शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

बसस्थानकांवर थंड पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: March 31, 2016 02:42 IST

जवळपासच्या गावी जाण्यासाठी बहुतेक नागरिक हे बसला प्राधान्य देतात. किंबहुना तोच एक साधा व सोपा पर्याय प्रवाश्यांपाशी असतो.

वर्धा : जवळपासच्या गावी जाण्यासाठी बहुतेक नागरिक हे बसला प्राधान्य देतात. किंबहुना तोच एक साधा व सोपा पर्याय प्रवाश्यांपाशी असतो. त्यामुळेच प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे नामाबिरूद एस. टी. आगाराने धारण केले आहे. पण ही सेवा भर उन्हाळ्यात पाण्यासारखीच आटल्याचे आढळून येत आहे. जिल्ह्यातील बहुतेक बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची तोकडी सुविधा आढळून येते. अनेक ठिकाणी जलप्याऊ आहे म्हणायलाच उभे आहेत पाण्याच्या टाकींची स्वच्छता होत नाही. पाणी पिण्यासाठी गेले असता प्रवाश्यांना कोरडाच हात ठेवत माघारी फिरावे लागते. उन्हाचा दाह वाढत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान पाण्यासाठी प्रवाश्यांची भटकंती सुरू होते. पाण्याची स्वच्छता किती किंवा ती होते का याबाबत तर विचारूच नये अशी स्थिती आहे. ज्या स्थानकावर पाण्याची व्यवस्था आहे तिथे सध्या पाणी पिताना आधी हात भाजेल अशी अवस्था आहे. त्यामुळे पाणी असूनही ते पिता येत नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील बहुतेक बस्थानकावर हाच प्रकार पहावयास मिळतो. त्यामुळे एस ती आगार मिरवत असलेले प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रिद नेमक्या कुठल्या सेवेसाठी हा प्रश्न शेवटी अनुत्तरितच राहतो. सर्वच ठिकाणी थड पाण्याचे पाऊच, बाटलीबंद पाणी विकत स्वरुपात सहज स्वरुपात मिळते. त्यामुळे चार दमड्या खिशात असलेल्यांना पाण्याच्या सुविधेबाबत कुठलाही प्रश्न पडत नसला तरी सामान्य नागरिकांवर मात्र अनेकदा घसा कोरडा ठेवण्याचीच वेळ येत आहे.