शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खर्च ४२ हजार ३५० आणि उत्पन्न ४ हजार ५०० रुपयेच

By admin | Updated: December 29, 2014 02:00 IST

यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांच्या माथी आलेल्या नापिकीने त्याला चांगलेच जेरीस आणले. यात येथील एका शेतकऱ्याने पाच एकरात ४२ हजार ३५० रुपये खर्च करून सोयाबीनचा पेरा केला.

वर्धा : यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांच्या माथी आलेल्या नापिकीने त्याला चांगलेच जेरीस आणले. यात येथील एका शेतकऱ्याने पाच एकरात ४२ हजार ३५० रुपये खर्च करून सोयाबीनचा पेरा केला. या पाच एकरात त्याला केवळ चार हजार ३५० रुपयांचे उत्पन्न झाले. या उत्पन्नात घेतलेले कर्ज फेडावे वा इतर खर्च करावा असा प्रश्न त्याला पडला आहे. ही अवस्था जिल्ह्यात एका शेतकऱ्याची नाही अनेक शेतकऱ्यांनी आहे. वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) येथील शंकर श्यामराव टोपले यांनी आलोडा (बोरगाव) शिवारातील त्यांच्या शेतात सोयाबीनवा पेरा केला. त्याच्याकडे ५ एकर शेती आहे. त्यांनी मशागतीपासून तर उत्पादन घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रुपये खर्च केला. तेव्हा त्याच्या घरात केवळ ४ हजार ५०० रुपये सोयाबीन झाले. जिल्ह्यात उत्पादनात प्रचंड तोटा येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई तसेच कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत आहे.कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात होते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने ती परिस्थिती येता उलट झाली आहे. शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दांडी मारल्याने सोयाबीनच्या दाण्याला ज्वारीच्या दाण्याचा आकार आला आहे. बँकाचे कर्ज काढून घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नात आलेला तोटा हा शेतकऱ्यांना आणखीच अडचणीत आणणारा आहे. पूर्वी शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेत होता. तणनाशक उपलब्ध नसतानाही हजारो रुपये निंदन व डवरणीसाठी खर्च करूनही किमान एकरी ८ ते १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न निघत होते. एकरी उत्पादन खर्च २० हजाराच्य जवळपास गेल्यास ४० हजारांपर्यंत उत्पादन होत. मात्र यंदाच्या हंगामात विपरीतच झाले.(तालुका प्रतिनिधी)पाच एकराला लागलेला खर्चनागरणी३ हजार २०० रुपयेवखरणी२ हजार ९०० रुपयेवेचाई१ हजार ७०० रुपयेबियाणे (५ बॅग)१३ हजार ५०० रुपयेखत५ हजार १२० रुपयेपेरणी१ हजार ८०० रुपयेफवारा ४०० रुपयेतननाशक१ हजार ६३० रुपयेडवरणी३ हजार ६०० रुपयेकिटकनाशक१ हजार ७०० रुपयेफवारणी४०० रुपयेसवंगणी६ हजार रुपयेमळणी४०० रुपयेएकूण४२ हजार ३५०