शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
2
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
3
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
4
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
5
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
6
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
7
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
8
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
9
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
10
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
11
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
12
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
13
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
14
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
15
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
16
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
17
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
18
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
19
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
20
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

कोराेना नियंत्रणासाठी लाॅकडाऊन सोबत जिल्हाबंदीही करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 05:00 IST

१५ फेब्रुवारी पासून रूग्णसंख्या झपाट्यांने वाढत आहे. जिल्ह्यात २७ हाॅटस्पाॅट असून त्या ठिकाणी कन्टेनन्मेट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच ५० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्यास लग्न आयोजक व मंगल कार्यालय मालक या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबत मंगल कार्यालय सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे सुतोवाच : १५ फेब्रुवारीनंतर रूग्णसंख्या वाढल्याने प्रशासन अलर्ट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गेल्यावेळी कोरोना संसर्गाच्या काळात नागरिकांनी शिस्त व सयंमाचे पालन केले होते व कोरोना रूग्णवाढीचा दर नियंत्रणात ठेवला होता. आता परिस्थिती बदललेली असून ती नियंत्रणात न आल्यास लाॅकडाऊनसोबत जिल्हाबंदीची शक्यता पालकमंत्री सुनील केदार यांनी वर्तविली  आहे. शनिवारी त्यांनी येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाप्रशासनाला  नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. १५ फेब्रुवारी पासून रूग्णसंख्या झपाट्यांने वाढत आहे. जिल्ह्यात २७ हाॅटस्पाॅट असून त्या ठिकाणी कन्टेनन्मेट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच ५० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्यास लग्न आयोजक व मंगल कार्यालय मालक या दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यासोबत मंगल कार्यालय सील करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात वर्धा शहर, आर्वी, हिंगणघाट, आष्टी, पुलगाव, देवळी या ठिकाणी हाॅकर्स व भाजी विक्रेते यांच्या कोविड चाचण्या करण्यात येत आहे.  दुकानदारानी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. वर्धा शहरात गिताई नगर, स्नेहल नगर, सिंदी (मेघे), लक्ष्मी नगर, म्हसाळा, रामनगर, सावंगी (मेघे) हे ठिकाण  कोरोना हाॅटस्पाॅट आहेत अशी माहिती त्यांनी दिली. 

व्हेंटीलेटरची मागणी आताच कळवा जिल्ह्यात ९६१ ऑक्सीजन बेड आहेत.  १७९ आयसीयू बेड आहेत, ६८ व्हेंटीलेटर आहेत. पुढे आपल्याला व्हेंटीलेटरची गरज भासू शकते. त्यामुळे यासाठी आत्ताच मागणी कळवावी असे निर्देश पालकमंत्री केदार यांनी या बैठकीत दिलेत.  

लग्न सोहळे घरीच पार पाडण्याचे आवाहन सामाजिक कार्यक्रमात खास करून लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त लोकांनी गर्दी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लग्न घरच्या-घरीच करण्यावर भर द्यावा असे आवाहन  पालकमंत्र्यांनी केले.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या