शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

पाटबंधारे विभागामुळे वर्षभरापासून रखडले पुलाचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २० जुलै २०१८ रोजी कंत्राटदाराला या पुलाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश दिला असून वर्षभरात हे काम पूर्ण करायचे होते.

ठळक मुद्देपवनारच्या शेतकऱ्यांचा जीवघेणा प्रवास : प्रशासनाला दिला सात दिवसाचा अल्टिमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार/वर्धा : नजीकच्या पवनार येथील पवनार-वाहितपूर मार्गावरील धामनदीवर पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मात्र, बांधकामाच्या जागेपासून जवळच असलेल्या बंधाºयात पाणी साठवून असल्याने बांधकाम करणे शक्य होत नाही. यासंदर्भात पाटबंधारे विभागाला वारंवार सूचना करूनही सहकार्य केले जात नसल्याने गेल्या वर्षभरापासून पुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माजी सरपंच अजय गांडोळे यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांना निवेदन देत येत्या सात दिवसांत पाणीपातळी कमी करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. २० जुलै २०१८ रोजी कंत्राटदाराला या पुलाच्या बांधकामाचा कार्यारंभ आदेश दिला असून वर्षभरात हे काम पूर्ण करायचे होते. दहा पिल्लरवर उभारण्यात येणाऱ्या या पुलाच्या आठ पिल्लरचे काम नदीपात्रातील पाणीपातळीमुळे अर्धवटच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार पुलाच्या बांधकामाकरिता प्रयत्नशील असून या पुलाच्या बांधकामापासून १ किलोमीटर अंतरावर एमआयडीसीकरिता असलेल्या बंधाºयामुळे येथे पाणी साठवूण राहात आहे. परिणामी, बांधकाम करण्यास अडचणीचे जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र देऊन बंधाºयातील पाणी सोडून पाण्याची पातळी कमी करण्यास सांगितले होते. मात्र, पाटबंधारे विभागाने ते शक्य नसल्याचे सांगितल्याने बांधकाम थांबलेले आहे. पावसाळ्यापूर्वीच बांधकाम करणे शक्य असल्याने आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. या दिवसात हे बांधकाम पूर्णत्वास गेले नाही तर शेतकऱ्यांची बिकट वहिवाट कायम राहणार आहे.त्यामुळे पाटबंधारे विभाग यांना एमआयडीसी बंधाऱ्याचे गेट खोलून पाण्याची पातळी कमी करण्यास आदेश द्यावे, जेणे करुन पुलाचे काम तीन महिन्याच्या आत पूर्ण करणे शक्य होईल, अशी मागणी पवनार येथील माजी सरपंच अजय गांडोळे, दुष्यंत खोडे, चंदू उमाटे, दिलीप वंजारी यांच्यासह शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.बंधाऱ्यावरील पुलावरही लावला फलकपवनार येथील धाम नदीपात्रात बांधण्यात आलेल्या एमआयडीसीच्या बंधाºयावरील पुलावरसुद्धा हा मार्ग वाहतुकीकरिता उपयोगाचा नसल्याचा फलक लावला आहे. त्यामुळे शेतकºयांपुढे शेती कशा पद्धतीने करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पPavnarपवनार