शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

लग्नानंतर अवघ्या पाच दिवसात नवरदेवाला झाला कोरोना; त्याच्या संपर्कातील चारजणही पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 18:02 IST

३० जून रोजी या नवरदेवाचे लग्न झाले होते. नंतर पाचच दिवसांनी त्याला कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल तर त्याच्यासोबत असलेल्या चारही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देवर्धा शहरासह लगतच्या नऊ ग्रा.पं.परिसरात सक्तीची संचारबंदीविनाकारण फिरणाऱ्यास होणार दंड१२ चमू करणार प्रभावी अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पिपरी (मेघे) येथील नवविवाहित तरुणाच्या निकट संपर्कातील व्यक्तींपैकी चार व्यक्तींचे कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी वर्धा शहरासह वर्धा शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकूण १२ चमू विशेष प्रयत्न करणार असून विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.३० जून रोजी या नवरदेवाचे लग्न झाले होते. नंतर पाचच दिवसांनी त्याला कोरोनासदृश लक्षणे दिसत असल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल तर त्याच्यासोबत असलेल्या चारही जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.वर्धा उपविभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या नऊ ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून सोमवार १३ जुलै रात्री ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय वर्धा शहरासह शहराशेजारील रहिवासी असलेल्या नागरिकांनी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी केले आहे. संचार बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सेवाग्राम, सावंगी (मेघे), रामनगर, वर्धा शहर या चार पोलीस स्टेशन मधील ठाणेदारांच्या नेतृत्त्वातील प्रत्येकी एक चमू, गटविकास अधिकारी स्वाती इसाये यांच्या नेतृत्त्वातील दोन चमू, महसूल विभागाच्या तीन चमू तसेच वर्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांच्या नेतृत्त्वातील तीन चमू विशेष प्रयत्न करणार आहेत.मोजकीच सेवा राहणार सुरूउपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांच्या आदेशानुसार बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे), सिंदी (मेघे), नालवाडी, आलोडी, म्हसाळा, साटोडा, पिपरी (मेघे), उमरी (मेघे) या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पुढील तीन दिवस केवळ औषधी दुकाने, दवाखाने, दूध, वर्तमान पत्र वाटप, अत्यावश्यक शासकीय कार्यालय सुरू राहणार आहेत.सध्याच्या कोरोना संकटात यापूर्वी वर्धेकरांनी जिल्हा प्रशासनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १३ जुलैपर्यंत वर्धा शहरासह शहराशेजारील नऊ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रासाठी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. स्वत: कोरोनामुक्त राहण्यासाठी पुढील तीन दिवस नागरिकांनी घरातच रहावे. तसेच जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे.- सुरेश बगळे, उपविभागीय महसूल अधिकारी वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस