शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कोरोनामुळे देशभरातील तीस कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 19:05 IST

कोरोना कालावधीत भारतातील २९ कोटी ७० लाख विद्यार्थी घरात लॉक झाल्याचा दावा, ‘युनेस्को’च्या अहवालात करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे युनेस्कोच्या अहवालातील दावाशिक्षण झाले प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क

वर्धा : कोरोनाचा प्रसार झपाट्याने होऊ लागताच मार्च २०२० मध्ये संपूर्ण जगात टाळेबंदी लागू करण्यात आली. सध्या काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरीही शाळा आणि महाविद्यालये बंदच आहेत. या कालावधीत भारतातील २९ कोटी ७० लाख विद्यार्थी घरात लॉक झाल्याचा दावा, ‘युनेस्को’च्या अहवालात करण्यात आला आहे. ऑनलाइन शिक्षणावर भर असला तरीही याचा विपरित परिणाम या पिढीला येत्या दिवसांमध्ये जाणवणार असल्याचे शिक्षक तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. (Corona hinders the education of 30 crore students across the country)

कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्यापासून विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी देशातील शिक्षण संस्था बंद करण्यात आल्यात. त्यामुळे ‘युनिस्को’च्या अहवालानुसार एप्रिल २०२० मध्ये १८८ देशांतील १५४ कोटी विद्यार्थी घरीच बसले. भारतामध्ये १५ लाख शाळा बंद ठेवल्याने २६ कोटी विद्यार्थी आणि ८९ लाख शिक्षक घरीच आहेत. यासोबतच उच्च शिक्षणात ५० हजार शिक्षण संस्था बंद आहेत. त्यामध्ये शिक्षण घेणारे ३ कोटी ७० लाख विद्यार्थी आणि १५ लाख महाविद्यालयीन प्राध्यापक घरीच आहेत. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांवर याचा परिणाम झाला असून, ‘युनेस्को’च्या अहवालानुसार सर्वाधिक परिणाम डिसेंबर महिन्यात जास्त झाल्याचे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी सरकार शाळा व महाविद्यालये बंद ठेवत असले तरी शैक्षणिकदृष्ट्या मात्र नुकसान होत आहेत. गरीब व सर्वसाधारण परिवारातील मुलांना आता पुन्हा शाळेकडे वळविण्याकरिता शिक्षकांची मोठी कसरत होणार आहे. दीड वर्षापासून मुले शाळेत गेलीच नाहीत आणि कोरोनापासून सुरक्षित ठेवून शाळा सुरू करण्याबाबत विशेष लक्षही दिले जात नसल्याने, युनिसेफनेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

राज्यातील ८१.१२ टक्के पालकांची संमती

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणात राज्यातील ८१.१२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे मत नोंदविले आहे. राज्यातील ६ लाख ९० हजार ८२० पालकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ५ लाख ६० हजार ८१८ पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास होकार दिला आहे. यामध्ये ३ लाख ५ हजार २४८ पालक ग्रामीण भागातील आहेत, तर ७१ हजार ९०४ पालक निमशहरी भागातील आहेत. तसेच ३ लाख १३ हजार ६६८ पालक शहरी भागातील आहेत. शाळा, महाविद्यालये बंद असल्यामुळे रिकामेपणामुळे विद्यार्थी व्यसनाधीन होऊन गुन्हेगारी मार्गावर जाण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शाळा, महाविद्यालये सुुरू करावी, अशी मागणी होत आहे.

 

कोटीच्या घरात विद्यार्थी घरी बसणे हा एक टाइम बॉम्बच आहे. शाळा व महाविद्यालये बंद असल्याने त्यांचे विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम जाणवू लागले आहेत. यासंदर्भात ‘युनेस्को’च्या अहवालातही नोंद करण्यात आली आहे. शिक्षण बंद असल्याने एक पिढी धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने सर्वांगीण विचार करून शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

-शंकरप्रसाद अग्निहोत्री, संस्थाध्यक्ष, जय महाकाली शिक्षण संस्था, वर्धा

----------------------------------------------------

टॅग्स :onlineऑनलाइनEducation Sectorशिक्षण क्षेत्र