शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

शेतकरी हिताचा विचार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 22:12 IST

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नुकतेच सत्तारुढ झाले आहे. या सरकारला जनतेने मोठा जनादेश दिला. या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. मात्र, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सुखी झाला पाहिजे या दृष्टीने सरकारने नियोजन करावे असे मत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी मांडले...

ठळक मुद्देशंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्याशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्ककेंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार नुकतेच सत्तारुढ झाले आहे. या सरकारला जनतेने मोठा जनादेश दिला. या सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. मात्र, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो सुखी झाला पाहिजे या दृष्टीने सरकारने नियोजन करावे असे मत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी मांडले...शेतकऱ्यांसाठी सरकारने नेमके काय करायला हवे?लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला. मोठा जनादेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला मिळाला. हा जनादेश लोकांच्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी देण्यात आला आहे. सर्वप्रथम देशाचा पोशिंदा असा शेतकरी शेतात वर्षानुवर्षे राबतो. शेतातील उत्पादीत मालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट भाव मिळत नाही. त्यामुळे तो सदैव कर्जात असतो. शेतकरी हा कर्जात जन्म घेतो, कर्जात वाढतो आणि कर्जाच्या ओझातच आत्महत्या करतो. त्याला वाचविणे गरजेचे आहे. सर्व प्रकारच्या उत्पन्नावर अर्धा टक्के किंवा एक टक्का सुपरचार्ज लावून शेतकºयाला त्याच्या पेरणीच्यावेळी ५ हजार प्रति एकर प्रमाणे अनुदान दिल्यास शेतकºयाला निश्चितच मदत होईल, या दृष्टीने निर्णय मोदींजींनी घेतला पाहिजे. शेतकरी हितार्थ मोदी सरकारने शुक्रवारी पार पडलेल्या पहिल्या बैठकीत काही निर्णय घेतले. ते स्वागतार्ह आहेत. त्यात शेतकरी आणि जवानांचा विचार केला गेला आहे.नव्या सरकारबाबत सर्वसामान्य लोकांना आणखी काय अपेक्षीत आहे?अखंड भारताच्या निर्माणतेसाठी कलम ३७०, ३५ (अ) रद्द करून काश्मिर हा भारताचा अविभाज्य अंग आहे, हे सिद्ध करणे, काश्मिरमधून जे विस्थापित झाले आहे, त्यांना पुन्हा प्रस्थापित केले पाहिजे. निवृत्त सेनाधिकारी व फौजी यांना काश्मिरमध्ये निर्वासित केले पाहिजे. भारताची अस्मिता असलेले राम मंदिर ज्या प्रमाणे सरदार पटेल यांनी सोमनाथाच्या मंदिराला जागा देवून भोलेनाथाचे महत्व दाखविले. त्याचप्रमाणे मोदींनी अयोध्या येथील राम मंदिर निर्माण करून रामराज्य प्रस्थापित करावे, अशी लोकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी