शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

ग्रा.पं.मध्येही काँग्रेसच वरचढ

By admin | Updated: July 28, 2015 03:07 IST

जिल्ह्यात ३१ सार्वत्रिक तर सात गावातील पोटनिवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. जिल्ह्यातील एकंदरीत

आष्टी, देवळीत काँग्रेस: वर्धा, कारंजा व समुद्रपूर संमिश्र तर सेलूत सत्ताबदलवर्धा : जिल्ह्यात ३१ सार्वत्रिक तर सात गावातील पोटनिवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. जिल्ह्यातील एकंदरीत निकाल पाहता जिल्ह्यात भाजपला पछाडत काँग्रेसच वरचढ असल्याचे दिसून आले. काँग्रेचा गढ म्हणून ओळख असलेल्या आष्टी व देवळीत काँग्रेसने सत्ता राखली. वर्धा, कारंजा व समुद्रपूर येथे काँग्रेस राष्ट्रवादी समर्थकांना संमिश्र यश आले आहे. तर सर्वांचे लक्ष असलेल्या सेलू तालुक्यात सत्ताबदल झाला. येथे भाजप समर्थित निम्म्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.वर्धा तालुक्यातील सोटाडा गावातील सार्वत्रिक निवडणूक होती. यात कॉग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीला सात जागा घेता आल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे पाच उमेदवार निवडून आले. जनता जनार्दन आघाडीला दोन जागांवर समाधान माणावे लागले. तर भाजपा समर्थित जनहितार्थ ग्रामविकास आघाडीला तीनच जागा मिळविता आल्या. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या माणल्या जाणाऱ्या सेलू तालुक्यातील हिंगणी ग्रामपंचायतमध्ये सत्तारूढ गटाकडून रिंगणात असलेले सरपंच, उपसरपंच विजयी झाले; मात्र या ग्रामपंचायतमध्ये सत्तारूढ गटाला पाच तर विरोधकांना दहा जागा मिळाल्या. येळाकेळी ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सरपंच बंडू गव्हाळे यांचा अवघ्या नऊ मतांनी पराभव झाला. देवळी तालुक्यातील बोरगाव (आलोडा), आकोली व कवठा या तीन ग्रा.पं.च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांच्या गटाने घवघवीत यश संपादीत केले. यामध्ये भाजपा गटाचा दारुण पराभव झाला. कारंजा तालुक्यात पाडी, कन्नमवारग्राम, आजनडोह, नरसिंगपूर, जऊरवाडा येथे सार्वत्रिक निवडणूक तर खैरवाडा, मेटहिरजी, दानापूर, काजळी व बेलगाव येथे पोटनिवडणूक पार पडली. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १४ उमेदवार अविरोध तर पोटनिवडणुकीमध्ये तीन उमेदवार अविरोध निवडून आलेत. सिंदीविहीरी, माळेगाव (काळी) व पालोरा येथे प्रवर्गानुसार योग्य उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे तेथील प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. आष्टी तालुक्यातील अंतोरा आणि पोरगव्हाण ग्रा.पं.वर कॉँग्रेसने बहुमताने विजय संपादीत केला. अंतोरा येथे नऊ पैकी सात जागेवर कॉँग्रेस तर दोन जागा भाजपाला मिळाल्या. पोरगव्हाण येथे सहा जागा कॉँग्रेस तर तीन जागा भाजपाला मिळाल्या. समुद्रपूर तालुक्यातील झालेल्या निवडणुकीत रॉँकाने चार ग्रामपंचायतीवर दावा सांगितला. तर सेनेने तीन व भाजपाने तीन ग्रामपंचायतीवर ताबा मिळविला. आर्वी तालुक्यातील रोहणा ग्रामप्रंचायत काँग्रसने राखल्याचे दिसून आले आहे. या निवडणुका जिल्ह्याच्या बदलत्या राजकारणाची नांदी ठरत आहे.सेलूतील सात जागा रिक्त४सेलू तालुक्यातील आलगाव, बोंडसूला, आमगाव (ख.), बाभुळगाव, सोंडी व सुकळी स्टेशन या गावात असलेल्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवार नसल्याने येथील जागा अद्यापही रिक्तच असल्याचे दिसून आले आहे