शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

देश चालविण्यासाठी संविधानाची गरज, राजदंडाची नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 21:57 IST

Wardha News देश चालविण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे, राजदंडाची नाही, असे मत दक्षिणायन आंदोलनाचे प्रणेते पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

सेवाग्राम : स्वातंत्र्यासाठी किती संघर्ष व त्याग करावा लागला हे त्या पिढींना माहिती आहे. लोकतंत्र चालविण्यासाठी अनुशासन पाहिजे. यासाठी संविधान आणि काही संस्था देशात कार्यरत आहेत; पण या संस्था आता विरोधकांना चाबूकचे काम करीत असल्याचे दिसून येते. देश चालविण्यासाठी संविधानाची आवश्यकता आहे, राजदंडाची नाही, असे मत दक्षिणायन आंदोलनाचे प्रणेते पद्मश्री डॉ. गणेश देवी यांनी व्यक्त केले.

दत्तपूर येथील मनोहर धाम येथे राष्ट्रीय युवा संघटनेच्या वतीने सात दिवसीय युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष अमरनाथ भाई तर प्रमुख अतिथी म्हणून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आशा बोथरा व राष्ट्रीय युवा संघटनेचे राष्ट्रीय संयोजक अजमत भाई उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. गणेश देवी म्हणाले, गांधी आणि डॉ. आंबेडकर यांनी लाेकांना प्रेरणा दिली. अनुशासनाशिवाय देश तर काय कुठलंही काम होऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या देशाला चालविण्यासाठी संविधान आवश्यक आहे. गुजरातमध्ये दंगल झाली; पण कुणाला शिक्षा झाली; उलट सत्कार करण्यात आला. विरोधात बोलले तर सभासदत्व रद्द करतात. या देशात लोकतंत्र मृत झाल्यासारखे वाटते. मनोहर दिवान यांनी कुष्ठरोगींसाठी संस्था काढली; पण त्यांना पैसेही मिळत नाही, असे सांगताना त्यांनी जंतरमंतरवर देशाचे अन्यायग्रस्त खेळाडू गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत, त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन युवकांना केले. गेल्या २७ वर्षांपासून याच तारखेला आणि महिन्यात राष्ट्रीय शिबिर घेतले जाते. हे २८ वे शिबिर दत्तपूर येथे आयोजित करण्यात आले आहे. देशातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड व ओडिसा या राज्यातील १८० युवा शिबिरार्थी यात सहभागी झाले आहेत. जैसलमेर राजस्थान येथील तरुण गेवा व ॲड. रझिया मेहर या तरुणी शिबिरात सहभागी असून अशा वैचारिक आणि प्रत्यक्ष सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय प्रेरणा देसाई यांनी करून दिला. प्रास्ताविक राष्ट्रीय संयोजक अजमतभाई यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत नागोसे यांनी केले.

परिस्थिती बदलत आहे, हार मानू नका : आशा बोथरा

देश, प्रेम निवडणुकीसाठी नाही. देशासाठी हृदयातून प्रेम पाहिजे. परिस्थिती बदलत आहे त्यामुळे हार मानू नका. आपण सर्व संविधानाला मानतो. तुमच्या मतांचे मूल्य समजून घ्या. या देशासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांचे योगदान आहे. संघर्षाची गरज आहे. आता देशाला वाचविण्याची गरज असल्याने सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन आशा बोथरा यांनी केले.

लोकतंत्राच्या दिशेने वाटचाल करा : अमरनाथ भाई

सत्तेतील लोकांना संविधानाशी देणे-घेणे नाही. गांधीजींची हत्या करण्यात आली; पण गांधी विचार आजही कायम आहे. हिंदू राष्ट्र बनविण्याची यांना आता संधी मिळाली आहे. मी इमर्जन्सी पाहिली; पण तानाशाहीशी तुलना होऊ शकत नाही. अशा शिबिर, संमेलनाची गरज आहे. लोकांमधील प्रतिकाराची शक्ती परिस्थितीला बदलवू शकते. त्यामुळे लोकतंत्रच्या दिशेने वाटचाल करा, असे आवाहन अमरनाथ भाई यांनी केले.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम