शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Coronavirus in Wardha; वर्धा जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात १२ हजारांवर पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 22:18 IST

Wardha news कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसताच संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; पण या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या दुपटीने वाढली असून गेल्या पंधरा दिवसात तब्बल १२ हजार ८९० रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्दे १५ दिवसानंतरही रुग्णसंख्या कमी होईना!दुपटीने होतेय रुग्णांमध्ये वाढ यंत्रणेवरील ताण वाढताच, रुग्णालयातील बेड हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसताच संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती; पण या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या दुपटीने वाढली असून गेल्या पंधरा दिवसात तब्बल १२ हजार ८९० रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने यंत्रणेवरील ताणही वाढतच आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने सर्वत्रच हाहाकार माजविला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्यात संचारबंदी लागू केली. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिलेत. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी विवाह समारंभासह इतर कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही निर्बंध आहेत. तसेच जिल्ह्यातील दुकानांच्या वेळाही सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत करण्यात आल्या आहेत. प्रशासनासह शासनाकडून प्रभावी उपाययोजना होत असल्याने या संचारबंदीच्या काळात रुग्णसंख्या कमी होणे अपेक्षित होते; मात्र या कालावधीत रुग्ण दुपटीने वाढले आहे. एप्रिल महिन्यात तब्बल १ लाख ५ हजार २५२ चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १८ हजार ७५७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. विशेषत: महिनाभरात १२ हजार २५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोनाच्या पॉझिटिव्हीटी रेटपेक्षा कोरोनामुक्तीचा रेट ‘हाय’ आहे. ही बाब वर्धेकरांसाठी समाधानकारक मानावी लागेल.

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

- संचारबंदीच्या काळात आरोग्य विभागाकडून ‘ट्रेस, टेस्ट व ट्रीट’ या त्रिसूत्रीवर भर देऊन चाचण्यांचे प्रमाण वाढविले. संचारबंदीच्या काळात दुप्पट कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

- आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये इतर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांचा डाटा गोळा केला होता; पण त्यानंतर आरोग्य विभागाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाने झडप घातली.

- संचारबंदी असली तरीही अत्यावश्यक सोयी-सुविधांची दुकाने सुरु आहेत. त्यामुळे नागरिक त्याचाच आधार घेत गर्दी करीत आहेत. बऱ्याच भागात आठवडी बाजार सुरू असल्याने रुग्णसंख्या वाढीस कारण ठरत आहे.

ग्रामीण भागांत रुग्ण वाढले

पहिल्या टप्प्यात शहरी भागात रुग्णांची संख्या अधिक होती. पण, आता दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने ग्रामीण भागाला लक्ष्य केले आहे. ग्रामीण भागातील नागरिक कोरोना चाचणीच्या धाकाने दवाखान्यात न जाता घरीच आजारपण अंगावर काढत आहेत. परिणामी एकाला बाधा झाल्यास परिवारातील सर्वच सदस्य कोरोनाबाधित येत आहेत. यासोबतच शासनाच्या नियमावलींनाही बगल दिली जात आहे. लग्नसोहळ्यासह इतरही कार्यक्रमांना उपस्थिती लावली जात असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस