शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

गाधींच्या भूमितून काँग्रेस करणार शंखनाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:43 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून कॉँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शंखनाद करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी आज, २ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम येथे दाखल होत आहेत. बापुकटीतील दर्शनानंतर येथील महादेव भवनात काँग्रेस कार्यसमतीची बैठक होईल. त्यानंतर वर्धा येथे राहुल गांधी तीन कि.मी.ची पदयात्रा करून जाहीर सभा घेतील. महात्माजींच्या भूमितून राहुल गांधी हे भाजप व संघ परिवारावर हल्लाबोल करीत आगामी निवडणुकीचा शंखनाद करणार आहेत.

ठळक मुद्देराहुल गांधी ‘सेवाग्राम’मध्ये करणार अभिवादन : पदयात्रेतून जिंकणार, सभाही ऐतिहासिक होणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून कॉँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात शंखनाद करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी आज, २ आॅक्टोबर रोजी सेवाग्राम येथे दाखल होत आहेत. बापुकटीतील दर्शनानंतर येथील महादेव भवनात काँग्रेस कार्यसमतीची बैठक होईल. त्यानंतर वर्धा येथे राहुल गांधी तीन कि.मी.ची पदयात्रा करून जाहीर सभा घेतील. महात्माजींच्या भूमितून राहुल गांधी हे भाजप व संघ परिवारावर हल्लाबोल करीत आगामी निवडणुकीचा शंखनाद करणार आहेत.राहुल गांधी यांची वर्धा येथील ही सभा विदर्भासह राज्यातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा देणारी ठरण्याची चिन्हे आहेत. यासाठी कार्यकर्तेही सज्ज झाले आहे. या ऐतिहासीक सभेच्या यशस्वीतेसाठी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण विशेष लक्ष घालून आहेत.राहुल गांधी सकाळी ११.१५ वाजता सेवाग्राम आश्रमात पोहचून राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करतील. त्यानंतर सेवाग्राम येथेच महादेवभाई देसाई भवनात कॉँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक होणार आहे. तीत राहुल गांधी यांच्या समवेत काँग्रेस नेत्या खा. सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्यासह कॉँग्रेसचे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील किमान दीडशे नेते उपस्थित राहतील. यासाठी बापुकुटीसह संपूर्ण सेवाग्राम परिसर सुरक्षेसह सज्ज झाला आहे. एसपीजी पथकाने संपूर्ण आश्रमची गेल्या तीन दिवसांपासून तपासणी सुरू केली आहे. वर्धा शहरातही सभास्थळ व पद यात्रेच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. १००० वर अधिक पोलीस याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाचे जवान या बंदोबस्तावर लक्ष ठेवून आहेत.राहुल गांधी यांचे बापुकुटी येथे आगमन झाल्यानंतर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सुतमाला घालून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते गांधीजींच्या वास्तव्य राहिलेल्या कुटीला भेट देतील. व तेथे गांधीजींना अभिवादन करतील. त्यानंतर आश्रम परिसरात राहुल गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाईल. तसेच आश्रमच्याच रसोड्यामध्ये राहुल गांधी निवडक नेत्यांसह भोजन घेतील. या जेवनाचा मेनू आश्रमने निश्चित केला असून ते तेथे आश्रमच्या सहकाऱ्यासह चर्चा करतील. जवळजवळ ४५ मिनिट राहुल गांधी येथे थांबण्याची शक्यता असून त्यानंतर ते महादेवभाई देसाई भवनाकडे मार्गस्थ होतील. या महादेवभाई देसाई भवनात काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीला १२.३० वाजता सुरूवात होईल. या भवनात होणारी ही काँग्रेसची दुसरी बैठक असेल. बैठक किमान सव्वा दोन तास चालेल. त्यानंतर राहुल गांधी येथून वाहनाने वर्धा शहरातील यशवंत महाविद्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ पोहोचतील. दुपारी २.४५ वाजता येथे राष्ट्रपित्याच्या पुतळ्याला हार्रापण करून राहुल गांधी यांच्या पदयात्रेला सुरूवात होणार आहे. जवळजवळ तीन कि़मी. राहुल गांधी या पदयात्रेत पायी चालतील. त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. यात विशेषत: वर्धा जिल्ह्यातील पदाधिकारी व बाहेरून आलेले ठराविक पदाधिकारी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर रामनगर येथील सर्कस ग्राऊंड मैदानावर राहुल गांधी पोहचतील व तेथे ३.४५ वाजता जाहीर सभेला सुरूवात होईल. सर्कस ग्राऊंड मैदान सभेसाठी सज्ज करण्यात आले आहे. सर्कस ग्राऊंड मैदानाकडे पोहचणाऱ्या सर्व मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. वर्धा शहरातील गांधी जयंतीच्या कार्यक्रमाची गर्दी लक्षात घेऊन काही मार्गावरची वाहतूक वळविण्यात आली आहे.कार्य समितीत होणार तीन ठरावकाँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीत राजकीय आर्थिक आणि गांधी विचारावरील तीन ठराव पारित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोणातून मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक पाऊल उचलण्याच्यादृष्टीने या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSewagramसेवाग्राम