शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

Coronavirus in Wardha; वर्धा जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात १२ हजारांवर पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 22:18 IST

Wardha news कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसताच संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; पण या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या दुपटीने वाढली असून गेल्या पंधरा दिवसात तब्बल १२ हजार ८९० रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्दे १५ दिवसानंतरही रुग्णसंख्या कमी होईना!दुपटीने होतेय रुग्णांमध्ये वाढ यंत्रणेवरील ताण वाढताच, रुग्णालयातील बेड हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसताच संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; पण या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या दुपटीने वाढली असून गेल्या पंधरा दिवसात तब्बल १२ हजार ८९० रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतच आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वत्रच हाहाकार माजविला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्यात संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी विवाह समारंभासह इतर कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही निर्बंध आहेत. तसेच जिल्ह्यातील दुकानांच्या वेळाही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत करण्यात आल्या आहेत. प्रशासनासह शासनाकडून प्रभावी उपाययोजना होत असल्याने या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होणे अपेक्षित होते; मात्र या कालावधीत रुग्ण दुपटीने वाढले आहे. एप्रिल महिन्यात तब्बल १ लाख ५ हजार २५२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १८ हजार ७५७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषत: महिनाभरात १२ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनाच्या पॉझिटिव्हीटी रेटपेक्षा कोरोनामुक्तीचा रेट ‘हाय’ आहे. ही बाब वर्धेकरांसाठी समाधानकारक मानावी लागेल.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

- संचारबंदीच्या काळात आरोग्य विभागाकडून ‘ट्रेस, टेस्ट व ट्रीट’ या त्रिसूत्रीवर भर देऊन चाचण्यांचे प्रमाण वाढविले. संचारबंदीच्या काळात दुप्पट कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

- आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये इतर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचा डाटा गोळा केला होता; पण त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाने झडप घातली.

- संचारबंदी असली तरीही अत्यावश्यक सोयी-सुविधांची दुकाने सुरु आहेत. त्यामुळे नागरिक त्याचाच आधार घेत गर्दी करीत आहेत. बऱ्याच भागात आठवडी बाजार सुरू असल्याने रुग्णसंख्या वाढीस कारण ठरत आहे.

ग्रामीण भागांत रुग्ण वाढले

पहिल्या टप्प्यात शहरी भागात रुग्णांची संख्या अधिक होती. पण, आता दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने ग्रामीण भागाला लक्ष्य केले आहे. ग्रामीण भागातील नागरिक कोरोना चाचणीच्या धाकाने दवाखान्यात न जाता घरीच आजारपण अंगावर काढत आहेत. परिणामी एकाला बाधा झाल्यास परिवारातील सर्वच सदस्य कोरोनाबाधित येत आहेत. यासोबतच शासनाच्या नियमावलींनाही बगल दिली जात आहे. लग्नसोहळ्यासह इतरही कार्यक्रमांना उपस्थिती लावली जात असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस