शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

चवथीच्या एका दाखल्याची किंमत दोन हजार रुपये

By admin | Updated: May 17, 2014 23:48 IST

शिक्षण क्षेत्रावर एवढे वाईट दिवस येतील, याचा विचार कुणीही केला नसावा. पूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपूरी पडत होती;

विरुळ (आकाजी) : शिक्षण क्षेत्रावर एवढे वाईट दिवस येतील, याचा विचार कुणीही केला नसावा. पूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपूरी पडत होती; पण आता विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पालकांना विविध प्रलोभने दिली जात असल्याचे दिसते. परिसरातील गावांत चवथीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची किंमत दोन हजार रुपये लावली जात आहे. इयत्ता चवथी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आपल्याच शाळेत कसा येईल, आपल्या शाळेच्या तुकड्या कशा वाचतील, यासाठी चक्क काही पालकांना पैशाचे आमिष दाखविले जात आहे. विद्यार्थ्यांचे दाखले घेण्यासाठी महागडी स्पर्धा शिक्षकांना करावी लागत आहे़ एका दाखल्यासाठी दोन-दोन हजार रुपये मोजावे लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे़ यातही काही पालक अपवाद ठरत आहेत. ते कुणाच्याही पैशाला हात लावत नाही, कुणाकडून पैसे घेत नाही व आपल्या मुलांना शाळेत पाठवितात. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने व इंग्रजी शाळेचे भरघोस पीक आल्याने ग्रामीण भागातील शाळांवर ही वेळ आली आहे़ नुकताच चवथीचा निकाल जाहीर झाला. चवथी पास झालेले विद्यार्थी पाचवीत प्रवेश करण्यासाठी आपल्या शाळेत कसे दाखल होतील व आपल्या तुकड्या कशा वाचतील, या विचारात असलेले संस्थाचालक आता शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी शोधमोहिम चालवित आहेत. अंगाची काहिली करणार्‍या उन्हाची पर्वा न करता अनेक शिक्षक फिरताना दिसत आहे़ ज्या गावात दोन - दोन हायस्कूल आहे, त्या गावातील शिक्षकांत विद्यार्थी आपल्याच शाळेत कसा येतील, याची स्पर्धा लागल्याचे दिसते. पालक चांगल्या शाळेच्या शोधात दिसतात. एक-दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावातच एकापेक्षा अधिक शाळा असल्याने विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे़ शिक्षणाचा दर्जा पाहूनच पालकांची शाळांना पसंती देण्याची भूमिका पाहता काही शाळा यंदा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीवाचा आटापिटा करूनही विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा चालकांची झोप उडाली आहे़ यामुळे बोगस विद्यार्थीही हजेरी पटावर दाखविण्याची भीती व्यक्त होत आहे़ शिक्षण विभागाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.(वार्ताहर)