शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाटमधील नगरसेवक स्वत:च करतात वार्डाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 11:59 IST

हिंगणघाटमधील नगरसेवक प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत.

ठळक मुद्देआताच नाही तर पूर्वीपासून सुरू आहे काम ‘स्वच्छ वॉर्ड, स्वच्छ शहर’चे एक चांगले उदाहरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा सर्वत्र गाजावाजा झाला. मोहिमही यशस्वी झाल्यात. गाव, शहर आणि वॉर्डाची साफ सफाई झाली; परंतु आता या मोहिमेची परिस्थिती जैसे थे होत असल्याचे दिसत आहे. यावर मात करण्याकरिता शहरातील एका नगर सेवकाने आपल्या वॉर्डातील नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतेचे कार्य स्वबळावर सुरू केले आहे. स्वत:च स्वच्छता करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम तो करीत आहे. केवळ फोटोसाठी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणाऱ्यांनी या आदर्शाचा कित्ता गिरविण्या सारखा असून एक आदर्श नगरसेवक असा असावा असे म्हणायला हरकत नसावी.प्रकाश राऊत हे अपक्ष म्हणून पालिकेचे विद्यमान सदस्य आहेत. गत कित्येक दिवसांपासून ते स्वत: हातात झाडू, फावडे घेवून शास्त्रीवार्डात नाल्या सफाईचे कार्य करीत आहेत. शासकीय स्वच्छता मोहीम झाल्यानंतर त्यांचे हे कार्य सुरूच आहे. विशेष असे की केवळ फोटो काढण्यासाठी सफाई केल्या जाते असे नाहीच. ही सेवा अनेक दिवसांपासून सातत्याने जैसे थे करण्याची गरज आहे. स्वच्छतेचे धडे घ्यावयाचे झाल्यास हे कार्य खरच प्रशंसनिय ठरते.पालिकेची यंत्रणा असताना ही स्वच्छता या व्यक्तीस का करावी लागते हा प्रश्न निर्माण होतो. मिळालेल्या माहितीनुसार या वॉर्डात नगर पालिकेद्वारे नाल्याची स्वच्छता नियमितरित्या पूर्णत: होत नसल्याने नागरिकांना अस्वच्छतेचा दुर्गंधीचा सामना करावा लागतो. ही स्वच्छता पालिकेद्वारे नियमित होत नसल्याने गरजेच्या वेळी झाडू, फावडे घेवून नगरसेवक प्रकाश राऊत अस्वच्छता पाहून सेवा देतात. आणखी एक विशेष असे की हे ‘निवडणुका’ पाहून असे करीत तर नाही ना ? असा सवाल ही निर्माण होणे शक्य आहे. परंतु हे कार्य अलिकडेच करतात असे नव्हे तर त्यांची ही सेवा पूर्वीपासून सुरू आहे. दररोज सकाळी १०-११ वाजेपर्यंत स्वच्छतेची मोहीम स्वत: ते नियमित राबवितात.या वार्डातील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याचा त्यांचा माणस आहे. वॉर्डात मोठी समस्या निर्माण होणार नाही, याची ते दक्षता घेत असल्याचे ते सांगतात.शासनाची स्वच्छता मोहीमही पालिकेद्वारेहिंगणघाट शहरात स्वच्छता मोहीम राबविल्या गेली. मुख्याधिकाऱ्यांनी ही मोहीम पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून राबविली. नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. त्या काळात स्वच्छतेच्या सुचनांचे पालन करुन घेण्याकरिता कधी सक्ती तर दंडात्मक कारवाई केली. यातून स्वच्छते विषयी जागृती करण्यात पालिका यशस्वी ठरली. आता ही मोहीम संपली असून त्यांचे चांगले परिणामही दिसत आहेत. परंतु गत काही दिवसांपासून शहरात अस्वच्छतेची सुरूवात झाल्याचे दिसते. पुन्हा हे शहर पूर्ववत अर्थात स्वच्छता मोहीमेपुर्वीचे शहर होवू नये अशीच अपेक्षा नागरिकांची आहे.

टॅग्स :Hinganghatहिंगणघाट