शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
4
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
5
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
6
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
7
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
8
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
9
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
10
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
11
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
12
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
13
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
14
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
15
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
16
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
17
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
18
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
19
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
20
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?

चवथीच्या एका दाखल्याची किंमत दोन हजार रुपये

By admin | Updated: May 17, 2014 23:48 IST

शिक्षण क्षेत्रावर एवढे वाईट दिवस येतील, याचा विचार कुणीही केला नसावा. पूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपूरी पडत होती;

विरुळ (आकाजी) : शिक्षण क्षेत्रावर एवढे वाईट दिवस येतील, याचा विचार कुणीही केला नसावा. पूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा अपूरी पडत होती; पण आता विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पालकांना विविध प्रलोभने दिली जात असल्याचे दिसते. परिसरातील गावांत चवथीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची किंमत दोन हजार रुपये लावली जात आहे. इयत्ता चवथी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आपल्याच शाळेत कसा येईल, आपल्या शाळेच्या तुकड्या कशा वाचतील, यासाठी चक्क काही पालकांना पैशाचे आमिष दाखविले जात आहे. विद्यार्थ्यांचे दाखले घेण्यासाठी महागडी स्पर्धा शिक्षकांना करावी लागत आहे़ एका दाखल्यासाठी दोन-दोन हजार रुपये मोजावे लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे़ यातही काही पालक अपवाद ठरत आहेत. ते कुणाच्याही पैशाला हात लावत नाही, कुणाकडून पैसे घेत नाही व आपल्या मुलांना शाळेत पाठवितात. विद्यार्थी संख्या कमी झाल्याने व इंग्रजी शाळेचे भरघोस पीक आल्याने ग्रामीण भागातील शाळांवर ही वेळ आली आहे़ नुकताच चवथीचा निकाल जाहीर झाला. चवथी पास झालेले विद्यार्थी पाचवीत प्रवेश करण्यासाठी आपल्या शाळेत कसे दाखल होतील व आपल्या तुकड्या कशा वाचतील, या विचारात असलेले संस्थाचालक आता शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी शोधमोहिम चालवित आहेत. अंगाची काहिली करणार्‍या उन्हाची पर्वा न करता अनेक शिक्षक फिरताना दिसत आहे़ ज्या गावात दोन - दोन हायस्कूल आहे, त्या गावातील शिक्षकांत विद्यार्थी आपल्याच शाळेत कसा येतील, याची स्पर्धा लागल्याचे दिसते. पालक चांगल्या शाळेच्या शोधात दिसतात. एक-दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावातच एकापेक्षा अधिक शाळा असल्याने विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे़ शिक्षणाचा दर्जा पाहूनच पालकांची शाळांना पसंती देण्याची भूमिका पाहता काही शाळा यंदा ओस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीवाचा आटापिटा करूनही विद्यार्थी मिळत नसल्याने शाळा चालकांची झोप उडाली आहे़ यामुळे बोगस विद्यार्थीही हजेरी पटावर दाखविण्याची भीती व्यक्त होत आहे़ शिक्षण विभागाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.(वार्ताहर)