शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

११५ शेतकऱ्यांचा कापूस घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देखरेदीकडे दुर्लक्ष : कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी शासनाकडे नोंदणी केली. परंतु, अद्यापही या शेतकऱ्यांचा कापूस शासकीय यंत्रणेने खरेदी न केल्याने या कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्यांचा कापूस वेळीच खरेदी करण्यात यावा अशी मागणी आहे.नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही. यापूर्वी तालुक्यातील २,५२१ शेतकऱ्यांनी रितसर नोंदणी करून शासनाला कापूस विकाला आहे. ११५ शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक राहिल्याने त्यांनी उपनिबंधक कार्यालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर चौकशी करण्यात आली. पण अजूनही या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात न आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता; पण या प्रकरणाने पितळच उघडे पडले आहे.११५ शेतकऱ्यांनी कापूस विकत घेण्याकरिता अर्ज केला होता. त्यापैकी ४२ शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. काही शेतकऱ्यांचे पेरेपत्र आणि सातबारा अर्जासोबत मिळाले नसल्याने ही परिस्थिती ओढावली. येत्या काही दिवसांत या शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक,वर्धा.तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याकरिता अर्ज आम्हाला प्राप्त झाला. हा अर्ज उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. चौकशीअंती यातील यातील ३३ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार असल्याचे अहवालात नमूद आहे. मंजूरी आल्यावर या शेतकऱ्यांचा कापूस मार्केट यार्ड मध्ये बोलावून विकत घेतला जाईल.- विनोद कोटेवार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी