शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:58 IST

शासन केवळ घोषणा करण्यात आणि भूमिपूजन करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेही काम सुरू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली; पण अद्यापपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : एसडीओंना विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासन केवळ घोषणा करण्यात आणि भूमिपूजन करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेही काम सुरू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली; पण अद्यापपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. देवळी तालुक्यातील हातगाव प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या; पण अद्याप मोबदला नाही. कपाशीवर आलेल्या बोंडअळीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले; पण नुकसान भरपाई नाही. अशा अनेक समस्यांना हात घालत देवळी येथील पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.देवळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत; पण लोकप्रतिनिधी या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार, अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार, कपाशीवर आलेली बोंडअळी व त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अद्यापपर्यंत नुकसानभरपाई दिलेली नाही. यामुळे त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले आहे. शिवाय मागील चुकारेही अद्याप अप्राप्त आहेत. शासनाने तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी त्वरित सुरू करावी. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये शासकीय चना खरेदी सुरू करावी.कर्जमाफीचे दीड लाखांवरील लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम भरण्याकरिता सुलभ पाच वर्षांकरिता बिनव्याजी हप्ते पाडून देण्यात यावे. हातगाव प्रकल्पातील देवळी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्यानुसार ताबडतोब मोबदला मिळावा. नवीन पीक कर्जवाटप मिळण्याच्या दृष्टीने कर्जमाफी यादीची घोषणा करून तातडीने अंमलबजावणी करावी. तेलगंणा राज्याच्या धर्तीवर राज्यातही एकरी पाच हजार रुपये अनुदान शेतीकरिता देण्यात यावे. बोगस बी.टी. बियाण्यांपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाकरिता उपाययोजना करावी. गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या अवाजवी दरवाढीमुळे शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भविष्यातही इंधनाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. सातत्याने होणारी ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात संजय कामनापुरे, संदीप किटे, राहुल घोडे, श्याम देशमुख, संजय बोबडे, बालू पाटील, वानखेडे, प्रदीप निलस्कर, सुनील निमसडकर, अमोल कसनारे, जयंत वाकडे, महादेव भोयर, प्रवीण डांगे, बबन बिरे, मंगेश वानखेडे, गणेश पाचडे, गुणवंत धांदे, सुनील ठाकरे, विनोद ठाकरे, डॉ. विजय राऊत, अशोक देशमुख, गोपाल उगेमुगे, छोटु देशमुख, गोपाल उगेमुगे, प्रशांत डोंगरे यांच्यासह पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.