शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पुलगाव बॅरेज प्रकल्पाचा खर्च ३०० कोटींवर

By admin | Updated: June 15, 2017 00:44 IST

आशिया खंडातील सर्वात मोठ्या दारूगोळा भंडारासह स्थानिक कॉटन मिल, पुलगाव शहर तसेच परिसरातील १३ गावाना निम्न वर्धा प्रकल्पातून

अनेक कामे अपूर्णच : पूर्वी होता ९६ कोटीचा खर्च अपेक्षित लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठ्या दारूगोळा भंडारासह स्थानिक कॉटन मिल, पुलगाव शहर तसेच परिसरातील १३ गावाना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहराच्या सिमेवरील वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज प्रकल्प तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या विकास कामाची सुरूवात ९ मे २०१० रोजी करण्यात आली. मार्च २०१२ पर्यंत हे काम पूर्ण होणे क्रमप्राप्त होते. परंतु, २०१७ मधील मार्च महिना उलटला तरी सदर काम पूर्ण झालेले नाही. सन १९७५ मध्ये ३१ लाखांच्या कोल्हापूरी बंधारे बांधण्याऐवजी ९६ कोटीचा पुलगाव बॅरेज प्रकल्प पुढे आला. मध्यंतरी निधी अभावी बॅरेजचे काम रखडले होते. आज या बॅरेजच्या बांधकामाचा खर्च ३०० कोटीवर गेला आहे. परंतु, अद्यापही अनेक कामे अपूर्णच आहे. सप्टेंबर २००९ मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुलगाव बॅरेजचे प्रतिकात्मक भूमीपूजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या बॅरेजच्या कामाचे भूमीपूजन ९ मे २०१० रोजी करण्यात आले. साधारणत: उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे असते. त्यामुळे बॅरेजचे बांधकाम करणे सोयीचे असते; पण सात वर्षे पूर्ण होवूनही या बॅरेजचे काम नदीच्या पात्रात जमीनीपासून दोन-तीन फुटाचे वर झालेले नाही. १९७७ मध्ये पुलगाव नाचणगाव पाणी पुरवठा योजना सुरू झाली. नाचणगाव गुंजखेडी आदी पाणी पुरवठा योजनेचा विचार करून सन १९८० मध्ये वर्धा नदीवर ३१ लाख खर्चाचा कोल्हापूरी बंधारा बांधण्याचा प्रश्न शासन दरबारी रेटण्यात आला. शहरातील प्रमुख उद्योग संस्था पाण्याचा अधिक वापर करीत असल्याने त्यांच्याकडून १० टक्के राशी वसूल करून लोकसहभागातून हे काम जलसिंचन विभागाकडून करावे व उर्वरीत राशी गरजेनुसार भरल्या जावी असे ठरल्यानंतर या बंधाऱ्याच्या कामाला गती मिळालेली नाही. एका बैठकीत ३१ लाखाच्या अपेक्षित कोल्हापूरी बंधाऱ्याचा आराखडा तयार करण्यात आला. पाण्याचा उपभोग घेणाऱ्या संस्थांकडून प्रकल्पासाठी २६ लाख ४० हजार गोळा करण्याचे ठरले. पण, शासनाच्या लालफीतशाहीच्या धोरणात १९८८ मध्ये ठरलेली २८ लाखाची योजना १९९१ मध्ये ३१ लाखांवर गेली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांची या प्रकल्पासाठी ८ एप्रिल १९९२ मध्ये नगर प्रशासनाला ५ लाखाचा निधी दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, १९९१-९२ मधील सीएसआर दर पत्रकानुसार हे काम ३१ लाखाहून ७४ लाख ८० हजारावर गेले आणि हा कोल्हापूरी बंधारा राजकीय भोवऱ्यात अडकला. शहर व परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न विचारात घेता कोल्हापूरी बंधाऱ्याचा प्रश्न मागे पडून वर्धा नदीवर ८५ कोटीचा पुलगाव बॅरेज व ९४ कोटीचे खर्डा बॅरेजची योजना कार्यान्वित झाली. बॅरेजचे काम मार्च २०१२ पर्र्यंत पूर्ण होत शहरासह परिसरातील १३ गावाचा पाणी प्रश्न सुटणे क्रमप्राप्त होते. २०१२ संपले तरी कामाला गती मिळाली नाही. संबंधीत कंस्ट्रक्शन कंपनीने २५ कोटी रूपये खर्चाची कामे पूर्ण केली. पण, सदर कंस्ट्रक्शन कंपनीला कामापोटी पैसे न मिळाल्याने हे काम बंद पडले. या बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी. असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. आहे. त्यामुळे दारूगोळा भांडारासह शहर व परिसरातील १३ गावांना बॅरेजमधून अतिरिक्त ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. बॅरेजची लांबी २२५ मीटर असून १४.१७ मीटर उंची, ६.५० मीटर रूंदी राहणार असल्याचे सांगण्यात येते. यात ६५० मीटर पाणी राहणार आहे. तसेच १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची क्षमता राहणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १२ बाय ६ फुटाचे १५ दरवाजे राहणार आहे. मागील ७ वर्षात या बॅरेजचे काम पाहिजे तसे भरीव न झाल्यामुळे हे बॅरेज किती वर्षात पूर्ण होणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. ८५ कोटीचे काम १०० कोटींवर आणि १०० कोटींचे काम ३०० कोटींवर गेले तरीही काम अपूर्ण असल्याने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे. दोन वेळा झाले भूमिपूजन सप्टेंबर २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुलगाव बॅरेजचे प्रतिकात्मक भूमीपूजन करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात या बॅरेजच्या कामाचे भूमीपूजन ९ मे २०१० ला झाले. पुलगाव बॅरेजचे काम मार्च २०१२ पर्र्यंत पूर्ण होऊन शहर व नजीकच्या १३ गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणे अपेक्षीत होते. २०१२ अरेखपर्यंत कामाला गती मिळाली नाही. कंस्ट्रक्शन कंपनीने २५ कोटीच्या खर्चाची कामे केली. परंतु, कंस्ट्रक्शन कंपनीला पैसे न देण्यात आल्याने काम बंद पडले. सदर बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी. आहे. उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. असल्याने दारूगोळा भांडारासह शहर व परिसरातील १३ गावांना बॅरेजमधून पाणी पुरवठा होत ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर, उंची १४.१७ मीटर व रुंदी ६.५० मीटर राहणार असल्याने त्यात १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १५ दरवाजे राहणार आहेत.