शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शीतलता देणाऱ्या पेयांमुळे अनेकांच्या हातांना काम

By admin | Updated: May 19, 2016 01:46 IST

जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंशांची सीमा ओलांडली आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहे.

भर उन्हातही होते विक्री : फिरत्या रसवंत्यांचाही आधारपुलगाव : जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंशांची सीमा ओलांडली आहे. सूर्य आग ओकू लागला आहे. यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले आहे. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हामुळे शरीराचे उष्णतामान वाढत असून टपरी, ठेल्यावर थंडपेय, ऊसाचा रस, थंडगार बर्फाचे रंगबेरंगी विविध चवीचे आईसगोले, कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी आदी शीतपेय तहानलेल्या जीवांना शीतलता देत आहे. सोबतच शहर व परप्रांतीय बेराजगारांना रोजगारही मिळाला आहे.सध्या शहरात आईसगोले व आईस डिशचा स्वाद घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे काही प्रमाणात आईस्क्रीम, कुल्फी व रसवंती आदी व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. शिवाय शहराच्या प्रत्येक भागात फिरत्या रसवंतीच्या हातगाड्याही दिसतात. यामुळे घरपोच ऊसाचा रस, निंबू शरबत, कुल्फी, आईस्क्रीम मिळत आहे. शहरात सुमारे ३५ ते ४० हातगाड्या फिरत असून या माध्यमातून बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड आदी राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. इतकेच नव्हे तर आजच्या बदलत्या परिस्थितीत लग्न समारंभ, मुंज, वाढदिवस आदी अनेक मंगल समारंभात स्वरूची भोजनासोबतच आईसगोला, आईसडिश, कुल्फी, आईस्क्रीम आदींचे स्टॉल लागतात. यामुळे गळ्याला शीतलता देणाऱ्या थंडपेयांची मागणीही वाढली आहे.भगतसिंग चौकात सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत हातगाडीवर आईसगोला साहित्य थाटून बसणारे बब्बूभाई मशिनच्या साह्याने तयार केलेला गोला कम आईस बार व विविध रंग टाकलेली आईसडीश शौकीन मंडळीचे आकर्षण ठरत आहे. इतकेच नव्हे तर या आईसगोला वा आईस डिशसाठी चांगलीच गर्दी होते. शहरातील राम व श्याम या जुळ्या केशरवाणी बंधूंचा जय माता दी नावाने प्रसिद्ध असलेला आईसगोला लग्न समारंभात निमंत्रितांचे लक्ष वेधतो. भर उन्हातही दुपारपासून रात्रीपर्यंत शहरातील विविध भागात थंडपेयाच्या बंड्या शौकिनांना शीतलता बहाल करताना दिसून येतात.(तालुका प्रतिनिधी)