शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जलयुक्त शिवारची १२७ कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:25 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढावी यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले आहे.

ठळक मुद्देरबी हंगामाला फायदा : पाण्याच्या पातळीतही वाढ

आॅनलाईन लोकमतआर्वी : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढावी यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले आहे. या अभियानातून आर्वी तालुक्यात कृषी विभागाच्यावतीने नाला खोलीकरण, ढाळीचे बांध तयार करण्याकरिता युद्धपातळीवर कामे हाती घेतली. तालुक्यात २०१६-१७ यावर्षात १२७ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रस्तावित आहे. या कामातून जलसाठ्याचा लाभ आर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना झाला असून सध्या रबी हंगामातील गहू व चना या पिकासाठी त्याचा लाभ होत आहे.आर्वी तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१६-१७ कृती आराखड्यात आर्वी तालुक्यात एकूण १४१ कामे जलयुक्त शिवारची प्रस्तावित होती. त्यापैकी १२७ कामे पूर्ण करण्यात आली. यात नाला खोलीकरणाचे ७१, ढाळीचे बांध ५६ तर तुटफुट दुरूस्तीची आठ कामे करण्यात आली. या जलयुक्त शिवारच्या सर्व कामामध्ये गावातील विहिरी व नाल्याची पाणी पातळी वाढल्याने त्याचा तालुक्यातील रबी हंगामातील चना व गहू पिकाला चांगलाच फायदा होत आहे.तालुक्यातील पाचेगाव, बेढोणा, पाचोड (ठाकूर), सावंगी (पोळ), पारगोठाण, दिघी, देऊरवाडा, खर्राशी, जामनेरा, बोडाळा, तरोडा, टाकळी, बोदड, हिवरा (तांडा), बोथली, हर्राशी, परसोडी, टेंभरी, गौरखेडा, बोथली (नटाळा), रामपूर, सुकळी, हमदापूर, हिवरा या २५ गावांत जलयुक्त शिवार कामाने पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे रबी हंगामातील शेतपिकांना चांगला लाभ मिळत आहे. यात ही सर्व जलयुक्त कामे ही आर्वी तालुक्यातील पाणीटंचाई व डार्क झोनमध्ये येणाऱ्या गावात करण्यात आल्याने शेतकºयाच्या रबी हंगामातील शेतपिकांना चांगलाच फायदा होत आहे.जलयुक्त शिवार योजनेतून आर्वी तालुक्यातील २५ गावांत कामे करण्यात आली. या कामामुळे शेतकऱ्यांच्या रबी हंगामातील शेतपिकांना चांगला फायदा होत आहे.- के.बी. घोडके, सहायक तालुका कृषी अधिकारी, आर्वी.