शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

हिंगणघाटमधील नगरसेवक स्वत:च करतात वार्डाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:59 IST

हिंगणघाटमधील नगरसेवक प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत.

ठळक मुद्देआताच नाही तर पूर्वीपासून सुरू आहे काम ‘स्वच्छ वॉर्ड, स्वच्छ शहर’चे एक चांगले उदाहरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला. मोहिमही यशस्वी झाल्यात. गाव, शहर आणि वॉर्डाची साफ सफाई झाली; परंतु आता या मोहिमेची परिस्थिती जैसे थे होत असल्याचे दिसत आहे. यावर मात करण्याकरिता शहरातील एका नगर सेवकाने आपल्या वॉर्डातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतेचे कार्य स्वबळावर सुरू केले आहे. स्वत:च स्वच्छता करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम तो करीत आहे. केवळ फोटोसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी या आदर्शाचा कित्ता गिरविण्या सारखा असून एक आदर्श नगरसेवक असा असावा असे म्हणायला हरकत नसावी.प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत. शासकीय स्वच्छता मोहीम झाल्यानंतर त्यांचे हे कार्य सुरूच आहे. विशेष असे की केवळ फोटो काढण्यासाठी सफाई केल्या जाते असे नाहीच. ही सेवा अनेक दिवसांपासून सातत्याने जैसे थे करण्याची गरज आहे. स्वच्छतेचे धडे घ्यावयाचे झाल्यास हे कार्य खरच प्रशंसनिय ठरते.पालिकेची यंत्रणा असताना ही स्वच्छता या व्यक्तीस का करावी लागते हा प्रश्न निर्माण होतो. मिळालेल्या माहितीनुसार या वॉर्डात नगर पालिकेद्वारे नाल्याची स्वच्छता नियमितरित्या पूर्णत: होत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ही स्वच्छता पालिकेद्वारे नियमित होत नसल्याने गरजेच्या वेळी झाडू, फावडे घेवून नगरसेवक प्रकाश राऊत अस्वच्छता पाहून सेवा देतात. आणखी एक विशेष असे की हे ‘निवडणुका’ पाहून असे करीत तर नाही ना ? असा सवाल ही निर्माण होणे शक्य आहे. परंतु हे कार्य अलिकडेच करतात असे नव्हे तर त्यांची ही सेवा पूर्वीपासून सुरू आहे. दररोज सकाळी १०-११ वाजेपर्यंत स्वच्छतेची मोहीम स्वत: ते नियमित राबवितात.या वार्डातील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याचा त्यांचा माणस आहे. वॉर्डात मोठी समस्या निर्माण होणार नाही, याची ते दक्षता घेत असल्याचे ते सांगतात.शासनाची स्वच्छता मोहीमही पालिकेद्वारेहिंगणघाट शहरात स्वच्छता मोहीम राबविल्या गेली. मुख्याधिकाऱ्यांनी ही मोहीम पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून राबविली. नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. त्या काळात स्वच्छतेच्या सुचनांचे पालन करुन घेण्याकरिता कधी सक्ती तर दंडात्मक कारवाई केली. यातून स्वच्छते विषयी जागृती करण्यात पालिका यशस्वी ठरली. आता ही मोहीम संपली असून त्यांचे चांगले परिणामही दिसत आहेत. परंतु गत काही दिवसांपासून शहरात अस्वच्छतेची सुरूवात झाल्याचे दिसते. पुन्हा हे शहर पूर्ववत अर्थात स्वच्छता मोहीमेपुर्वीचे शहर होवू नये अशीच अपेक्षा नागरिकांची आहे.

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट