शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

रोखीच्या आशेत वर्ध्यातील कापूस उत्पादकांची हमीभावाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 16:29 IST

कापूस उत्पादकांची होत असलेली लूट थांबावी याकरिता पणन महासंघाचे वर्धा जिल्ह्यात तीन ठिकाणी संकलन केंद्र सुरू झाले आहे. मात्र या केंद्रांकडे कापूस उत्पादकांची पाठ झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशासकीय कापूस खरेदी केंद्रावर मुहूर्तालाही कापसाची आवक नाही शासकीय खरेदी शून्यच राहण्याची शक्यता  व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त नाही तर त्याच्या आसपासच दर मिळणार आहे. यात व्यापाऱ्यांना कापूस दिल्यास चुकारे रोखीने मिळण्याची शक्यता आहे. १०० ते ५०० रुपयांच्या अधिक लाभाकरिता शेतकरी शासकीय कापूस संकल

रूपेश खैरी ।आॅनलाईन लोकमतवर्धा : कापूस उत्पादकांची होत असलेली लूट थांबावी याकरिता पणन महासंघाचे वर्धा जिल्ह्यात तीन ठिकाणी संकलन केंद्र सुरू झाले आहे. मात्र या केंद्रांकडे कापूस उत्पादकांची पाठ झाल्याचे दिसत आहे. या केंद्रावर मुहूर्तालाही कापूस आला नसल्याचे वास्तव आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून रोखीच्या आशेत हमीभावाकडे पाठ केल्याचे दिसत आहे.कापसाच्या खरेदीच्या अनेक जुन्या प्रचलीत पद्धती आहेत. यातील खेडा आणि लावण पद्धत आजही वापरल्या जात आहे. यातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे़; पण आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांकडून याचा विचार होत नाही. शेतकऱ्यांच्या याच परिस्थितीचा लाभ घेत अनेक व्यापाऱ्यांनी प्रारंभी कापसाच्या दर्जाचे कारण काढत पड्या दरात कापूस खरेदी केली. आता येत असलेला कापूस चांगल्या प्रतीचा असून व्यापाऱ्यांकडून त्याला हमीभावाच्या आसपास दर मिळत आहे. वर्धेत कापसाचा ४ हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. शिवाय चुकारेही रोख किंवा दोन दिवसाच्या बोलीने मिळत असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापूस देणे पसंत केले आहे. परिणामी शासकीय खरेदी केंद्र ओस पडले आहे.काही शेतकऱ्यांकडून कापसाचे दर वाढतील अशी आशा केली जात आहे. परंतु जागतीक बाजाराची स्थिती पाहता तसे होण्याचे संकेत नाही. गत वर्षी कापूस साडेपाच हजारांवर पोहोचला होता. त्यावेळी सरकीचे दर २,७०० रुपये क्विंटल होते. यंदा हे दर प्रती क्विंटल हजार रुपयांची घसरले आहे. यामुळे कापसाचे दर वाढण्याची शाश्वती नाही. यामुळे व्यापाऱ्यांकडून यंदा कपाशीला चार हजाराच्या आसपासच दर मिळण्याची शक्यता आहे. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावातच कापूस विकाचा लागणार आहे. यातही चुकारे मिळण्याकरिता करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव टाळण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात तीन शासकीय कापूस संकलन केंद्रमहासंघाच्यावतीने जिल्ह्यात तळेगाव (श्यामजीपंत), कारंजा आणि खरांगणा (मोरांगणा) येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. यातील खरांगणा सोडल्यास कारंजा आणि तळेगाव हा भाग बागायतदार शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखल्या जात आहे. यामुळे येथे सुरू झालेल्या शासकीय केंद्रावर कापूस जाण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी या तिनही केंद्रावर खरेदीच्या मुहूर्तालाही कापूस मिळाला नसल्याचे दिसून आले आहे.शेतमालाला वाढीव दर मिळणे कठीण आहे. शेतमालाल दर मिळण्याकरिता शासनाने आयात होत असलेल्या शेतमालावर हमीभावासोबत ५० टक्के नफा देण्याची गरज आहे. हा नियम लावताना होणाऱ्या कितीपेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी होणार नाही याची दक्षता घ्यावी. हा नियम शासनाच्यावतीने साखरेकरिता लावल्या जात आहे. इतर देशात साखरेची किंमत २४ ते २५ रुपये असताना भारतात हिच साखर ४० ते ४२ रुपये किलोच्या दराने विकली जात आहे. शासनाकडून साखरेवर हा निर्णय लागू होतो तर इतर शेतमालावर का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक, नागपूर.

टॅग्स :Farmerशेतकरी