शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारची १२७ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:25 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढावी यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले आहे.

ठळक मुद्देरबी हंगामाला फायदा : पाण्याच्या पातळीतही वाढ

आॅनलाईन लोकमतआर्वी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढावी यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले आहे. या अभियानातून आर्वी तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने नाला खोलीकरण, ढाळीचे बांध तयार करण्याकरिता युद्धपातळीवर कामे हाती घेतली. तालुक्यात २०१६-१७ यावर्षात १२७ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रस्तावित आहे. या कामातून जलसाठ्याचा लाभ आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला असून सध्या रबी हंगामातील गहू व चना या पिकासाठी त्याचा लाभ होत आहे.आर्वी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१६-१७ कृती आराखड्यात आर्वी तालुक्यात एकूण १४१ कामे जलयुक्त शिवारची प्रस्तावित होती. त्यापैकी १२७ कामे पूर्ण करण्यात आली. यात नाला खोलीकरणाचे ७१, ढाळीचे बांध ५६ तर तुटफुट दुरूस्तीची आठ कामे करण्यात आली. या जलयुक्त शिवारच्या सर्व कामामध्ये गावातील विहिरी व नाल्याची पाणी पातळी वाढल्याने त्याचा तालुक्यातील रबी हंगामातील चना व गहू पिकाला चांगलाच फायदा होत आहे.तालुक्यातील पाचेगाव, बेढोणा, पाचोड (ठाकूर), सावंगी (पोळ), पारगोठाण, दिघी, देऊरवाडा, खर्राशी, जामनेरा, बोडाळा, तरोडा, टाकळी, बोदड, हिवरा (तांडा), बोथली, हर्राशी, परसोडी, टेंभरी, गौरखेडा, बोथली (नटाळा), रामपूर, सुकळी, हमदापूर, हिवरा या २५ गावांत जलयुक्त शिवार कामाने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे रबी हंगामातील शेतपिकांना चांगला लाभ मिळत आहे. यात ही सर्व जलयुक्त कामे ही आर्वी तालुक्यातील पाणीटंचाई व डार्क झोनमध्ये येणाऱ्या गावात करण्यात आल्याने शेतकºयाच्या रबी हंगामातील शेतपिकांना चांगलाच फायदा होत आहे.जलयुक्त शिवार योजनेतून आर्वी तालुक्यातील २५ गावांत कामे करण्यात आली. या कामामुळे शेतकऱ्यांच्या रबी हंगामातील शेतपिकांना चांगला फायदा होत आहे.- के.बी. घोडके, सहायक तालुका कृषी अधिकारी, आर्वी.