शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रोखीच्या आशेत वर्ध्यातील कापूस उत्पादकांची हमीभावाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 16:29 IST

कापूस उत्पादकांची होत असलेली लूट थांबावी याकरिता पणन महासंघाचे वर्धा जिल्ह्यात तीन ठिकाणी संकलन केंद्र सुरू झाले आहे. मात्र या केंद्रांकडे कापूस उत्पादकांची पाठ झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशासकीय कापूस खरेदी केंद्रावर मुहूर्तालाही कापसाची आवक नाही शासकीय खरेदी शून्यच राहण्याची शक्यता  व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा जास्त नाही तर त्याच्या आसपासच दर मिळणार आहे. यात व्यापाऱ्यांना कापूस दिल्यास चुकारे रोखीने मिळण्याची शक्यता आहे. १०० ते ५०० रुपयांच्या अधिक लाभाकरिता शेतकरी शासकीय कापूस संकल

रूपेश खैरी ।आॅनलाईन लोकमतवर्धा : कापूस उत्पादकांची होत असलेली लूट थांबावी याकरिता पणन महासंघाचे वर्धा जिल्ह्यात तीन ठिकाणी संकलन केंद्र सुरू झाले आहे. मात्र या केंद्रांकडे कापूस उत्पादकांची पाठ झाल्याचे दिसत आहे. या केंद्रावर मुहूर्तालाही कापूस आला नसल्याचे वास्तव आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून रोखीच्या आशेत हमीभावाकडे पाठ केल्याचे दिसत आहे.कापसाच्या खरेदीच्या अनेक जुन्या प्रचलीत पद्धती आहेत. यातील खेडा आणि लावण पद्धत आजही वापरल्या जात आहे. यातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे़; पण आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांकडून याचा विचार होत नाही. शेतकऱ्यांच्या याच परिस्थितीचा लाभ घेत अनेक व्यापाऱ्यांनी प्रारंभी कापसाच्या दर्जाचे कारण काढत पड्या दरात कापूस खरेदी केली. आता येत असलेला कापूस चांगल्या प्रतीचा असून व्यापाऱ्यांकडून त्याला हमीभावाच्या आसपास दर मिळत आहे. वर्धेत कापसाचा ४ हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे. शिवाय चुकारेही रोख किंवा दोन दिवसाच्या बोलीने मिळत असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कापूस देणे पसंत केले आहे. परिणामी शासकीय खरेदी केंद्र ओस पडले आहे.काही शेतकऱ्यांकडून कापसाचे दर वाढतील अशी आशा केली जात आहे. परंतु जागतीक बाजाराची स्थिती पाहता तसे होण्याचे संकेत नाही. गत वर्षी कापूस साडेपाच हजारांवर पोहोचला होता. त्यावेळी सरकीचे दर २,७०० रुपये क्विंटल होते. यंदा हे दर प्रती क्विंटल हजार रुपयांची घसरले आहे. यामुळे कापसाचे दर वाढण्याची शाश्वती नाही. यामुळे व्यापाऱ्यांकडून यंदा कपाशीला चार हजाराच्या आसपासच दर मिळण्याची शक्यता आहे. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभावातच कापूस विकाचा लागणार आहे. यातही चुकारे मिळण्याकरिता करावी लागणारी प्रतीक्षा यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव टाळण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात तीन शासकीय कापूस संकलन केंद्रमहासंघाच्यावतीने जिल्ह्यात तळेगाव (श्यामजीपंत), कारंजा आणि खरांगणा (मोरांगणा) येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले आहे. यातील खरांगणा सोडल्यास कारंजा आणि तळेगाव हा भाग बागायतदार शेतकऱ्यांचा भाग म्हणून ओळखल्या जात आहे. यामुळे येथे सुरू झालेल्या शासकीय केंद्रावर कापूस जाण्याची शक्यता कमीच आहे. परिणामी या तिनही केंद्रावर खरेदीच्या मुहूर्तालाही कापूस मिळाला नसल्याचे दिसून आले आहे.शेतमालाला वाढीव दर मिळणे कठीण आहे. शेतमालाल दर मिळण्याकरिता शासनाने आयात होत असलेल्या शेतमालावर हमीभावासोबत ५० टक्के नफा देण्याची गरज आहे. हा नियम लावताना होणाऱ्या कितीपेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी होणार नाही याची दक्षता घ्यावी. हा नियम शासनाच्यावतीने साखरेकरिता लावल्या जात आहे. इतर देशात साखरेची किंमत २४ ते २५ रुपये असताना भारतात हिच साखर ४० ते ४२ रुपये किलोच्या दराने विकली जात आहे. शासनाकडून साखरेवर हा निर्णय लागू होतो तर इतर शेतमालावर का नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.- विजय जावंधिया, कृषी अभ्यासक, नागपूर.

टॅग्स :Farmerशेतकरी