शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे केले एकत्रिकरण

By admin | Updated: April 29, 2015 01:55 IST

वायगाव (नि़) लगतच्या इटाळा शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे भूमी अभिलेख विभागाने ...

वर्धा : वायगाव (नि़) लगतच्या इटाळा शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतीचे भूमी अभिलेख विभागाने एकत्रिकरण केले़ या प्रकारामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे़ ही चुक सुधारण्याकडेही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांची गोची झाली आहे़सोनेगाव (बाई) येथील शेतकरी ठमेकर यांची वायगाव (नि़) येथील मौजा इटाळा येथे शेती आहे़ या शेतीचे एकत्रिकरण करण्यात आले़ भूमी अभिलेख कार्यालयाच्या या बेजबाबदार कारभारामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे़ १६ एकर शेतात कुठलाही व्यवसाय व आर्थिक व्यवहार करताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत़ भूमी अभिलेख कार्यालयामार्फत भूमी एकत्रिकरणात अधिकाऱ्यांनी मौजा इटाळा परिसरातील केशव जगन्नाथ धांदे यांची ४० आऱ शेती ही ठमेकर यांच्या १६ एकर शेतीमध्ये एकत्रित केली़ यामुळे ठमेकर यांची १६ आणि धांदे यांची एक अशी १७ एकर शेती झाली़ यातील एक एकर धांदे कुटुंबातील दहा सदस्यांची नावे १६ एकरमध्ये जोडली गेली आहेत़ भूमी एकत्रिकरण होऊन आठ ते दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटला आहे़ भूमी अभिलेख विभागाकडून झालेली ही चूक दुरूस्त करण्यात यावी, यासाठी ठमेकर कुटुंबीयांनी गत चार वर्षांपासून प्रकरण पाठपुरावा चालविला आहे; पण भूमी अभिलेख वर्धा कार्यालयाद्वारे टाळाटाळच केली जात आहे़ दोन शेतकऱ्यांच्या शेताचे एकत्रिकरण करण्यात आल्याने ठमेकर यांना आपल्या १६ एकर शेतीचा कुठलाही व्यावसायिक वापर करण्यात येत नाही़ शिवाय ती विकण्यात वा आर्थिक व्यवहार करण्यातही अडचणींचा सामना करावा लागत आहे़ शिवाय शासनाच्या विविध योजनांचा लाभही त्यांना घेता येणे अशक्य झाले आहे़ संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत शेती विलग करण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)