शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागामुळे वर्षभरापासून रखडले पुलाचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २० जुलै २०१८ रोजी कंत्राटदाराला या पुलाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश दिला असून वर्षभरात हे काम पूर्ण करायचे होते.

ठळक मुद्देपवनारच्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास : प्रशासनाला दिला सात दिवसाचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार/वर्धा : नजीकच्या पवनार येथील पवनार-वाहितपूर मार्गावरील धामनदीवर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, बांधकामाच्या जागेपासून जवळच असलेल्या बंधाºयात पाणी साठवून असल्याने बांधकाम करणे शक्य होत नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाला वारंवार सूचना करूनही सहकार्य केले जात नसल्याने गेल्या वर्षभरापासून पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माजी सरपंच अजय गांडोळे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देत येत्या सात दिवसांत पाणीपातळी कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २० जुलै २०१८ रोजी कंत्राटदाराला या पुलाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश दिला असून वर्षभरात हे काम पूर्ण करायचे होते. दहा पिल्लरवर उभारण्यात येणाऱ्या या पुलाच्या आठ पिल्लरचे काम नदीपात्रातील पाणीपातळीमुळे अर्धवटच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार पुलाच्या बांधकामाकरिता प्रयत्नशील असून या पुलाच्या बांधकामापासून १ किलोमीटर अंतरावर एमआयडीसीकरिता असलेल्या बंधाºयामुळे येथे पाणी साठवूण राहात आहे. परिणामी, बांधकाम करण्यास अडचणीचे जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन बंधाºयातील पाणी सोडून पाण्याची पातळी कमी करण्यास सांगितले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने ते शक्य नसल्याचे सांगितल्याने बांधकाम थांबलेले आहे. पावसाळ्यापूर्वीच बांधकाम करणे शक्य असल्याने आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या दिवसात हे बांधकाम पूर्णत्वास गेले नाही तर शेतकऱ्यांची बिकट वहिवाट कायम राहणार आहे.त्यामुळे पाटबंधारे विभाग यांना एमआयडीसी बंधाऱ्याचे गेट खोलून पाण्याची पातळी कमी करण्यास आदेश द्यावे, जेणे करुन पुलाचे काम तीन महिन्याच्या आत पूर्ण करणे शक्य होईल, अशी मागणी पवनार येथील माजी सरपंच अजय गांडोळे, दुष्यंत खोडे, चंदू उमाटे, दिलीप वंजारी यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.बंधाऱ्यावरील पुलावरही लावला फलकपवनार येथील धाम नदीपात्रात बांधण्यात आलेल्या एमआयडीसीच्या बंधाºयावरील पुलावरसुद्धा हा मार्ग वाहतुकीकरिता उपयोगाचा नसल्याचा फलक लावला आहे. त्यामुळे शेतकºयांपुढे शेती कशा पद्धतीने करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पPavnarपवनार