शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शासकीय कार्यालयांत कोरोना प्रतिबंधक उपाययोजना ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

नगरपालिकेने शहरात आठ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन उभारले. पण, या हॅण्डवॉश स्टेशनमध्ये ना पाणी, ना सॅनिटायझर तसेच साधे साबण देखील नाही. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस यंत्रणेने या सर्व उपाययोजना राबविल्या. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रतिबंधक उपाययोजनेकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्दे‘ना हॅण्डवॉश, ना सॅनिटायझर’ : कार्यालयात वाढतेय नागरिकांची गर्दी

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी शासकीय कार्यालयांत आल्यास प्रथम येथे हात धुवावे हा या मागील मुख्य उद्देश होता. सुरुवातीला काही दिवस हा प्रयोग नियमितपणे राबविण्यात आला. नागरिकांनी त्याला प्रतिसादही दिला. मात्र, सोमवारी लोकमतने विविध शासकीय कार्यालयांना भेटी देत तेथील ‘रियालिटी चेक’ केली असता आजघडीला काही कार्यालये वगळता एकाही शासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ना हॅण्डवॉश स्टेशन दिसून आले ना सॅनिटायझर ठेवून असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयांना अद्यापही कोरोना विषाणू आजाराचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत असल्याने हे दुदैवच म्हणावे लागेल.मागील काही महिन्यांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या १६००च्यावर गेली आहे. असे असताना शासकीय यंत्रणा मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक उपयायोजना राबविण्यासाठी अकार्यक्षम असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धस्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.नगरपालिकेने शहरात आठ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन उभारले. पण, या हॅण्डवॉश स्टेशनमध्ये ना पाणी, ना सॅनिटायझर तसेच साधे साबण देखील नाही. त्यामुळे नव्याचे नऊ दिवस यंत्रणेने या सर्व उपाययोजना राबविल्या. मात्र, कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना प्रतिबंधक उपाययोजनेकडे शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषद, विविधा या शासकीय कार्यालयांमध्ये कुठेही हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरची व्यवस्था नसल्याचे दिसून आले.विशेष म्हणजे या कार्यालयांमध्ये शहरातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक विविध महत्त्वाच्या कामांसाठी येतात. परंतु, या कार्यालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडेच दुर्लक्ष होत असल्याने शासकीय यंत्रणेच्या दिव्याखाली अंधार असल्याचे दिसून आले.जिल्हाधिकारी कार्यालय सॅनिटाईज मशीन धूळखात४जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कर्मचाºयाचा कोरोनाने मृत्यू झाला. पण, तरीदेखील प्रवेशद्वारावर कुठलीही हॅण्डवॉश तसेच सॅनिटायझर ठेवल्याचे दिसून आले नाही. सर्रास नागरिक कार्यालयात जाताना दिसून येत असून उपाययोजना नसल्याने तेथे ठेवलेला सॅनिटाईज कक्षही धूळखात पडून असल्याचे दिसून आले.फक्त पैशांची नासाडीनगर पालिकेने एका चांगल्या उद्देशातून हे हॅण्डवॉश स्टेशन लावले होते. यात शंका नाही, मात्र, त्यांचे या उद्देशाकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची तुटफूट झाली आहे. आठ हजार अंदाजे आठ हजार रुपयांचे प्रत्येकी एक प्रमाणे ६४ हजार रुपये खर्चून शहरात आठ ठिकाणी हॅण्डवॉश स्टेशन उभारण्यात आले. मात्र, याची अवस्था बिकट असून कुठे टाकीच गायब तर कुठे सॅनिटायझर नाही नळाच्या तोट्या देखील तुटल्याचे दिसून आले. याचा उपयोगच होत नसल्याने हा खर्च व्यर्थ गेला असून फक्त पैशाची नासाडी केल्याचे चित्र आहे.पं.स.च्या प्रवेशद्वारावर केल्या जाते हॅण्ड सॅनिटाईजशहरातील पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयाच्या प्रवेशद्वार दोरीने बंद करण्यात आले आहे. तसेच कार्यालयात येणाºया नागरिकांच्या नोंदी घेण्यासह तेथे कार्यरत सुरक्षारक्षकाकडून कार्यालयात येणाऱ्यांचे हॅण्ड सॅनिटाईज करुनच कार्यालयात पाठविल्या जात आहे. तसेच नोंद वहित नोद करुनच पुढे पाठवित असल्याचे कार्यालयात दिसून आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या