शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस देशात टुकडे टुकडे गँग अन् अर्बन नक्षलवाद चालवत आहे; वर्धा येथे PM मोदींचा घणाघात

By रवींद्र चांदेकर | Updated: September 20, 2024 22:51 IST

ही महात्मा गांधी यांची काँग्रेस असूच शकत नाही, असेही मोदी म्हणाले.

वर्धा: विरोधकांची भाषा, बोली, परदेशात देशविरोधी वक्तव्य, देश तोडण्याची भाषा, संस्कृती आणि आस्थांचा अपमान करणे, ही विरोधकांची प्रवृत्ती आहे. काँग्रेस देशात टुकडे टुकडे गँग आणि अर्बन नक्षलवाद फोफावू इच्छिते, असा घणाघात पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केला.

वर्धा येथील स्वावलंबी मैदानात शुक्रवारी पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळा पार पडला. आपल्या ३१ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्यातून त्यांनी देश एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ली काँग्रेसचे तुष्टीकरणाचे भूत जागे झाले असून, कर्नाटकात त्यांनी चक्क गणपती बाप्पालाच पिंजऱ्यात कैद केल्याचे ते म्हणाले.

"ही महात्मा गांधी यांची काँग्रेस असूच शकत नाही. काँग्रेसचे नेते परदेशात जाऊन देशविरोधी अजेंडा चालवितात. मात्र, आम्हाला परंपरा, संस्कृती, सन्मान, विकासासोबत एकत्र व्हायचे आहे. महात्मा गांधी यांनी ग्रामीण विकासासाठी कुटीर उद्योगाचा मंत्र दिला. मात्र, देशावर ७० वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसने महात्मा गांधी यांच्या विचारांना तिलांजली दिली. परिणामी ग्रामीण उद्योग उद्ध्वस्त झाले. मात्र, एनडीए सरकाने पीएम कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून पारंपारिक लघुउद्योग आणि ग्रामीण कारागिरांना सन्मान देण्याचे काम केले आहे. आता एकत्रितपणे देशाचा गौरव वाढवू या", असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंचावर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री जितनराम मांझी, जयंत चौधरी, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री उदय सामंत, ना. चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार, आ. दादाराव केचे, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, माजी खासदार रामदास तडस आदींची उपस्थिती होती.

१४ लाख कारागिरांना योजनेचा लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा राज्यातील १४ लाख ७२ हजार कारागिरांना लाभ मिळाल्याचे यावेळी सांगितले. ‘लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो’, अशी त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. त्यांनी राज्यातील सहा कोटी महिला आत्मनिर्भर झाल्याचे सांगितले. वन नेशन, वन इलेक्शन निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. कुणी कितीही प्रयत्न केला तरी देशातील आरक्षण संपवू शकत नसल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी