शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

महाविद्यालये पडली ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 21:20 IST

दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालयात रांगा लागायच्या. कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागांपेक्षाही विद्यार्थ्यांचे जास्त अर्ज येत असल्याने यादी प्रसिद्ध केली जायची. परंतु, यावर्षी दहावीचा निकाल फारच कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांअभावी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये ओस पडल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देविद्यार्थीच मिळेना : १२ हजारांवर जागा रिक्त

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेशाकरिता कनिष्ठ महाविद्यालयात रांगा लागायच्या. कनिष्ठ महाविद्यालयातील उपलब्ध जागांपेक्षाही विद्यार्थ्यांचे जास्त अर्ज येत असल्याने यादी प्रसिद्ध केली जायची. परंतु, यावर्षी दहावीचा निकाल फारच कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांअभावी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालये ओस पडल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील १३२ कनिष्ठ महाविद्यालयातील १२ हजारांवर जागा रिक्त असल्याची अधिकृत आकडेवारी शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे मराठी शाळांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांचे भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.मराठी शाळांमधील किलबिलाट झपाट्याने कमी होत असून पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तीच परिस्थिती सध्या जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांवर आली आहे.जिल्ह्यामधील आठही तालुक्यात अनुदानित ८०, विना अनुदानित २१, कायम विना अनुदानित ०८ तर स्वयंअर्थसहाय्यित २३ अशी एकूण १३२ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या कनिष्ठ महाविद्यालयातील एका तुकडीला जास्तीत जास्त ८० विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची परवानगी दिली जाते. त्यामुळे या आकडेवारीनुसार जिल्ह्यामध्ये कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त (कला+वाणिज्य) या शाखेच्या २४ हजार १६० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या १८ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाला फक्त केवळ ६५.०५ लागल्याने ११ हजार ९३० विद्यार्थीच उत्तीर्ण झालेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे कल वाढल्याने कला, विज्ञान, वाणिज्य व संयुक्त शाखांच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या चांगलीच रोडावली, ही वस्तुस्थिती आहे.मंजूर जागांपेक्षा विद्यार्थी निम्मेआठही तालुक्यातील १३२ कनिष्ठ महाविद्यालयांत एकूण २४ हजार १६० जागांना मान्यता देण्यात आली आहे. परंतु, दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्याच निम्म्यापेक्षा कमी म्हणजे ११ हजार ९३० इतकी आहे. अशाही परिस्थितीत विद्यार्थ्यांनी आयटीआय, पॉलिटेक्निक व कृषी अभ्यासक्रमांकडे धाव घेतली आहे. अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एका वर्गात किमान ४० विद्यार्थी असणे शासन नियमानुसार आवश्यक असल्याने हेही विद्यार्थी आणायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही विद्यार्थी संख्या कायम ठेवण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांची शोध मोहीम सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेता येतो. परंतु, एकूण जागा आणि उपलब्ध विद्यार्थी संख्या लक्षात घेता शिक्षण विभागाने किमान मर्यादेत सवलत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय