शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा बाजार समितीवरही काँग्रेस-राकॉचा झेंडा

By admin | Updated: July 14, 2015 02:32 IST

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता झालेल्या मतदानाची सोमवारी मोजणी

वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता झालेल्या मतदानाची सोमवारी मोजणी झाली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने बाजार समितीवर असलेली सत्ता राखली. या युतीने १२ जागांवर विजय मिळविला. मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाला मात्र तीन जागांवरच समाधान मानावे लागले. तर तीन जागा अपक्षांनी बळकावल्या.जिल्ह्याचे सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख तसेच आ. रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात राकाँ-काँग्रेसने ही निवडणूक लढली. यात सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटात युतीचे पांडुरंग श्यामराव देशमुख यांनी २२९, श्याम भीमराव कार्लेकर २१७, मुकेश विनायक अळसपुरे, २१३, शरद बापुराव देशमुख २११, रमेश विठ्ठल खंडागळे २०८ तर कमलाकर विठोबा शेंडे १९८ मते घेत विजयी झाले. या गटातील एक जागा भाजपचे दत्ता भगवान महाजन यांनी २०२ मते पटकाविली. याच गटातील महिला राखीव गटातून युतीच्या वैशाली अनिल उमाटे २०३ तर भाजपच्या अपर्णा विलास मेघे यांनी २०५ मते घेत विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय गटातून भाजपचे पवन सुरेश गोडे यांनी २०७ मते घेत विजय मिळविला. विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून राकॉ-काँग्रेस युतीचे सुरेश रामसिंग मेहर यांनी १९८ मते घेत विजय मिळविला. ग्रामपंचायत गटातील निवडणुकीत राकॉ-काँग्रेस युतीचे जगदीश मनोहर मस्के ३०८ व भुषण पद्माकर झाडे २८७ मते घेत विजयी झाले. याच गटातील अनुसूचति जाती जमाती गटातही युतीचे प्रकाश सेवकदास पाटील यांनी ३४२ मते घेत विजय संपादीत केला. आर्थिक दुर्बल घटक गटातून या युतीचे दिनेश कृष्णराव गायकवाड यांनी ३३८ मते घेत विजय मिळविला. व्यापारी अडते गटातील दोन्ही जागा अपक्षांनी बळकाविल्या. यात विजय गजानन बंडेवार यांनी १५२ तर अरविंद बापुराव भुसारी यांनी १४१ मते घेत विजय संपादीत केला. हमाल मापारी गटात शदर देवराव झोड यांनी २७ मते घेत विजय मिळविल्याचे जाहीर करण्यात आले. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समीर देशमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)सेवा सहकारी संस्थेच्या दोन जागांकरिता पुनर्रमोजणी वर्धा बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होईल, असे भाकीत करण्यात आले होते. याचा अनुभव दोन जागांकरिता झालेल्या पुनर्रमोजणीवरून दिसून आले. सर्वसाधारण गटात नरेंद्र पहाडे आणि दत्ता महाजन या दोघांच्या मतात विशेष फरक नसल्याने पुनर्रमोजणीची मागणी करण्यात आली. यात दत्ता महाजन विजयी झाले. याच गटातील महिला राखीव गटातही मागणीवरुन पुनर्रमोजणी करण्यात आली. यात रत्ना हिवंज व वैशाली उमाटे यांच्यात असलेल्या अत्यल्प मतफरकामुळे ही मोजणी करण्यात आली. यामध्ये वैशाली उमाटे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.