शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

देश चालविण्यासाठी संविधानाची गरज, राजदंडाची नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 21:57 IST

Wardha News देश चालविण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे, राजदंडाची नाही, असे मत दक्षिणायन आंदोलनाचे प्रणेते पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

सेवाग्राम : स्वातंत्र्यासाठी किती संघर्ष व त्याग करावा लागला हे त्या पिढींना माहिती आहे. लोकतंत्र चालविण्यासाठी अनुशासन पाहिजे. यासाठी संविधान आणि काही संस्था देशात कार्यरत आहेत; पण या संस्था आता विरोधकांना चाबूकचे काम करीत असल्याचे दिसून येते. देश चालविण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे, राजदंडाची नाही, असे मत दक्षिणायन आंदोलनाचे प्रणेते पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

दत्तपूर येथील मनोहर धाम येथे राष्ट्रीय युवा संघटनेच्या वतीने सात दिवसीय युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष अमरनाथ भाई तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशा बोथरा व राष्ट्रीय युवा संघटनेचे राष्ट्रीय संयोजक अजमत भाई उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, गांधी आणि डॉ. आंबेडकर यांनी लाेकांना प्रेरणा दिली. अनुशासनाशिवाय देश तर काय कुठलंही काम होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या देशाला चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे. गुजरातमध्ये दंगल झाली; पण कुणाला शिक्षा झाली; उलट सत्कार करण्यात आला. विरोधात बोलले तर सभासदत्व रद्द करतात. या देशात लोकतंत्र मृत झाल्यासारखे वाटते. मनोहर दिवान यांनी कुष्ठरोगींसाठी संस्था काढली; पण त्यांना पैसेही मिळत नाही, असे सांगताना त्यांनी जंतरमंतरवर देशाचे अन्यायग्रस्त खेळाडू गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत, त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन युवकांना केले. गेल्या २७ वर्षांपासून याच तारखेला आणि महिन्यात राष्ट्रीय शिबिर घेतले जाते. हे २८ वे शिबिर दत्तपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड व ओडिसा या राज्यातील १८० युवा शिबिरार्थी यात सहभागी झाले आहेत. जैसलमेर राजस्थान येथील तरुण गेवा व ॲड. रझिया मेहर या तरुणी शिबिरात सहभागी असून अशा वैचारिक आणि प्रत्यक्ष सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रेरणा देसाई यांनी करून दिला. प्रास्ताविक राष्ट्रीय संयोजक अजमतभाई यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत नागोसे यांनी केले.

परिस्थिती बदलत आहे, हार मानू नका : आशा बोथरा

देश, प्रेम निवडणुकीसाठी नाही. देशासाठी हृदयातून प्रेम पाहिजे. परिस्थिती बदलत आहे त्यामुळे हार मानू नका. आपण सर्व संविधानाला मानतो. तुमच्या मतांचे मूल्य समजून घ्या. या देशासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांचे योगदान आहे. संघर्षाची गरज आहे. आता देशाला वाचविण्याची गरज असल्याने सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आशा बोथरा यांनी केले.

लोकतंत्राच्या दिशेने वाटचाल करा : अमरनाथ भाई

सत्तेतील लोकांना संविधानाशी देणे-घेणे नाही. गांधीजींची हत्या करण्यात आली; पण गांधी विचार आजही कायम आहे. हिंदू राष्ट्र बनविण्याची यांना आता संधी मिळाली आहे. मी इमर्जन्सी पाहिली; पण तानाशाहीशी तुलना होऊ शकत नाही. अशा शिबिर, संमेलनाची गरज आहे. लोकांमधील प्रतिकाराची शक्ती परिस्थितीला बदलवू शकते. त्यामुळे लोकतंत्रच्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहन अमरनाथ भाई यांनी केले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम