शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संमतीपत्राने मालकी हक्क धोक्यात

By admin | Updated: October 13, 2016 01:25 IST

नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेसाठी भूसंपादन करण्यात येत आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करताना

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महात्मा फुले समता परिषदेचे आंंदोलनवर्धा : नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन हायवेसाठी भूसंपादन करण्यात येत आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करताना भूसंपादन कायदा २०१३ ला डावलून शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लँड पुलिंग योजनेमार्फत, शेतजमिनीचा कुठलाही मोबदला न देता, शेतकऱ्यांचीच संमती आहे, असे दाखवून, ताब्यात घेण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. शासनाकडून होत असलेली ही लूट थांबवावी, अशी मागणी करीत महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने सोमवारी निदर्शने करीत निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.जिल्हाधिकारी व शासनाचे प्रतिनिधी, खासदार, आमदार या शेतजमिनीबाबत शेतकऱ्यांची मालकी जाणार नाही, असे ओरडून सांगत होते. त्या शेतजमिनीवर शेतकऱ्यांना कर्जही मिळेल, अशी आश्वासने देत होते; पण ते सारे तोंडी होते. असे काहीच लिखित नसल्याचा आरोप समता परिषदेने निवेदनातून केला आहे. आता शेतकऱ्यांकडून लँड पुलिंगसाठी संमतीपत्रे लिहून घेण्यात येत आहे. या पत्रात स्पष्टपणे नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती मार्ग बांधकाम, नवीन शहर विकास यासाठी, मी, आमच्या जमिनीचा मालकी हक्क महामार्ग प्राधिकरणाच्या लाभात स्वेच्छेने समर्पित करीत आहे किंवा सोडत आहे, असे लिहिलेले आहे. यावरून या संमतीपत्रात शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्याच्या शेतजमिनीचा मालकी हक्कच धोक्यात आला आहे. जर शेतकऱ्याचा जमिनीचा मालकी हक्क सरकारच्या महामार्ग प्राधिकरणाला जात असेल तर यापूर्वी केलेले सर्व दावे खोटे असून, ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप समता परिषदेने केला आहे. समता परिषदेने या शेतकरी विरोधी लँड पुलिंग धोरणाविरूद्ध वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी गावोगावी जावून जनजागरण केले आहे. यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन देणार नाही, असे जिल्हाधिकारी वर्धा यांना स्वयंघोषणापत्र देऊन कळविले आहे. आज या नागपूर-मुंबई सुपर हायवेच्या मधे ज्यांच्या शेतजमीन जात आहेत, त्या बोरी गावच्या शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या लँड पुलिंग योजनेत शेतजमिनी देणार नाही, असे लेखी कळविले असल्याचे सांगण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)