शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

पुलगाव बॅरेज प्रकल्पाचा खर्च ३०० कोटींवर

By admin | Updated: June 15, 2017 00:44 IST

आशिया खंडातील सर्वात मोठ्या दारूगोळा भंडारासह स्थानिक कॉटन मिल, पुलगाव शहर तसेच परिसरातील १३ गावाना निम्न वर्धा प्रकल्पातून

अनेक कामे अपूर्णच : पूर्वी होता ९६ कोटीचा खर्च अपेक्षित लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : आशिया खंडातील सर्वात मोठ्या दारूगोळा भंडारासह स्थानिक कॉटन मिल, पुलगाव शहर तसेच परिसरातील १३ गावाना निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने शहराच्या सिमेवरील वर्धा नदीवर पुलगाव बॅरेज प्रकल्प तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या विकास कामाची सुरूवात ९ मे २०१० रोजी करण्यात आली. मार्च २०१२ पर्यंत हे काम पूर्ण होणे क्रमप्राप्त होते. परंतु, २०१७ मधील मार्च महिना उलटला तरी सदर काम पूर्ण झालेले नाही. सन १९७५ मध्ये ३१ लाखांच्या कोल्हापूरी बंधारे बांधण्याऐवजी ९६ कोटीचा पुलगाव बॅरेज प्रकल्प पुढे आला. मध्यंतरी निधी अभावी बॅरेजचे काम रखडले होते. आज या बॅरेजच्या बांधकामाचा खर्च ३०० कोटीवर गेला आहे. परंतु, अद्यापही अनेक कामे अपूर्णच आहे. सप्टेंबर २००९ मध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुलगाव बॅरेजचे प्रतिकात्मक भूमीपूजन करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र या बॅरेजच्या कामाचे भूमीपूजन ९ मे २०१० रोजी करण्यात आले. साधारणत: उन्हाळ्यात नदीचे पात्र कोरडे असते. त्यामुळे बॅरेजचे बांधकाम करणे सोयीचे असते; पण सात वर्षे पूर्ण होवूनही या बॅरेजचे काम नदीच्या पात्रात जमीनीपासून दोन-तीन फुटाचे वर झालेले नाही. १९७७ मध्ये पुलगाव नाचणगाव पाणी पुरवठा योजना सुरू झाली. नाचणगाव गुंजखेडी आदी पाणी पुरवठा योजनेचा विचार करून सन १९८० मध्ये वर्धा नदीवर ३१ लाख खर्चाचा कोल्हापूरी बंधारा बांधण्याचा प्रश्न शासन दरबारी रेटण्यात आला. शहरातील प्रमुख उद्योग संस्था पाण्याचा अधिक वापर करीत असल्याने त्यांच्याकडून १० टक्के राशी वसूल करून लोकसहभागातून हे काम जलसिंचन विभागाकडून करावे व उर्वरीत राशी गरजेनुसार भरल्या जावी असे ठरल्यानंतर या बंधाऱ्याच्या कामाला गती मिळालेली नाही. एका बैठकीत ३१ लाखाच्या अपेक्षित कोल्हापूरी बंधाऱ्याचा आराखडा तयार करण्यात आला. पाण्याचा उपभोग घेणाऱ्या संस्थांकडून प्रकल्पासाठी २६ लाख ४० हजार गोळा करण्याचे ठरले. पण, शासनाच्या लालफीतशाहीच्या धोरणात १९८८ मध्ये ठरलेली २८ लाखाची योजना १९९१ मध्ये ३१ लाखांवर गेली. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांची या प्रकल्पासाठी ८ एप्रिल १९९२ मध्ये नगर प्रशासनाला ५ लाखाचा निधी दिल्याचेही सांगण्यात आले. मात्र, १९९१-९२ मधील सीएसआर दर पत्रकानुसार हे काम ३१ लाखाहून ७४ लाख ८० हजारावर गेले आणि हा कोल्हापूरी बंधारा राजकीय भोवऱ्यात अडकला. शहर व परिसरातील पाणी टंचाईचा प्रश्न विचारात घेता कोल्हापूरी बंधाऱ्याचा प्रश्न मागे पडून वर्धा नदीवर ८५ कोटीचा पुलगाव बॅरेज व ९४ कोटीचे खर्डा बॅरेजची योजना कार्यान्वित झाली. बॅरेजचे काम मार्च २०१२ पर्र्यंत पूर्ण होत शहरासह परिसरातील १३ गावाचा पाणी प्रश्न सुटणे क्रमप्राप्त होते. २०१२ संपले तरी कामाला गती मिळाली नाही. संबंधीत कंस्ट्रक्शन कंपनीने २५ कोटी रूपये खर्चाची कामे पूर्ण केली. पण, सदर कंस्ट्रक्शन कंपनीला कामापोटी पैसे न मिळाल्याने हे काम बंद पडले. या बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी. असून उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. आहे. त्यामुळे दारूगोळा भांडारासह शहर व परिसरातील १३ गावांना बॅरेजमधून अतिरिक्त ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. बॅरेजची लांबी २२५ मीटर असून १४.१७ मीटर उंची, ६.५० मीटर रूंदी राहणार असल्याचे सांगण्यात येते. यात ६५० मीटर पाणी राहणार आहे. तसेच १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठविण्याची क्षमता राहणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १२ बाय ६ फुटाचे १५ दरवाजे राहणार आहे. मागील ७ वर्षात या बॅरेजचे काम पाहिजे तसे भरीव न झाल्यामुळे हे बॅरेज किती वर्षात पूर्ण होणार असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. ८५ कोटीचे काम १०० कोटींवर आणि १०० कोटींचे काम ३०० कोटींवर गेले तरीही काम अपूर्ण असल्याने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे. दोन वेळा झाले भूमिपूजन सप्टेंबर २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पुलगाव बॅरेजचे प्रतिकात्मक भूमीपूजन करण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात या बॅरेजच्या कामाचे भूमीपूजन ९ मे २०१० ला झाले. पुलगाव बॅरेजचे काम मार्च २०१२ पर्र्यंत पूर्ण होऊन शहर व नजीकच्या १३ गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणे अपेक्षीत होते. २०१२ अरेखपर्यंत कामाला गती मिळाली नाही. कंस्ट्रक्शन कंपनीने २५ कोटीच्या खर्चाची कामे केली. परंतु, कंस्ट्रक्शन कंपनीला पैसे न देण्यात आल्याने काम बंद पडले. सदर बॅरेजची एकूण क्षमता १०.८० द.ल.घ.मी. आहे. उपयुक्त साठा ९.८४ द.ल.घ.मी. असल्याने दारूगोळा भांडारासह शहर व परिसरातील १३ गावांना बॅरेजमधून पाणी पुरवठा होत ३२३६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या बॅरेजची लांबी २२५ मीटर, उंची १४.१७ मीटर व रुंदी ६.५० मीटर राहणार असल्याने त्यात १०.८० द.ल.घ.मी. पाणी साठणार आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी १५ दरवाजे राहणार आहेत.