शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दरदिवशी साडेपाच हजार युवकांकडून पहिल्यांदा सेवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात.

ठळक मुद्देजागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन; समाजातील सर्वच घटकांचा पुढाकार गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तंबाखू कंपन्यांच्या चक्रव्युहातून युवकांना बाहेर काढून तरुणांना तंबाखू व निकोटिन वापरण्यापासून प्रतिबंधित करणे ही यावर्षीची जागतिक आरोग्य संघटनेची मुख्य संकल्पना आहे. अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेवन करतात. देशात दरदिवशी ३ हजार ५०० लोक केवळ तंबाखू सेवन केल्याने मृत्युमुखी पडत आहे. रविवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी चिंतित करणारी आहे.सलाम मुंबई फाऊंडेशन विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना सुरक्षित व आरोग्यपूर्ण भविष्यासाठी तंबाखूमुक्त वातावरण मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. शासनही तंबाखूमुक्त शाळांचे ध्येय १०० टक्के साध्य करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाच्या माध्यमातून ८ राज्यातील १ लाख ३७ हजार २३ शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. ५८५ सेवाभावी संस्थादेखील या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत एकूण ३१ हजार ७०७ शाळां तंबाखूमुक्त झालेल्या आहेत.युवावर्गाला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी आणि युवापिढीचे आरोग्य बाधित ठेवण्यासाठी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन २०२० ची मोहीम सलाम मुंबई फाऊंडेशन, शिक्षण विभाग संयुक्तरीत्या राबविणार आहे.३१ मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त आपण सर्वांनी वचनबद्ध होऊन, आपल्या देशातील भावी पिढीला तंबाखूच्या चक्रव्युहातून बाहेर काढले पाहिले.आपल्या देशातील भावी पिढी सुजाण आणि सशक्त करण्यासाठी सर्व शाळा या तंबाखू मुक्त असायला हव्यात. युवक ही भारताची शक्ती आहे. आणि ही शक्ती सशक्त आणि तंबाखुमुक्त असायला हवी यासाठी शासकीय व अशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व शिक्षक, अधिकारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांनी पुढाकार घ्यायला हवा.आजघडीला संपूर्ण देश कोविड-१९ या महामारीने ग्रासलेला आहे. तंबाखू सेवनाने कोरोनाचा प्रसार अधिक होऊ शकतो. यासाठी सर्वांनी एकत्र येत तंबाखू सेवन विरोधी मोहीम अधिक मजबूत करायला हवी. आपली शाळा, घर, गाव आणि परिसर तंबाखूमुक्त करणे आपली सर्वांची जबाबदारी आहे.-डॉ. साधना तायडे, संचालक, आरोग्य विभाग.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी