शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये गोदामे बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:37 IST

धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदाम उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देशेतमालाची होणार साठवणूकशासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार आधार

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी अतिशय परिश्रमाने पिकविलेला शेतमाल सुरक्षित राहावा आणि किमान आधारभूत किंमतीने खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदाम उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या गोदामाच्या बांधकामसाठी १०९.८४ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या माध्यमातून शेतमालाची उत्कृष्ठरित्या साठवणूक करता येईल. बाजारपेठेत चांगला दर मिळेल त्यावेळी शेतमालाची विक्री करता येईल. या सोयीमुळे बाजारपेठेत धान्यमालाला चांगला दर राहिल्यास विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.शेतकरी अत्यंत परिश्रमाने शेतमाल उत्पादीत करतो, मात्र त्यावेळी त्याला योग्य बाजारभाव मिळेल याची हमी नसते. पिकांची काढणी सुरू झाले की, बाजारात दर पडतात. आवक प्रचंड वाढली की, मातीमोल किेंमतीत धान्यमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. शेतमाल हाती येताच दर पडले तर शेतमाल तारण योजनेत बाजार समित्यांच्या गोदामात शेतमाल ठेवला जातो. यावर कर्ज देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आहे. पणनच्या माध्यमातून धान्याची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल आणि किमान आधारभूत किंमतीने बाजार समित्यांनी खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यासाठी सुसज्ज अशा गोदामांची मोठी अडचण भासते. ही बाब लक्षात घेवून बाजार समित्यांनी गोदाम बांधण्यासाठी पणनकडे प्रस्ताव सादर केले होते. त्याला सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे राज्यात १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदामं उभारण्यात येणार आहे. गोदाम बांधकामाचा खर्च केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून आणि पणन व बाजार समितीच्या निधीतून होणार आहे. यामुळे शेतकºयांचा धान्यसाठा सुरक्षीत ठेऊन वाढीव दर असताना विकणे सोयीचे ठरणार आहे. या गोदामांमुळे बाजार समिती आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.पणन महामंडळाच्या देखरेखीत होणार गोदामाचे बांधकामबांधण्यात येणाऱ्या गोदामांचे प्रमाणिकरण होणार आहे. बाजार समितीच्या आवारात पणन मंडळाच्या देखरेखीखाली गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. गोदामांची उभारणी चांगल्या पद्धतीने दर्जेदार, आवश्यक त्या मोजमापात व नियोजित आराखड्यानुसार झाली पाहिजे हे तपासण्यासाठी नवी दिल्ली येथील वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी लक्ष ठेवणार आहे. त्यानंतरच बांधकाम पूर्ण झालेले गोदाम बाजार समित्यांकडे वापरण्यासाठी हस्तांतरीत होणार आहे. राज्यात १०८ नवे गोदामं होत असले तरी कमीच पडतील. ते वाढवून देण्याची आवश्यकता आहे.

वर्धा जिल्ह्यात केवळ सेलू व हिंगणघाट येथे हे गोदाम मंजूर आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. धान्याचे भाव कमी असताना शेतकरी गोदामात शेतमाल ठेवू शकतो व भाव समाधानकारक वाढल्यास त्यावेळी विकू शकतो. यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होतो..आय.आय.सुफी, सचिवकृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे), ता. सेलू,एक हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी ५२ टक्के एवढी रक्कम संबंधीत बाजार समितीला द्यावी लागेल, तर ४८ टक्के रक्कम राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत मिळेल. वर्धा जिल्ह्यात सेलू व हिंगणघाट येथे प्राधान्याने या योजनेअंतर्गत गोदामे मंजूर झाली असून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल आता त्यांना यात ठेवता येईल. हे काम लवकर व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.विद्याधर वानखेडे, सभापतीकृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे), ता. सेलू, जि. वर्धा

टॅग्स :agricultureशेती