शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कापसाने दिला दगा, दोनच वेच्यात झाली उलंगवाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 15:44 IST

विविध रोगांचा परिणाम कापूस शेतीवर मोठ्या प्रमाणात झाला असून शेतीचा खर्चही निघाला नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याची चिंता कास्तकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

ठळक मुद्देरब्बीसाठी तयारी; पण पाटसऱ्यांची व्यवस्थाच नाही

वर्धा : विदर्भाचे पांढरे सोने अशी ओळख असलेल्या कापसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कुठे एक तर, कुठे दोनच वेच्यात उलंगवाडी झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. यात खर्चही निघाला नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याची चिंता कास्तकारांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

कापूस हा विदर्भ पट्ट्यातील प्रमुख पीक मानला जात आहे; पण गेल्या काही वर्षांपासून सरकी आणि रोग यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. नवे नवे संकट त्याचा पिच्छा सोडायला तयार नाही. शेतीशिवाय पर्याय नाही. देशाचा आर्थिक कणा शेती नी कास्तकार असताना पद्धतशीरपणे देशोधडीला लावण्याचा कुटिल डाव दिसून येत आहे; पण मार्ग नसल्याने शेतीशिवाय करणार तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे, हे मात्र खरे. ज्या कापसाने तारले तोच आज अडचणींचा ठरत आहे. सेवाग्राम ते हमदापूर या पट्ट्यात अशी विदारक स्थिती पाहावयास मिळत आहे.

चानकी येथील अरविंद पन्नासे यांची दोनच वेच्यातच उलंगवाडी झाली. एकरी एवरेच चार ते पाच असा आहे. अशीच काहीशी स्थिती पंढरीनाथ राऊत, गणेश राऊत, माणिक ढुमने तसेच भोसा येथील गणेश कोचे यांची आठ एकरात पराटी होती. एकच वेचा झाला. पात्या आहे, पण बोंडाचा पत्ताच नाही. बोंड अळीचीही शक्यता वर्तविली आहे.

कापूस वेच्याचे वेगवेगळ्या ठिकाणी १५० ते २०० मनकी असा भाव सुरू आहे. यातही वेचाच होत नसल्याने काही वाढून द्या, अशी गळ मजूर घालीत आहेत. कापसाला भाव बरा आहे; पण उत्पादनच कमी असल्याने भाव राहून फरक काय पडणार. एवढी मेहनत आणि पैसा मातीत घालून हातात काय येणार हा प्रश्र्न अनुत्तरित आहेत.

शेतकरी कठानाची तयारी करीत आहेत. यात सेवाग्राम ते हमदापूरपर्यंत उपकालवे, पाटसऱ्या आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळाल्यास रब्बीसाठी फायदा. होणार यात शंका नसून या वेळी तर दोन्ही धरणे फुल्ल आहे आणि पाणी सोडणार; पण उपकालवे व पाटसऱ्यांची अवस्था वाईट आहे. खोलीकरण आणि झुडपे काढणे, बांधा टाकते अशी कामे पावसाळा संपल्याबरोबर करणे आवश्यक आहे. पण अद्यापही झालेले नसल्याने पाणी चक्क सैरावैरा पळते. यात वाया जाणे, नाले भरणे, शेताचे नुकसान होण्याचे प्रकार घडतात, अशी माहिती देऊळगावचे सरपंच अश्वजित चाटे, चानकीचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पन्नासे, बोंडसूला येथील दिलीप जरोदे यांनी दिली असून, तत्काळ व्यवस्था करण्याची मागणी केलेली आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती