शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
4
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
5
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
6
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
7
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
8
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
9
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
10
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
11
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
12
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
13
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
14
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
15
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
16
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
17
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
18
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
19
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट

पाटबंधारे विभागामुळे वर्षभरापासून रखडले पुलाचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २० जुलै २०१८ रोजी कंत्राटदाराला या पुलाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश दिला असून वर्षभरात हे काम पूर्ण करायचे होते.

ठळक मुद्देपवनारच्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास : प्रशासनाला दिला सात दिवसाचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार/वर्धा : नजीकच्या पवनार येथील पवनार-वाहितपूर मार्गावरील धामनदीवर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, बांधकामाच्या जागेपासून जवळच असलेल्या बंधाºयात पाणी साठवून असल्याने बांधकाम करणे शक्य होत नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाला वारंवार सूचना करूनही सहकार्य केले जात नसल्याने गेल्या वर्षभरापासून पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माजी सरपंच अजय गांडोळे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देत येत्या सात दिवसांत पाणीपातळी कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २० जुलै २०१८ रोजी कंत्राटदाराला या पुलाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश दिला असून वर्षभरात हे काम पूर्ण करायचे होते. दहा पिल्लरवर उभारण्यात येणाऱ्या या पुलाच्या आठ पिल्लरचे काम नदीपात्रातील पाणीपातळीमुळे अर्धवटच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार पुलाच्या बांधकामाकरिता प्रयत्नशील असून या पुलाच्या बांधकामापासून १ किलोमीटर अंतरावर एमआयडीसीकरिता असलेल्या बंधाºयामुळे येथे पाणी साठवूण राहात आहे. परिणामी, बांधकाम करण्यास अडचणीचे जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन बंधाºयातील पाणी सोडून पाण्याची पातळी कमी करण्यास सांगितले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने ते शक्य नसल्याचे सांगितल्याने बांधकाम थांबलेले आहे. पावसाळ्यापूर्वीच बांधकाम करणे शक्य असल्याने आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या दिवसात हे बांधकाम पूर्णत्वास गेले नाही तर शेतकऱ्यांची बिकट वहिवाट कायम राहणार आहे.त्यामुळे पाटबंधारे विभाग यांना एमआयडीसी बंधाऱ्याचे गेट खोलून पाण्याची पातळी कमी करण्यास आदेश द्यावे, जेणे करुन पुलाचे काम तीन महिन्याच्या आत पूर्ण करणे शक्य होईल, अशी मागणी पवनार येथील माजी सरपंच अजय गांडोळे, दुष्यंत खोडे, चंदू उमाटे, दिलीप वंजारी यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.बंधाऱ्यावरील पुलावरही लावला फलकपवनार येथील धाम नदीपात्रात बांधण्यात आलेल्या एमआयडीसीच्या बंधाºयावरील पुलावरसुद्धा हा मार्ग वाहतुकीकरिता उपयोगाचा नसल्याचा फलक लावला आहे. त्यामुळे शेतकºयांपुढे शेती कशा पद्धतीने करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पPavnarपवनार