शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

लागवडीवरचा खर्च दोन लाखांचा; हाती आले केवळ चाळीस हजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 08:39 IST

Wardha news आपल्या परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देऊन मोठ्या अपेक्षेने शेतीमध्ये भाजीपाला व फळ उत्पादनावर भर दिला. पण, दुसऱ्या लाटेतील कडक निर्बंधांमुळे युवा शेतकऱ्याला दोन लाख रुपये खर्चून केवळ चाळीस हजाराचे उत्पन्न मिळाल्याने त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटकाकवडीमोल भावाने टरबजू-खरबूज उत्पादक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने युवकांना गावाचा रस्ता धरावा लागला. आता गावातील शिक्षित युवकांनी नोकरीकरिता बाहेर पडण्यापेक्षा आपल्या परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देऊन मोठ्या अपेक्षेने शेतीमध्ये भाजीपाला व फळ उत्पादनावर भर दिला. पण, दुसऱ्या लाटेतील कडक निर्बंधांमुळे युवा शेतकऱ्याला दोन लाख रुपये खर्चून केवळ चाळीस हजाराचे उत्पन्न मिळाल्याने त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

सेलू तालुक्यातील धपकी येथील युवा शेतकरी महेश महादेव गजबे याने एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. या पदवीच्या भरवशावर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा त्याने वडिलोपार्जित साडेतीन एकर शेतीमध्ये टरबूज आणि खरबुजाची लागवड केली. उन्हाळ्यात या दोन्ही पिकांना मोठी मागणी राहत असल्याने त्याने या पिकांसाठी चांगलीच मेहनत घेतली. फळबागही चांगली बहरल्याने आता चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास निर्माण झाला होता. फळ तोडणीस आले आणि कडक लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे बाजारपेठ बंद असल्याने फळविक्रीला ब्रेक लागला आहे. याच संधीचा गैरफायदा उचलून व्यापारी दोन ते तीन रुपये प्रतिकिलो प्रमाणे मागणी करीत आहे. पण, पर्याय नसल्याने मिळेल त्या दरात टरबूज व खरबूज विकावे लागल्याने युवा शेतकऱ्याला केवळ चाळीस हजार रुपये प्राप्त झाले आहेत. याकरिता त्याला दोन लाख रुपयांचा खर्च आला असून कवडीमोल भावामुळे तोडणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

आता कर्जाची परतफेड करणार कशी?

महेशने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन भरघोस उत्पन्न घेण्यासाठी पाऊल टाकले होते. त्याने शेतात सुरुवातीला कापूस, सोयाबीन, चणा व तुरीचे पीक घेतले. निसर्गकोपामुळे या पिकांमध्येही मोठा फटका बसला. त्यामुळे दोन बँकांकडून घेतलेले २ लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी दोन एकरात टरबूज तर दीड एकरात खरबुजाची लागवड केली. शेत बहरले, पीकही चांगले आलेत पण, कडक निर्बंधामुळे सारेकाही धुळीस मिळाले. दोन लाखांचा खर्च करून केवळ चाळीस हजार रुपये हातात आल्याने कर्ज फेडण्यासाठी केलेला प्रयत्न कर्ज वाढीस कारणीभूत ठरला. त्यामुळे या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.

जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परंपरागत पीक घेऊन शेती परवडत नाही, असा आम्हा नव्या पिढीतील शेतकऱ्याचा तोरा होता. म्हणून मी शेतीत नवनवीन प्रयोग करून पाहत आहे. परंतु आमच्याही हाताला यश नसल्याचा अनुभव आला आहे. नव्या पिढीला शेती करण्याचे जीवावर येते, असा आरोप होतो. पण, चांगल्या प्रकारे शेती करूनही अस्मानी-सुलतानी संकटामुळे नुकसानीचाच सामना करावा लागतो. आता चांगले पीक आले असतानाही कवडीमोल भावात विकावे लागत आहे. काढणीचाही खर्च निघत नसल्याने उभ्या पिकावर नांगर चालवायची वेळ आली आहे. आता जुने कर्ज कुठून फेडावे आणि नवीन हंगामाची तयारी कशी करावी?

महेश महादेव गजबे, युवा शेतकरी, धपकी

टॅग्स :agricultureशेती