शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकांवर थंड पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: March 31, 2016 02:42 IST

जवळपासच्या गावी जाण्यासाठी बहुतेक नागरिक हे बसला प्राधान्य देतात. किंबहुना तोच एक साधा व सोपा पर्याय प्रवाश्यांपाशी असतो.

वर्धा : जवळपासच्या गावी जाण्यासाठी बहुतेक नागरिक हे बसला प्राधान्य देतात. किंबहुना तोच एक साधा व सोपा पर्याय प्रवाश्यांपाशी असतो. त्यामुळेच प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे नामाबिरूद एस. टी. आगाराने धारण केले आहे. पण ही सेवा भर उन्हाळ्यात पाण्यासारखीच आटल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्यातील बहुतेक बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची तोकडी सुविधा आढळून येते. अनेक ठिकाणी जलप्याऊ आहे म्हणायलाच उभे आहेत पाण्याच्या टाकींची स्वच्छता होत नाही. पाणी पिण्यासाठी गेले असता प्रवाश्यांना कोरडाच हात ठेवत माघारी फिरावे लागते. उन्हाचा दाह वाढत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान पाण्यासाठी प्रवाश्यांची भटकंती सुरू होते. पाण्याची स्वच्छता किती किंवा ती होते का याबाबत तर विचारूच नये अशी स्थिती आहे. ज्या स्थानकावर पाण्याची व्यवस्था आहे तिथे सध्या पाणी पिताना आधी हात भाजेल अशी अवस्था आहे. त्यामुळे पाणी असूनही ते पिता येत नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील बहुतेक बस्थानकावर हाच प्रकार पहावयास मिळतो. त्यामुळे एस ती आगार मिरवत असलेले प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रिद नेमक्या कुठल्या सेवेसाठी हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो. सर्वच ठिकाणी थड पाण्याचे पाऊच, बाटलीबंद पाणी विकत स्वरुपात सहज स्वरुपात मिळते. त्यामुळे चार दमड्या खिशात असलेल्यांना पाण्याच्या सुविधेबाबत कुठलाही प्रश्न पडत नसला तरी सामान्य नागरिकांवर मात्र अनेकदा घसा कोरडा ठेवण्याचीच वेळ येत आहे.