शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

कापसाला बोनस व सोयाबीनला एकरी मदतीची मागणी

By admin | Updated: November 7, 2015 02:05 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे व बाजारपेठेच्या सुलतानी व्यवस्थापनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे.

महाराष्ट्र कृषक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडेवर्धा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अवकृपेमुळे व बाजारपेठेच्या सुलतानी व्यवस्थापनामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मदत अनिवार्य झाली आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला बोनस देत सोयाबीनला एकरी मदत देण्याची मागणी महाराष्ट्र कृषक समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देत शुक्रवारी केली. शासनाच्या कृषी मुल्य आयोगाने ६ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे हमीभावाची शिफारस केली. प्रत्यक्षात मात्र ४ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. यातील फरकाची रक्कम बोनसच्या स्वरूपात मिळावी. सोयाबीनचा उतारा कमी झाल्याने एकरी अनुदान देण्यात यावे. कापूस व सोयाबीन पिकले नसल्याने बँकेचे कर्ज फेडता येणे अशक्य आहे, म्हणून संपूर्ण व सरसकट कर्जमुक्ती द्यावी. भूमिअधिग्रहण गोजी लघुपाटबंधारे प्रकल्पातील जमीन पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागल्यामुळे लाभक्षेत्रात सिंचनाची वाढ झाली असून प्रकल्पाची आवश्यकता नगण्य झाली. बुडीत क्षेत्रातील ४५७.५ एकर सुपिक व सिंचित जमीन पाण्याखाली जाण्यापासून वाचवावी, अशी मागणी करण्यात आली. यासह विविध मागण्या करण्यात आल्या. शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी वरील मागण्या मान्य कराव्या अन्यथा आम्ही शेतकरी उग्र आंदोलन उभारतील असा इशारा देण्यात आला. आंदोलनाला राकॉच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य शारदा केने, जिल्हाध्यक्ष शरयु वांदिले, संजय काकडे, शशांक घोडमारे, बाबाराव झलके, संजय कामनापुरे, विद्या सोनटक्के यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)