शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

लागवडीवरचा खर्च दोन लाखांचा; हाती आले केवळ चाळीस हजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 08:39 IST

Wardha news आपल्या परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देऊन मोठ्या अपेक्षेने शेतीमध्ये भाजीपाला व फळ उत्पादनावर भर दिला. पण, दुसऱ्या लाटेतील कडक निर्बंधांमुळे युवा शेतकऱ्याला दोन लाख रुपये खर्चून केवळ चाळीस हजाराचे उत्पन्न मिळाल्याने त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटकाकवडीमोल भावाने टरबजू-खरबूज उत्पादक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे अनेकांचा रोजगार हिरावल्याने युवकांना गावाचा रस्ता धरावा लागला. आता गावातील शिक्षित युवकांनी नोकरीकरिता बाहेर पडण्यापेक्षा आपल्या परंपरागत शेतीला आधुनिकतेची जोड देऊन मोठ्या अपेक्षेने शेतीमध्ये भाजीपाला व फळ उत्पादनावर भर दिला. पण, दुसऱ्या लाटेतील कडक निर्बंधांमुळे युवा शेतकऱ्याला दोन लाख रुपये खर्चून केवळ चाळीस हजाराचे उत्पन्न मिळाल्याने त्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले.

सेलू तालुक्यातील धपकी येथील युवा शेतकरी महेश महादेव गजबे याने एमएसडब्ल्यू अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. या पदवीच्या भरवशावर नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा त्याने वडिलोपार्जित साडेतीन एकर शेतीमध्ये टरबूज आणि खरबुजाची लागवड केली. उन्हाळ्यात या दोन्ही पिकांना मोठी मागणी राहत असल्याने त्याने या पिकांसाठी चांगलीच मेहनत घेतली. फळबागही चांगली बहरल्याने आता चांगले उत्पन्न मिळेल, असा विश्वास निर्माण झाला होता. फळ तोडणीस आले आणि कडक लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे बाजारपेठ बंद असल्याने फळविक्रीला ब्रेक लागला आहे. याच संधीचा गैरफायदा उचलून व्यापारी दोन ते तीन रुपये प्रतिकिलो प्रमाणे मागणी करीत आहे. पण, पर्याय नसल्याने मिळेल त्या दरात टरबूज व खरबूज विकावे लागल्याने युवा शेतकऱ्याला केवळ चाळीस हजार रुपये प्राप्त झाले आहेत. याकरिता त्याला दोन लाख रुपयांचा खर्च आला असून कवडीमोल भावामुळे तोडणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

आता कर्जाची परतफेड करणार कशी?

महेशने पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन भरघोस उत्पन्न घेण्यासाठी पाऊल टाकले होते. त्याने शेतात सुरुवातीला कापूस, सोयाबीन, चणा व तुरीचे पीक घेतले. निसर्गकोपामुळे या पिकांमध्येही मोठा फटका बसला. त्यामुळे दोन बँकांकडून घेतलेले २ लाख ८८ हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी दोन एकरात टरबूज तर दीड एकरात खरबुजाची लागवड केली. शेत बहरले, पीकही चांगले आलेत पण, कडक निर्बंधामुळे सारेकाही धुळीस मिळाले. दोन लाखांचा खर्च करून केवळ चाळीस हजार रुपये हातात आल्याने कर्ज फेडण्यासाठी केलेला प्रयत्न कर्ज वाढीस कारणीभूत ठरला. त्यामुळे या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे.

जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परंपरागत पीक घेऊन शेती परवडत नाही, असा आम्हा नव्या पिढीतील शेतकऱ्याचा तोरा होता. म्हणून मी शेतीत नवनवीन प्रयोग करून पाहत आहे. परंतु आमच्याही हाताला यश नसल्याचा अनुभव आला आहे. नव्या पिढीला शेती करण्याचे जीवावर येते, असा आरोप होतो. पण, चांगल्या प्रकारे शेती करूनही अस्मानी-सुलतानी संकटामुळे नुकसानीचाच सामना करावा लागतो. आता चांगले पीक आले असतानाही कवडीमोल भावात विकावे लागत आहे. काढणीचाही खर्च निघत नसल्याने उभ्या पिकावर नांगर चालवायची वेळ आली आहे. आता जुने कर्ज कुठून फेडावे आणि नवीन हंगामाची तयारी कशी करावी?

महेश महादेव गजबे, युवा शेतकरी, धपकी

टॅग्स :agricultureशेती