शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधूनच विकास साधणार

By admin | Updated: June 15, 2016 02:35 IST

अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या असमन्वयामुळे शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात अडसर निर्माण झाला आहे.

नयना गुंडे : डिसेंबरपर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करणारवर्धा : अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या असमन्वयामुळे शासनाच्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यात अडसर निर्माण झाला आहे. यापुढे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राखूनच जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास साधत जिल्ह्याचे आघाडीपण कायम राखू, असा विश्वास नव्याने रूजू झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी संवादमध्ये व्यक्त केला.सीईओ गुंडे यांचा प्रशासकीय सेवेचा अनुभव दांडगा आहे. १९९९ मध्ये त्यांनी उस्मानाबाद येथून उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. नंतर नाशिक, सोलापूर, सातारा जिल्ह्यात महत्त्वाची पदे भूषविली. बेस्ट महसूल अधिकारी म्हणून त्यांचा शासनाने सन्मान देखील केलेला आहे. राजपत्रित अधिकारी संघटनेचे नेतृत्वही त्यांनी केलेले आहे. २००७ मध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून म्हाडात कर्तव्य बजावले आहे. नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त नंतर वर्धेच्या सीईओ म्हणून नुकत्याच रूजू झाल्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी संवादच्या माध्यमातून पत्रकारांशी वार्तालाप केला.सीईओ म्हणून पदाभार स्वीकारताच त्यांनी जिल्ह्याचे दौरे सुरू केले. वर्धा जिल्हा गोदरीमुक्त करण्याचा त्यांचा मानस आहे. नुकतीच आर्वी येथे ग्रामसेवकांची बैठक घेऊन ग्रामसेवकांकडून हे ध्येय कधीपर्यंत पूर्ण करायचे, याची माहिती जाणून घेतली. असेच दौरे अन्य तालुक्यांमध्येही करणार असल्याचे गुंडे म्हणाल्या. वर्धा जिल्ह्यात ४७ हजार शौचालयाची गरज आहे. राज्यातील जे १० जिल्हे गोदरीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे, त्या जिल्ह्यांमध्ये नागपूर विभागातील नागपूर, भंडारा, गोदिंयासह वर्धा जिल्ह्याचा समावेश असल्याची माहितीही गुंडे यांनी यावेळी दिली. पाणी विषयावर काम करण्यास जिल्ह्यात भरपूर वाव असल्याचेही त्या म्हणाल्या. ४४ गावांनी नळांना मीटर लावण्याचे प्रस्ताव पाठविले आहे. ही चांगलीच बाब आहे. याअनुषंगाने काम केले जाणार असून उमरी(मेघे) प्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावांत २४ बाय ७ योजना लागू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. शासनाच्या योजना खूप चांगल्या आहे. अंमलबजावणी योग्य प्रकारे केलीत, तर अधिकाऱ्यांना नवीन काही करून दाखविण्याची गरज नाही. आपला कलही योजनांच्या अंमलबजावणीवर राहील, असेही सीईओ म्हणाल्या.(जिल्हा प्रतिनिधी)