शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

नागपूर-अमरावती मार्गावर कंटेनर उलटला; ३३ मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 14:09 IST

मुंबईतील भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर कारंजा (घा.) तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मुंबईतील भिवंडी येथून मजुरांना घेऊन इलाहाबादकडे जाणारा भरधाव कंटेनर कारंजा (घा.) तालुक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात उलटला. या अपघातात ३३ मजूर जखमी झाले. जखमींमध्ये तीन महिलांसह तीन मुलांचा समावेश आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजुरांमध्ये संभ्रम व दहशतीचे वातावरण आहे. परप्रांतीयांच्या घरवापसीसाठी केंद्र सरकारच्यावतीने विशेष प्रवासी रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्या तरी हाताला काम नसलेले मजूर मिळेल त्या साधनाने घर गाठण्यासाठी लगीन घाई करीत आहेत. असेच काही मजूर काही मजूर भिवंडी येथून कंटेनरने अलाहाबादच्या दिशेने निघाले होते. भरधाव कंटेनर नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात आला असता वाहनचालकाचे वाहनावरिल नियंत्रण सुटले अशातच वाहन उलटले. यात कंटेनरमधील एकूण ३३ जण जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना रुग्णालयाकडे रवाना केले. जखमींपैकी चार व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सदर जखमींवर डॉ. अनुपम हिवलेकर, डॉ. इंदुरकर, डॉ. खुजे उपचार करीत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात