शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कोरोना संशयितांची पाच दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 06:00 IST

दुबईहून आलेल्या पाच व्यक्तींना खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरीच निरीक्षणात ठेवले होते. या पाच व्यक्तींचे कोरोना स्वॅप चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे केला होता कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुबईवरून वर्धा येथे आलेल्या पाच जणांची आरोग्य प्रशासनाकडून त्यांच्या घरीच तपासणी करण्यात आली होती व त्यांना त्यांच्याच घरी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र, या व्यक्तींनी आपले व्यवसाय सुरू ठेवले होते. निरीक्षण काळात ते दुकानात जाऊन बसत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई शनिवारी केली, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिली आहे.दुबईहून आलेल्या पाच व्यक्तींना खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरीच निरीक्षणात ठेवले होते. या पाच व्यक्तींचे कोरोना स्वॅप चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारी म्हणून त्यांना १४ दिवसांसाठी त्यांच्या घरीच क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र तरीही ती व्यक्ती त्यांचा व्यवसाय करीत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या आस्थापना सील केल्यात. कोरोना विषाणू संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी शासन, प्रशासन विविध उपाय योजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. यामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार करणाºया व्यक्तींवर कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा आहेत. याच कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंदशासनाचे आदेश : आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईवर्धा : राज्य शासनाने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ राज्यात १३ मार्चपासून लागू केला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी राज्यातील मनपा, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्र तसेच महाविद्यालये आणि व्यवसाय प्रशिक्षण केंद्र आयुक्त यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था तसेच अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले केले आहे.राज्यात कोरोना विषाणूसंसर्गित व्यक्तींची संख्या वाढत आहे. हा संसर्ग थांबविण्यासाठी राज्य शासनाने १३ मार्च रोजी गर्दी होणारे सांस्कृतिक, सार्वजनिक, धार्मिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रम घेण्यात येऊ नये, तसेच पूर्वी अशा कार्यक्रमांना परवानगी दिली असल्यास ती रद्द करण्याचा सूचना दिल्या होत्या. तसेच चित्रपटगृहे, व्यायामशाळा, नाट्यगृहे, जलतरण तलाव अशी गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्याचे आदेशसुद्धा दिले होते.शासनाने शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गर्दी बघता आणि तिथे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून महानगर पालिका, नगरपालिका, सर्व नगर पंचायत मधील सर्व सरकारी, खासगी शाळा, तसेच अंगणवाड्या आणि महाविद्यालयेसुद्धा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, इयत्ता १० वी, १२ वी आणि विद्यापीठाच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन न करणाºयांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील तीर्थक्षेत्राच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन जिल्ह्यात होणाºया पुढील यात्रा रद्द करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे. तसेच तिर्थस्थळी दर्शनी भागात कोरोनाबाबत जनजागृती करणारे फलक लावण्यात यावेत. तिर्थस्थळाची साफसफाई आणि भाविकांसाठी हात धुण्यासाठी साबण आणि पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी शनिवारी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयाला भेट देऊन तेथील क्वारंटाईन कक्षाची पाहणी केली. तसेच अत्यावश्यक सुविधांची पाहणी करून तेथील डॉक्टरांशी चर्चा केली. क्वारंटाईन कक्ष अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल वानखडे यांची नेमणूक केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाcollectorजिल्हाधिकारी