शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

वर्धा जिल्ह्यात पिकांवर शंखीय गोगलगाईंचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 10:53 IST

तळेगांव परिसरातील विशेषत: नदी नाल्यांलगतच्या शेतातील भाजीपाला, फळ पीक, तूर, कापूस, सोयाबीन पिकांसह संत्रा झाडे व इतरही झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगायी आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या चिंतेत वाढशेतातील पिकं आणि संत्रा झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सदैव अस्मानी व सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक नविन संकट उभे राहिले आहे. तळेगांव परिसरातील विशेषत: नदी नाल्यांलगतच्या शेतातील भाजीपाला, फळ पीक, तूर, कापूस, सोयाबीन पिकांसह संत्रा झाडे व इतरही झाडांवर मोठ्या प्रमाणावर शंखीय गोगलगायी आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या गोगलगायींनी भाजीपाला, सोयाबीन, तूर, कपाशी, संत्रा तसेच इतर फळ पिकांसह अन्य झाडांवर आक्रमण केले असून पिकांची पाने खाऊन कोवळ्या अवस्थेतील पिके उद्ध्वस्त करीत आहेत. तिचा बंदोबस्त करणेही कठीण असून कीटकनाशक फवारणीस ते जुमानत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मागील दोन तीन वषार्पासुन नदी, नाल्यांलगतच्या शेतात शंखीय गोगल गायी आढळत होत्या. तेव्हा त्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचा फारसा उपद्रव जाणवत नव्हता. परंतु यावर्षी या गोगलगाईंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन नदी, नाल्यांच्या लगतच्या शेतासह त्यांच्या शेजारील शेतातही या गोगलगाईंनी आपला मोर्चा मोठ्या प्रमाणात वळविला असून त्यांचे दिवसेंदिवस प्रमाण वाढत आहे. तर त्यांचा आकारही १५ ते २० सें.मी. पर्यत आहे.या शंखीय गोगलगाई रात्रीला शेतातील पिकांवर आक्रमण करतात तर दिवसा ढगाळी वातवरणात तूर, कपासी पिकांच्या शेंड्यावर, झाडांवर शेताच्या सभोवताल असलेल्या कुपाट्यावर दिसतात. तर उन्हं तापल्यास पिकांच्या व झाडांच्या बुडाशी मातीत लपून बसतात.

या शंखीय गोगल गाईंचा वेळीच नायनाट होण्याचे दृष्टीने कृषी विभागाने उपाय योजना करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती