शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

काँग्रेसची मोर्चेबांधणी; संघटनात्मक निवडणुकीचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:00 IST

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी केली होती. जिल्ह्यातील चारही मतदार संघांत २२ हजार ४२४  सदस्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ हजार ४९९ सदस्य नोंदणी एकट्या देवळी-पूलगाव मतदार संघात झाली. आता या डिजिटल नोंदणी  केलेल्या  सदस्यांनाच या संघटनात्मक निवणुकीत उभे राहता येणार आहे. तसेच त्यांनाच मतदानही करता येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधीकाळी गड असलेल्या जिल्ह्यात गटबाजीमुळे काँग्रेस खिळखिळी झाली. हीच परिस्थिती गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत असल्याने आता काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यापासून तर बूथ स्तरापर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी निवडणुका घेतल्या जाणार आहे. याची सुरुवात सध्या बूथस्तरावरून सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या दिवसात जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी बदलेले दिसण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील काँग्रेसला पुन्हा पूर्वीची ताकद मिळवून देण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याकरिता शुक्रवारी स्थानिक सद्भावना भवनात काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा प्रभारी जिया पटेल व जिल्हा निवडणूक अधिकारी संजिता सिहाग (राजस्थान) यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, अशोक शिंदे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हा, ब्लॉक व बूथ स्तरीय संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वतीने डिजिटल सदस्यता नोंदणी केली होती. जिल्ह्यातील चारही मतदार संघांत २२ हजार ४२४  सदस्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ हजार ४९९ सदस्य नोंदणी एकट्या देवळी-पूलगाव मतदार संघात झाली. आता या डिजिटल नोंदणी  केलेल्या  सदस्यांनाच या संघटनात्मक निवणुकीत उभे राहता येणार आहे. तसेच त्यांनाच मतदानही करता येणार आहे. शनिवारपासून बूथस्तरावरून ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्यात ती जिल्हास्तरावर पोहोचणार असून काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही बुथ, ब्लॉक व जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.

नोंदणीत मागे, पण पदासाठी पुढे-   काँग्रेसमधील दोन गटांतील वाद काही थांबत नसल्याने डिजिटल सदस्य नोंदणीवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. एकाने गटाने पक्षादेश पाळत काम करायचे आणि दुसऱ्या गटाने त्याला हातभार नाही तर सुरुंग लावायचे, असाच प्रकार सुरू आहे. सद्भावना भवनातील बैठकीदरम्यानही ही गटबाजी दिसून आली. नोंदणीत मागे आणि पद मिळविण्याकरिता पुढे का? असा प्रश्न उपस्थितांना पडला.

अशी होणार जिल्हाध्यक्षाची निवड-   जिल्ह्यातील देवळी-पूलगाव, हिंगणघाट-समुद्रपूर-सिंदी, वर्धा-सेलू व आर्वी-आष्टी-कारंजा या चार विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण १२ ब्लॉक निश्चित करण्यात आले आहे. या ब्लॉकमधील प्रत्येक बूथवरून बूथ अध्यक्ष आणि डेलिगेटस् अशा दोघांची निवड केली जाणार आहे. सर्व बूथवरील अध्यक्ष व डेलिगेटस् हे एका ब्लॉकमध्ये सहा सदस्यांची निवड करतील. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष अशी पदे राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक ब्लॉकमधील सहा पदाधिकारी म्हणजे ७२ जणांमधून जिल्हाध्यक्षाची निवड होणार आहे. आता जिल्हाध्यक्ष म्हणून कोणाची निवड होते, हे येणारा काळच सांगेल.

पक्षाच्या आदेशानुसार जिल्ह्यात डिजिटल सदस्य नोंदणी करण्यात आली आहे. आता या सदस्यांमधून बूथ, ब्लॉक आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. याकरिता निवडणूक होणार असून, या सदस्यांनाच उभे राहण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. जिल्ह्यातील १२ ब्लॉकमधून प्रत्येकी सहा पदाधिकारी निवडल्यानंतर, त्या ७२ पदाधिकाऱ्यांतून जिल्हाध्यक्षाची निवड होईल.- मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, वर्धा.

जिल्ह्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव मिळाले आहे. या जिल्ह्यात काँग्रेसच एक वेगळ महत्त्व असल्याने येथे काँग्रेसच वाढायला पाहिजे. परंतु, काँग्रेसमधील आपसी गटबाजी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. आता नव्याने सर्वांना एकत्र आणून काँग्रेसला उभारी देण्याची गरज आहे. त्याकरिता सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येवून संघटनात्मक बांधणी करावी.- संजिता सिहाग,  जिल्हा निवडणूक अधिकारी.

 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक