शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

८४ हेक्टरवरच कपाशीची लागवड

By admin | Updated: June 11, 2017 00:46 IST

कापूस उत्पादकांचे क्षेत्र म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणीचे नियोजन करण्यात येते.

मान्सूनपूर्व पेरणीकडे शेतकऱ्यांची पाठ : दमदार पावसाशिवाय पेरणीची घाई नाही लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कापूस उत्पादकांचे क्षेत्र म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व पेरणीचे नियोजन करण्यात येते. बेभरोशाच्या पावसामुळे या पेरणीकडे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांची पाठ होत असल्याचे दिसत आहे. मान्सूनचा पाऊस येण्याचे संकेत असताना या खरीपात मान्सूनपूर्व पेरणीच्या नावावर केवळ ८४ हेक्टर म्हणजेचे २१० एकरावर कपाशीची लागवड झाल्याची नोंद झाली आहे. गत वर्षी पाऊस येण्यापूर्वी हा पेरा ६५२ हेक्टरवर झाला होता. कापसाचे भरघोस उत्पादन घेण्याकरिता कापूस उत्पादकांकडून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड करण्यात येत होती. दिवसेंदिवस निसर्गाचा लहरीपणा वाढत असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. परिणामी हळूहळू या मान्सूनपूर्व पेरणीकडे शेतकऱ्यांची पाठ होत असल्याचे दिसून आले. यंदाच्या खरीपात दोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्या नियोजनात करण्यात आला आहे. यात मान्सूनपूर्व पेरणी होईल, असे कृषी विभागाला वाटत असताना याकडे मात्र शेतकऱ्यांची पाठच होत असल्याचे झालेल्या नोंदीवरून दिसून येत आहे. गत हंगामाच्या तुलनेत यंदा यात घट होणार असल्याचे संकेत कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. शासनाच्या विविध योजनाच्या आधारावर जिल्ह्यात ओलिताची सोय वाढत आहे. मध्यंतरी या ओलिताच्या आधारावर शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड झाली होती; मात्र उन्हाचा पारा वाढून पाऊस येण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. यामुळे गत दोन-तीन वर्षांपासून या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ केल्याचे दिसून आले आहे. यामागे निसर्गाचा असमतोल एक कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मोड येण्याची शक्यता सध्या आर्थिक परिस्थितीने खचलेला शेतकरी कोणताही धोका पत्करण्याच्या तयारीत नाही. यामुळे बऱ्याच भागात ओलिताची सोय असतानाही पाऊस आल्याशिवाय लागवड नाही, अशी भूमिका घेताना शेतकरी दिसत आहे. गत वर्षी कपाशीची मान्सूनपूर्व लागवड करून पाऊस उशिरा आल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना मोड आल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यंदा दुबार पेरणी करण्याची शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नसल्याने याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. सर्वाधिक लागवड आर्वी तालुक्यात यंदाच्या खरीपात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड जिल्ह्यात सुरू आहे. कापूस उत्पादकांचा पट्टा असलेल्या आर्वी भागात सर्वाधिक क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली आहे. हे क्षेत्र ४४ हेक्टरवर आहे. तर देवळी तालुक्यात २५ आणि वर्धा तालुक्यात १५ हेक्टरवर मान्सूनपूर्व कपाशीची लागवड झाल्याची नोंद जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात झाल्याची माहिती आहे. ही लगवड गत वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे गत वर्षीच्या नोंदीवरून दिसत आहे.