शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
4
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
5
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
6
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
7
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
8
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
9
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
10
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
11
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
12
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
13
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
14
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
16
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
17
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
18
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
19
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
20
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?

दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे केले एकत्रिकरण

By admin | Updated: April 29, 2015 01:55 IST

वायगाव (नि़) लगतच्या इटाळा शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे भूमी अभिलेख विभागाने ...

वर्धा : वायगाव (नि़) लगतच्या इटाळा शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे भूमी अभिलेख विभागाने एकत्रिकरण केले़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे़ ही चुक सुधारण्याकडेही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे़सोनेगाव (बाई) येथील शेतकरी ठमेकर यांची वायगाव (नि़) येथील मौजा इटाळा येथे शेती आहे़ या शेतीचे एकत्रिकरण करण्यात आले़ भूमी अभिलेख कार्यालयाच्या या बेजबाबदार कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ १६ एकर शेतात कुठलाही व्यवसाय व आर्थिक व्यवहार करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत़ भूमी अभिलेख कार्यालयामार्फत भूमी एकत्रिकरणात अधिकाऱ्यांनी मौजा इटाळा परिसरातील केशव जगन्नाथ धांदे यांची ४० आऱ शेती ही ठमेकर यांच्या १६ एकर शेतीमध्ये एकत्रित केली़ यामुळे ठमेकर यांची १६ आणि धांदे यांची एक अशी १७ एकर शेती झाली़ यातील एक एकर धांदे कुटुंबातील दहा सदस्यांची नावे १६ एकरमध्ये जोडली गेली आहेत़ भूमी एकत्रिकरण होऊन आठ ते दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे़ भूमी अभिलेख विभागाकडून झालेली ही चूक दुरूस्त करण्यात यावी, यासाठी ठमेकर कुटुंबीयांनी गत चार वर्षांपासून प्रकरण पाठपुरावा चालविला आहे; पण भूमी अभिलेख वर्धा कार्यालयाद्वारे टाळाटाळच केली जात आहे़ दोन शेतकऱ्यांच्या शेताचे एकत्रिकरण करण्यात आल्याने ठमेकर यांना आपल्या १६ एकर शेतीचा कुठलाही व्यावसायिक वापर करण्यात येत नाही़ शिवाय ती विकण्यात वा आर्थिक व्यवहार करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभही त्यांना घेता येणे अशक्य झाले आहे़ संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेती विलग करण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)