शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

देश चालविण्यासाठी संविधानाची गरज, राजदंडाची नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 21:57 IST

Wardha News देश चालविण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे, राजदंडाची नाही, असे मत दक्षिणायन आंदोलनाचे प्रणेते पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

सेवाग्राम : स्वातंत्र्यासाठी किती संघर्ष व त्याग करावा लागला हे त्या पिढींना माहिती आहे. लोकतंत्र चालविण्यासाठी अनुशासन पाहिजे. यासाठी संविधान आणि काही संस्था देशात कार्यरत आहेत; पण या संस्था आता विरोधकांना चाबूकचे काम करीत असल्याचे दिसून येते. देश चालविण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे, राजदंडाची नाही, असे मत दक्षिणायन आंदोलनाचे प्रणेते पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

दत्तपूर येथील मनोहर धाम येथे राष्ट्रीय युवा संघटनेच्या वतीने सात दिवसीय युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष अमरनाथ भाई तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशा बोथरा व राष्ट्रीय युवा संघटनेचे राष्ट्रीय संयोजक अजमत भाई उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, गांधी आणि डॉ. आंबेडकर यांनी लाेकांना प्रेरणा दिली. अनुशासनाशिवाय देश तर काय कुठलंही काम होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या देशाला चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे. गुजरातमध्ये दंगल झाली; पण कुणाला शिक्षा झाली; उलट सत्कार करण्यात आला. विरोधात बोलले तर सभासदत्व रद्द करतात. या देशात लोकतंत्र मृत झाल्यासारखे वाटते. मनोहर दिवान यांनी कुष्ठरोगींसाठी संस्था काढली; पण त्यांना पैसेही मिळत नाही, असे सांगताना त्यांनी जंतरमंतरवर देशाचे अन्यायग्रस्त खेळाडू गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत, त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन युवकांना केले. गेल्या २७ वर्षांपासून याच तारखेला आणि महिन्यात राष्ट्रीय शिबिर घेतले जाते. हे २८ वे शिबिर दत्तपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड व ओडिसा या राज्यातील १८० युवा शिबिरार्थी यात सहभागी झाले आहेत. जैसलमेर राजस्थान येथील तरुण गेवा व ॲड. रझिया मेहर या तरुणी शिबिरात सहभागी असून अशा वैचारिक आणि प्रत्यक्ष सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रेरणा देसाई यांनी करून दिला. प्रास्ताविक राष्ट्रीय संयोजक अजमतभाई यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत नागोसे यांनी केले.

परिस्थिती बदलत आहे, हार मानू नका : आशा बोथरा

देश, प्रेम निवडणुकीसाठी नाही. देशासाठी हृदयातून प्रेम पाहिजे. परिस्थिती बदलत आहे त्यामुळे हार मानू नका. आपण सर्व संविधानाला मानतो. तुमच्या मतांचे मूल्य समजून घ्या. या देशासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांचे योगदान आहे. संघर्षाची गरज आहे. आता देशाला वाचविण्याची गरज असल्याने सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आशा बोथरा यांनी केले.

लोकतंत्राच्या दिशेने वाटचाल करा : अमरनाथ भाई

सत्तेतील लोकांना संविधानाशी देणे-घेणे नाही. गांधीजींची हत्या करण्यात आली; पण गांधी विचार आजही कायम आहे. हिंदू राष्ट्र बनविण्याची यांना आता संधी मिळाली आहे. मी इमर्जन्सी पाहिली; पण तानाशाहीशी तुलना होऊ शकत नाही. अशा शिबिर, संमेलनाची गरज आहे. लोकांमधील प्रतिकाराची शक्ती परिस्थितीला बदलवू शकते. त्यामुळे लोकतंत्रच्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहन अमरनाथ भाई यांनी केले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम