शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये गोदामे बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:37 IST

धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदाम उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देशेतमालाची होणार साठवणूकशासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणार आधार

प्रफुल्ल लुंगे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांनी अतिशय परिश्रमाने पिकविलेला शेतमाल सुरक्षित राहावा आणि किमान आधारभूत किंमतीने खरेदी केलेल्या धान्याची साठवणूक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी राज्यातील १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदाम उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.या गोदामाच्या बांधकामसाठी १०९.८४ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. या माध्यमातून शेतमालाची उत्कृष्ठरित्या साठवणूक करता येईल. बाजारपेठेत चांगला दर मिळेल त्यावेळी शेतमालाची विक्री करता येईल. या सोयीमुळे बाजारपेठेत धान्यमालाला चांगला दर राहिल्यास विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे.शेतकरी अत्यंत परिश्रमाने शेतमाल उत्पादीत करतो, मात्र त्यावेळी त्याला योग्य बाजारभाव मिळेल याची हमी नसते. पिकांची काढणी सुरू झाले की, बाजारात दर पडतात. आवक प्रचंड वाढली की, मातीमोल किेंमतीत धान्यमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. यामुळे उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शेतमाल तारण योजना सुरू केली आहे. शेतमाल हाती येताच दर पडले तर शेतमाल तारण योजनेत बाजार समित्यांच्या गोदामात शेतमाल ठेवला जातो. यावर कर्ज देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आहे. पणनच्या माध्यमातून धान्याची खरेदी केली जाते. शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल आणि किमान आधारभूत किंमतीने बाजार समित्यांनी खरेदी केलेला शेतमाल ठेवण्यासाठी सुसज्ज अशा गोदामांची मोठी अडचण भासते. ही बाब लक्षात घेवून बाजार समित्यांनी गोदाम बांधण्यासाठी पणनकडे प्रस्ताव सादर केले होते. त्याला सरकारने मंजूरी दिली आहे. यामुळे राज्यात १०८ बाजार समित्यांमध्ये प्रत्येकी एक हजार मेट्रीक टन क्षमतेची गोदामं उभारण्यात येणार आहे. गोदाम बांधकामाचा खर्च केंद्र व राज्य शासनाच्या मदतीतून आणि पणन व बाजार समितीच्या निधीतून होणार आहे. यामुळे शेतकºयांचा धान्यसाठा सुरक्षीत ठेऊन वाढीव दर असताना विकणे सोयीचे ठरणार आहे. या गोदामांमुळे बाजार समिती आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.पणन महामंडळाच्या देखरेखीत होणार गोदामाचे बांधकामबांधण्यात येणाऱ्या गोदामांचे प्रमाणिकरण होणार आहे. बाजार समितीच्या आवारात पणन मंडळाच्या देखरेखीखाली गोदामांची उभारणी करण्यात येणार आहे. गोदामांची उभारणी चांगल्या पद्धतीने दर्जेदार, आवश्यक त्या मोजमापात व नियोजित आराखड्यानुसार झाली पाहिजे हे तपासण्यासाठी नवी दिल्ली येथील वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी लक्ष ठेवणार आहे. त्यानंतरच बांधकाम पूर्ण झालेले गोदाम बाजार समित्यांकडे वापरण्यासाठी हस्तांतरीत होणार आहे. राज्यात १०८ नवे गोदामं होत असले तरी कमीच पडतील. ते वाढवून देण्याची आवश्यकता आहे.

वर्धा जिल्ह्यात केवळ सेलू व हिंगणघाट येथे हे गोदाम मंजूर आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. धान्याचे भाव कमी असताना शेतकरी गोदामात शेतमाल ठेवू शकतो व भाव समाधानकारक वाढल्यास त्यावेळी विकू शकतो. यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होतो..आय.आय.सुफी, सचिवकृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे), ता. सेलू,एक हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम बांधण्यासाठी ५२ टक्के एवढी रक्कम संबंधीत बाजार समितीला द्यावी लागेल, तर ४८ टक्के रक्कम राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत मिळेल. वर्धा जिल्ह्यात सेलू व हिंगणघाट येथे प्राधान्याने या योजनेअंतर्गत गोदामे मंजूर झाली असून शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला शेतमाल आता त्यांना यात ठेवता येईल. हे काम लवकर व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.विद्याधर वानखेडे, सभापतीकृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदी (रेल्वे), ता. सेलू, जि. वर्धा

टॅग्स :agricultureशेती