शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

३५ गावांना दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

जि.प.च्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिह्यातील आठ तालुक्यात स्वच्छता सर्व्हेक्षण अभिायान राबविण्यात आले होते. या अभियानात सार्वजनिक जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार, जलस्त्रोतांचा परिसर, विहिरी, कुपनलीकांमध्ये झिरपणारे दूषित पाणी यांची पाहणी करून संबंधीत ग्रा.पं.च्या हद्दीतील पाण्याचा दर्जा ठरविण्यात आला.

ठळक मुद्देस्वच्छ सर्र्वेेक्षणात उलगडले सत्य : ४८६ ग्रामपंचायतींना मिळाले ‘ग्रीन कार्ड’

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या जनजागृती तसेच दर सहा महिन्यांनी जलस्त्रोतांची करण्यात येणाऱ्या तपासणीमुळे आठ तालुक्यातील ३२ ग्रा.पं.अंतर्गत येणाऱ्या ३५ गावांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तर १०५ जलस्त्रोत जोखीमग्रस्त असल्याचे वास्तव पुढे आले आहे.जि.प.च्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिह्यातील आठ तालुक्यात स्वच्छता सर्व्हेक्षण अभिायान राबविण्यात आले होते. या अभियानात सार्वजनिक जलस्त्रोतांची पाहणी करण्यात आली होती. त्यानुसार, जलस्त्रोतांचा परिसर, विहिरी, कुपनलीकांमध्ये झिरपणारे दूषित पाणी यांची पाहणी करून संबंधीत ग्रा.पं.च्या हद्दीतील पाण्याचा दर्जा ठरविण्यात आला. पाण्याच्या दर्जानुसार संबंधित ग्रा.पं.ला लाल, पिवळे व हिरवे कार्ड देण्यात आले. ज्या ग्रा.पं.मध्ये अतिदूषित पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, त्या ग्रा.पं.ला लाल, कमी दुषित पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ग्रा.पं.ला पिवळे, तर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ग्रा.पं.ला हिरवे कार्ड देण्यात येते. विशेष म्हणजे ज्या ग्रा.पं.च्या हद्दीत चार वर्षांच्या कालावधीत एकदाही जलजन्य आजाराची नोंद झाली नाही त्या गावांना चंदेरी कार्ड देण्यात येते. वर्धा जिल्ह्यातील ८ तालुक्यातील ५१८ ग्रा.पं.च्या जलस्त्रोतांचे नुकतेच सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये कमी दूषित असणाऱ्या ३२ ग्रा.पं.ना पिवळे कार्ड देण्यात आले. तर ४८६ ग्रा.पं.ला हिरवे कार्ड देण्यात आले आहे. ऑक्टोंबर मान्सूनपश्चात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एकाही ग्रा.पं.ला लालकार्ड मिळाले नाही. तर ३२ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले असल्याचे खात्रीदायक सूत्रांकडून सांगण्यात आले.उद्योग उठले नागरिकांसह वन्यप्राण्यांच्या जीवावरजिल्ह्यातील भूगाव, बरबडी, सेलूकाटे, इंझापूर, चितोडा, वरूड आदी गावांत विविध उद्योग समूह असल्याने या ग्रामपंचायतीअंतर्गत होणारा पाणीपुरवठा अतिदूषित आहे; पण आरोग्य पाणी पुरवठा विभागाकडून आरो प्लान्ट बसविण्यात आले आहे. तरीही औद्योगिक वसाहतींच्या प्रदूषणामुळे पिण्यायोग्य पाणी दूषित झाले आहे.यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून वन्यप्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.आर.ओ. प्लान्ट उभारण्याची गरजजिल्ह्यातील ३२ ग्रा.पं.अंतर्गत दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्यायोग्य पाणी पुरवठा होण्यासाठी आर. ओ. प्लान्ट बसविण्याची गरज आहे. यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणे गरजेचे असून लोकसहभागातून आर.ओ. प्लान्ट बसविला जाऊ शकतो. त्यातही प्रशासनानेही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण