शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

११५ शेतकऱ्यांचा कापूस घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देखरेदीकडे दुर्लक्ष : कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी शासनाकडे नोंदणी केली. परंतु, अद्यापही या शेतकऱ्यांचा कापूस शासकीय यंत्रणेने खरेदी न केल्याने या कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्यांचा कापूस वेळीच खरेदी करण्यात यावा अशी मागणी आहे.नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही. यापूर्वी तालुक्यातील २,५२१ शेतकऱ्यांनी रितसर नोंदणी करून शासनाला कापूस विकाला आहे. ११५ शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक राहिल्याने त्यांनी उपनिबंधक कार्यालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर चौकशी करण्यात आली. पण अजूनही या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात न आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता; पण या प्रकरणाने पितळच उघडे पडले आहे.११५ शेतकऱ्यांनी कापूस विकत घेण्याकरिता अर्ज केला होता. त्यापैकी ४२ शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. काही शेतकऱ्यांचे पेरेपत्र आणि सातबारा अर्जासोबत मिळाले नसल्याने ही परिस्थिती ओढावली. येत्या काही दिवसांत या शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक,वर्धा.तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याकरिता अर्ज आम्हाला प्राप्त झाला. हा अर्ज उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. चौकशीअंती यातील यातील ३३ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार असल्याचे अहवालात नमूद आहे. मंजूरी आल्यावर या शेतकऱ्यांचा कापूस मार्केट यार्ड मध्ये बोलावून विकत घेतला जाईल.- विनोद कोटेवार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी