शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:58 IST

शासन केवळ घोषणा करण्यात आणि भूमिपूजन करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेही काम सुरू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली; पण अद्यापपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : एसडीओंना विविध मागण्यांचे निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासन केवळ घोषणा करण्यात आणि भूमिपूजन करण्यात व्यस्त असून प्रत्यक्षात कुठेही काम सुरू नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना सुरू केली; पण अद्यापपर्यंत जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. देवळी तालुक्यातील हातगाव प्रकल्पात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या; पण अद्याप मोबदला नाही. कपाशीवर आलेल्या बोंडअळीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले; पण नुकसान भरपाई नाही. अशा अनेक समस्यांना हात घालत देवळी येथील पंचायत समितीसमोर राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.देवळी तालुक्यात शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत; पण लोकप्रतिनिधी या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. भाजप सरकार शेतकरी विरोधी सरकार, अशा घोषणा देत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.निवेदनानुसार, कपाशीवर आलेली बोंडअळी व त्यानंतर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने अद्यापपर्यंत नुकसानभरपाई दिलेली नाही. यामुळे त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले आहे. शिवाय मागील चुकारेही अद्याप अप्राप्त आहेत. शासनाने तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी त्वरित सुरू करावी. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये शासकीय चना खरेदी सुरू करावी.कर्जमाफीचे दीड लाखांवरील लाभार्थ्यांना उर्वरित रक्कम भरण्याकरिता सुलभ पाच वर्षांकरिता बिनव्याजी हप्ते पाडून देण्यात यावे. हातगाव प्रकल्पातील देवळी तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना भूसंपादन कायद्यानुसार ताबडतोब मोबदला मिळावा. नवीन पीक कर्जवाटप मिळण्याच्या दृष्टीने कर्जमाफी यादीची घोषणा करून तातडीने अंमलबजावणी करावी. तेलगंणा राज्याच्या धर्तीवर राज्यातही एकरी पाच हजार रुपये अनुदान शेतीकरिता देण्यात यावे. बोगस बी.टी. बियाण्यांपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाकरिता उपाययोजना करावी. गेल्या काही दिवसांत पेट्रोल व डिझेलमध्ये झालेल्या अवाजवी दरवाढीमुळे शेतकरी व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भविष्यातही इंधनाची दरवाढ होण्याची शक्यता आहे. सातत्याने होणारी ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.अन्यथा तालुक्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. आंदोलनात संजय कामनापुरे, संदीप किटे, राहुल घोडे, श्याम देशमुख, संजय बोबडे, बालू पाटील, वानखेडे, प्रदीप निलस्कर, सुनील निमसडकर, अमोल कसनारे, जयंत वाकडे, महादेव भोयर, प्रवीण डांगे, बबन बिरे, मंगेश वानखेडे, गणेश पाचडे, गुणवंत धांदे, सुनील ठाकरे, विनोद ठाकरे, डॉ. विजय राऊत, अशोक देशमुख, गोपाल उगेमुगे, छोटु देशमुख, गोपाल उगेमुगे, प्रशांत डोंगरे यांच्यासह पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.