शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा बाजार समितीवरही काँग्रेस-राकॉचा झेंडा

By admin | Updated: July 14, 2015 02:32 IST

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता झालेल्या मतदानाची सोमवारी मोजणी

वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता झालेल्या मतदानाची सोमवारी मोजणी झाली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने बाजार समितीवर असलेली सत्ता राखली. या युतीने १२ जागांवर विजय मिळविला. मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाला मात्र तीन जागांवरच समाधान मानावे लागले. तर तीन जागा अपक्षांनी बळकावल्या.जिल्ह्याचे सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख तसेच आ. रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात राकाँ-काँग्रेसने ही निवडणूक लढली. यात सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटात युतीचे पांडुरंग श्यामराव देशमुख यांनी २२९, श्याम भीमराव कार्लेकर २१७, मुकेश विनायक अळसपुरे, २१३, शरद बापुराव देशमुख २११, रमेश विठ्ठल खंडागळे २०८ तर कमलाकर विठोबा शेंडे १९८ मते घेत विजयी झाले. या गटातील एक जागा भाजपचे दत्ता भगवान महाजन यांनी २०२ मते पटकाविली. याच गटातील महिला राखीव गटातून युतीच्या वैशाली अनिल उमाटे २०३ तर भाजपच्या अपर्णा विलास मेघे यांनी २०५ मते घेत विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय गटातून भाजपचे पवन सुरेश गोडे यांनी २०७ मते घेत विजय मिळविला. विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून राकॉ-काँग्रेस युतीचे सुरेश रामसिंग मेहर यांनी १९८ मते घेत विजय मिळविला. ग्रामपंचायत गटातील निवडणुकीत राकॉ-काँग्रेस युतीचे जगदीश मनोहर मस्के ३०८ व भुषण पद्माकर झाडे २८७ मते घेत विजयी झाले. याच गटातील अनुसूचति जाती जमाती गटातही युतीचे प्रकाश सेवकदास पाटील यांनी ३४२ मते घेत विजय संपादीत केला. आर्थिक दुर्बल घटक गटातून या युतीचे दिनेश कृष्णराव गायकवाड यांनी ३३८ मते घेत विजय मिळविला. व्यापारी अडते गटातील दोन्ही जागा अपक्षांनी बळकाविल्या. यात विजय गजानन बंडेवार यांनी १५२ तर अरविंद बापुराव भुसारी यांनी १४१ मते घेत विजय संपादीत केला. हमाल मापारी गटात शदर देवराव झोड यांनी २७ मते घेत विजय मिळविल्याचे जाहीर करण्यात आले. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समीर देशमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)सेवा सहकारी संस्थेच्या दोन जागांकरिता पुनर्रमोजणी वर्धा बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होईल, असे भाकीत करण्यात आले होते. याचा अनुभव दोन जागांकरिता झालेल्या पुनर्रमोजणीवरून दिसून आले. सर्वसाधारण गटात नरेंद्र पहाडे आणि दत्ता महाजन या दोघांच्या मतात विशेष फरक नसल्याने पुनर्रमोजणीची मागणी करण्यात आली. यात दत्ता महाजन विजयी झाले. याच गटातील महिला राखीव गटातही मागणीवरुन पुनर्रमोजणी करण्यात आली. यात रत्ना हिवंज व वैशाली उमाटे यांच्यात असलेल्या अत्यल्प मतफरकामुळे ही मोजणी करण्यात आली. यामध्ये वैशाली उमाटे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.