शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

सामूहिक प्रयत्नातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती शक्य

By admin | Updated: May 20, 2017 02:13 IST

शेतकऱ्यांनी सामूहिक व वैविध्यपूर्ण शेतमाल उत्पादन निर्मिती व प्रक्रिया केल्यास शेतमालाचे मूल्यवर्धन होईल.

शैलेश नवाल : शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा लोकमत न्यूज नेटवर्क गिरड : शेतकऱ्यांनी सामूहिक व वैविध्यपूर्ण शेतमाल उत्पादन निर्मिती व प्रक्रिया केल्यास शेतमालाचे मूल्यवर्धन होईल. उत्पादक गटांना आर्थिक उन्नती साध्य करता येईल. या उद्देशाने शेतमाल उत्पादक कंपन्यांनी कार्य उभारावे. यात शासनाकडून लागणारी आवश्यक मदत करण्यात येईल. व्यक्तिगत कार्याचा विस्तार आता उत्पादक गटात रुपांतरीत करून शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केले. मगन संग्रहालय समिती येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यानंतर जिल्हाधिकारी नवाल यांनी शेतमाल प्रक्रिया उद्योगाचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी मोरे, गटविकास अधिकारी विजय लोंढे, नायब तहसीलदार सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजय हाडके, मंडळ कृषी अधिकारी धनविजय, विदर्भ नैसर्गिक शेतमाल उत्पादक कंपनीचे डॉ. एन. झेड. भिसेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी नवाल म्हणाले, शेतकऱ्यांनी समूहाच्या माध्यमातून शेतीला लागणाऱ्या निविष्ठा, अवजारे यांची सामूहिकरित्या खरेदी आणि वापर करावा. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळेल. शेतकऱ्यांनी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. शेतकऱ्यांची लुबाडणूक थांबविता येईल. यासाठी शेतकरी शेतमाल उत्पादक कंपन्यांची उभारणी महत्वाची आहे. शिवाय उत्पादित शेतमाल खरेदी विक्री करणे, प्रक्रिया करणे, बाजारपेठ मिळविल्यास हातभार लागेल. शेतकरी समूहाचा यात पुढाकार महत्वाचा आहे, असे ते पुढे म्हणाले. यानंतर नवाल यांनी कृषी विभागाच्यावतीने समुद्रपूर तालुक्यात करण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतील कामाचा आढावा घेतला. पाईकमारी, वाघेडा येथील रोहयोतील विहिरीच्या खोदकामाची पाहणी केली. दहेगाव येथील मशरूम उत्पादक केंद्राला भेट दिली. गिरड येथे मगन संग्रहालय समितीच्या नैसर्गिक शेती विकास प्रक्रिया विभागाची पाहणी केली. शैलेश भिसेकर यांनी मृदा परीक्षण शाळेविषयी माहिती दिली.