शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पिकांवर शंखीय गोगलगाईंचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 10:53 IST

तळेगांव परिसरातील विशेषत: नदी नाल्यांलगतच्या शेतातील भाजीपाला, फळ पीक, तूर, कापूस, सोयाबीन पिकांसह संत्रा झाडे व इतरही झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगायी आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या चिंतेत वाढशेतातील पिकं आणि संत्रा झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सदैव अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक नविन संकट उभे राहिले आहे. तळेगांव परिसरातील विशेषत: नदी नाल्यांलगतच्या शेतातील भाजीपाला, फळ पीक, तूर, कापूस, सोयाबीन पिकांसह संत्रा झाडे व इतरही झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगायी आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या गोगलगायींनी भाजीपाला, सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा तसेच इतर फळ पिकांसह अन्य झाडांवर आक्रमण केले असून पिकांची पाने खाऊन कोवळ्या अवस्थेतील पिके उद्ध्वस्त करीत आहेत. तिचा बंदोबस्त करणेही कठीण असून कीटकनाशक फवारणीस ते जुमानत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील दोन तीन वषार्पासुन नदी, नाल्यांलगतच्या शेतात शंखीय गोगल गायी आढळत होत्या. तेव्हा त्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचा फारसा उपद्रव जाणवत नव्हता. परंतु यावर्षी या गोगलगाईंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन नदी, नाल्यांच्या लगतच्या शेतासह त्यांच्या शेजारील शेतातही या गोगलगाईंनी आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात वळविला असून त्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. तर त्यांचा आकारही १५ ते २० सें.मी. पर्यत आहे.या शंखीय गोगलगाई रात्रीला शेतातील पिकांवर आक्रमण करतात तर दिवसा ढगाळी वातवरणात तूर, कपासी पिकांच्या शेंड्यावर, झाडांवर शेताच्या सभोवताल असलेल्या कुपाट्यावर दिसतात. तर उन्हं तापल्यास पिकांच्या व झाडांच्या बुडाशी मातीत लपून बसतात.

या शंखीय गोगल गाईंचा वेळीच नायनाट होण्याचे दृष्टीने कृषी विभागाने उपाय योजना करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती