच वेचा झाला. पात्या आहे, पण बोंडाचा पत्ताच नाही. बोंड अळीचीही शक्यता वर्तविली आहे.

कापूस वेच्याचे वेगवेगळ्या ठिकाणी १५० ते २०० मनकी असा भाव सुरू आहे. यातही वेचाच होत नसल्याने काही वाढून द्या, अशी गळ मजूर घालीत आहेत. कापसाला भाव बरा आहे; पण उत्पादनच कमी असल्याने भाव राहून फरक काय पडणार. एवढी मेहनत आणि पैसा मातीत घालून हातात काय येणार हा प्रश्र्न अनुत्तरित आहेत.

शेतकरी कठानाची तयारी करीत आहेत. यात सेवाग्राम ते हमदापूरपर्यंत उपकालवे, पाटसऱ्या आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यास रब्बीसाठी फायदा. होणार यात शंका नसून या वेळी तर दोन्ही धरणे फुल्ल आहे आणि पाणी सोडणार; पण उपकालवे व पाटसऱ्यांची अवस्था वाईट आहे. खोलीकरण आणि झुडपे काढणे, बांधा टाकते अशी कामे पावसाळा संपल्याबरोबर करणे आवश्यक आहे. पण अद्यापही झालेले नसल्याने पाणी चक्क सैरावैरा पळते. यात वाया जाणे, नाले भरणे, शेताचे नुकसान होण्याचे प्रकार घडतात, अशी माहिती देऊळगावचे सरपंच अश्वजित चाटे, चानकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पन्नासे, बोंडसूला येथील दिलीप जरोदे यांनी दिली असून, तत्काळ व्यवस्था करण्याची मागणी केलेली आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती