शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
4
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
5
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
6
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
7
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
8
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
9
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
10
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
11
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
12
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
13
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
14
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
15
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
16
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
17
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
18
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
19
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
20
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट

जातीची साथ मिळेल हाच आत्मविश्वास काँग्रेसला नडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:33 IST

लोकसभेच्या निवडणूक निकालाने आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांना धक्का बसला आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाचे आमदार आहे. कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला, असे चित्र दिसून येत आहे. जातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आर्वी विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसकडून करण्यात आला.

लोकसभेच्या निवडणूक निकालाने आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांना धक्का बसला आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाचे आमदार आहे. कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला, असे चित्र दिसून येत आहे. जातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आर्वी विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसकडून करण्यात आला. मात्र, मतदारांनी कॉँग्रेसचा हा प्रयत्न हाणून पाडत रामदास तडस यांच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.रामदास तडस यांचा असलेला जनसंपर्क याला कारणीभूत ठरला. आर्वी विधानसभा मतदारसंघात दादाराव केचे यांनी २००९ पासून या मतदारसंघात गावपातळीवर भाजपची संघटनबांधणी चांगल्या पद्धतीने केली आहे. सातत्याने जनहिताचे प्रश्न लावून धरून ते सोडविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाते. रामदास तडस यांनी २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर या भागात सातत्याने आपला संपर्क ठेवला व लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. या सोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख अंनत गुढे, भाजप-सेनेचे कार्यकर्ते यांनी निवडणूक काळात प्रचंड परिश्रम घेतले. मतदार राजासमोर जाऊन सातत्याने आपल्या पक्षाची भूमिका मांडली. आर्वी मतदारसंघात सध्या कॉँग्रेसचे विद्यमान आमदार आहे. या मतदार संघात जातीचे कार्ड चालवून दोन समाजात दुही निर्माण करण्याचे काम करण्यात आले. मात्र, जनतेने सहजपणे उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधीच हवा, ही भूमिका मांडत तडस यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळेच आर्वी विधानसभा क्षेत्रात भाजपला २६ हजार २३७ मतांची आघाडी मिळविता आली. रामदास तडस यांना ९१ हजार ६५ तर चारूलता टोकस यांना ६४ हजार ८२८ मते मिळाली. कॉँग्रेसचे आमदार असूनही या मतदारसंघात मोदी लाटेत कॉँग्रेसला मताधिक्य मिळविता आले नाही. भाजप सरकारच्या काळात विविध प्रश्न मार्गी लागलेत. यामध्ये दिवे, केचे यांच्यासह सुमित वानखेडे यांचेही योगदान आहे. जनतेने दिलेला कौल विकासाचा असल्याचे दिसते. या मतदार संघात काँग्रेसचे आमदार असले तरी समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांची संख्या माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडेच अधिक आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्याने दादाराव केचे विद्यमान आमदारांच्या तोडीचेच काम करताना दिसत आहे. वेळप्रसंगी खासदारांना घेऊन वा परस्परही मुख्यमंत्र्यांना गाठून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची हातोटी ही भाजपाच्या जनसंपर्काची सगळ्यात जमेची बाजू आहे. दुसरीकडे पक्ष पातळीवरच सुधीर दिवे यांनी वाढविलेला प्रचंड जनसंपर्क, गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपाचा फडकलेला झेंडा या बाबीही लोकसभेच्या मताधिक्यासाठी कारणीभूत ठरल्या. कारंजाचा उड्डाणपूल, संत्रा उत्पादकांना मिळालेला दिलासा याचाही फायदा झाला.भाजपचे पारडे जडच राहीललोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदार संघात भाजपला २६ हजारांची आघाडी मिळाली. त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजपचे पारडे जडच राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आर्वी येथील जाहीर सभेत दादाराव केचे यांना उमेदवारी देण्याबाबत जाहीर सूतोवाच केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलेला आहे. भाजपला मिळालेल्या या यशात कुणबी, तेली, माळी या सर्व समाज घटकांचे योगदान आहे. कॉँग्रेसचे आमदार असूनही पक्षाला येथे मोठे मताधिक्य मिळविता आले नाही. यातच विद्यमान आमदारांचे अपयश अधोरेखित होणारे आहे. यावर कॉँग्रेसने चिंतन करण्याची गरज आहे. आता लोकांना रस्त्यावर भेटणारा माणूस हवा आहे. घरी बसून काम करणाऱ्यांची मतदारांनी रवानगी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपा