शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

जातीची साथ मिळेल हाच आत्मविश्वास काँग्रेसला नडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:33 IST

लोकसभेच्या निवडणूक निकालाने आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांना धक्का बसला आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाचे आमदार आहे. कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला, असे चित्र दिसून येत आहे. जातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आर्वी विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसकडून करण्यात आला.

लोकसभेच्या निवडणूक निकालाने आर्वी विधानसभा क्षेत्रात अनेकांना धक्का बसला आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेस पक्षाचे आमदार आहे. कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला, असे चित्र दिसून येत आहे. जातीच्या आधारावर राजकारण करण्याचा प्रयत्न आर्वी विधानसभा क्षेत्रात कॉँग्रेसकडून करण्यात आला. मात्र, मतदारांनी कॉँग्रेसचा हा प्रयत्न हाणून पाडत रामदास तडस यांच्या बाजूने स्पष्ट कौल दिला.रामदास तडस यांचा असलेला जनसंपर्क याला कारणीभूत ठरला. आर्वी विधानसभा मतदारसंघात दादाराव केचे यांनी २००९ पासून या मतदारसंघात गावपातळीवर भाजपची संघटनबांधणी चांगल्या पद्धतीने केली आहे. सातत्याने जनहिताचे प्रश्न लावून धरून ते सोडविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाते. रामदास तडस यांनी २०१४ मध्ये खासदार झाल्यानंतर या भागात सातत्याने आपला संपर्क ठेवला व लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. या सोबतच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर दिवे, शिवसेनेचे लोकसभा संपर्क प्रमुख अंनत गुढे, भाजप-सेनेचे कार्यकर्ते यांनी निवडणूक काळात प्रचंड परिश्रम घेतले. मतदार राजासमोर जाऊन सातत्याने आपल्या पक्षाची भूमिका मांडली. आर्वी मतदारसंघात सध्या कॉँग्रेसचे विद्यमान आमदार आहे. या मतदार संघात जातीचे कार्ड चालवून दोन समाजात दुही निर्माण करण्याचे काम करण्यात आले. मात्र, जनतेने सहजपणे उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधीच हवा, ही भूमिका मांडत तडस यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळेच आर्वी विधानसभा क्षेत्रात भाजपला २६ हजार २३७ मतांची आघाडी मिळविता आली. रामदास तडस यांना ९१ हजार ६५ तर चारूलता टोकस यांना ६४ हजार ८२८ मते मिळाली. कॉँग्रेसचे आमदार असूनही या मतदारसंघात मोदी लाटेत कॉँग्रेसला मताधिक्य मिळविता आले नाही. भाजप सरकारच्या काळात विविध प्रश्न मार्गी लागलेत. यामध्ये दिवे, केचे यांच्यासह सुमित वानखेडे यांचेही योगदान आहे. जनतेने दिलेला कौल विकासाचा असल्याचे दिसते. या मतदार संघात काँग्रेसचे आमदार असले तरी समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांची संख्या माजी आमदार दादाराव केचे यांच्याकडेच अधिक आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्याने दादाराव केचे विद्यमान आमदारांच्या तोडीचेच काम करताना दिसत आहे. वेळप्रसंगी खासदारांना घेऊन वा परस्परही मुख्यमंत्र्यांना गाठून लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची हातोटी ही भाजपाच्या जनसंपर्काची सगळ्यात जमेची बाजू आहे. दुसरीकडे पक्ष पातळीवरच सुधीर दिवे यांनी वाढविलेला प्रचंड जनसंपर्क, गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपाचा फडकलेला झेंडा या बाबीही लोकसभेच्या मताधिक्यासाठी कारणीभूत ठरल्या. कारंजाचा उड्डाणपूल, संत्रा उत्पादकांना मिळालेला दिलासा याचाही फायदा झाला.भाजपचे पारडे जडच राहीललोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदार संघात भाजपला २६ हजारांची आघाडी मिळाली. त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजपचे पारडे जडच राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आर्वी येथील जाहीर सभेत दादाराव केचे यांना उमेदवारी देण्याबाबत जाहीर सूतोवाच केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावलेला आहे. भाजपला मिळालेल्या या यशात कुणबी, तेली, माळी या सर्व समाज घटकांचे योगदान आहे. कॉँग्रेसचे आमदार असूनही पक्षाला येथे मोठे मताधिक्य मिळविता आले नाही. यातच विद्यमान आमदारांचे अपयश अधोरेखित होणारे आहे. यावर कॉँग्रेसने चिंतन करण्याची गरज आहे. आता लोकांना रस्त्यावर भेटणारा माणूस हवा आहे. घरी बसून काम करणाऱ्यांची मतदारांनी रवानगी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालBJPभाजपा