शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

११५ शेतकऱ्यांचा कापूस घरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST

नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देखरेदीकडे दुर्लक्ष : कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी शासनाकडे नोंदणी केली. परंतु, अद्यापही या शेतकऱ्यांचा कापूस शासकीय यंत्रणेने खरेदी न केल्याने या कापूस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. या शेतकऱ्यांचा कापूस वेळीच खरेदी करण्यात यावा अशी मागणी आहे.नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, नोंदणी करताना या शेतकऱ्यांनी सातबारा जोडला नसल्याचे पुढे आल्याने या कापूस उत्पादकांच्या घरी कापूस शिल्लक आहे. शिवाय त्याची खरेदीही करण्यात आलेली नाही. यापूर्वी तालुक्यातील २,५२१ शेतकऱ्यांनी रितसर नोंदणी करून शासनाला कापूस विकाला आहे. ११५ शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक राहिल्याने त्यांनी उपनिबंधक कार्यालयाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे विनंती अर्ज सादर केला. त्यानंतर चौकशी करण्यात आली. पण अजूनही या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात न आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्वच नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आल्याचा दावा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता; पण या प्रकरणाने पितळच उघडे पडले आहे.११५ शेतकऱ्यांनी कापूस विकत घेण्याकरिता अर्ज केला होता. त्यापैकी ४२ शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. काही शेतकऱ्यांचे पेरेपत्र आणि सातबारा अर्जासोबत मिळाले नसल्याने ही परिस्थिती ओढावली. येत्या काही दिवसांत या शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार आहे.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक,वर्धा.तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याकरिता अर्ज आम्हाला प्राप्त झाला. हा अर्ज उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला. चौकशीअंती यातील यातील ३३ शेतकऱ्यांचा कापूस विकत घेणार असल्याचे अहवालात नमूद आहे. मंजूरी आल्यावर या शेतकऱ्यांचा कापूस मार्केट यार्ड मध्ये बोलावून विकत घेतला जाईल.- विनोद कोटेवार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी