शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

हवेचा दाब वाढल्याने थंडी

By admin | Updated: November 21, 2015 02:24 IST

वातावरणातील दाबामुळे तापमानात चढउतार होतो. सद्य:स्थितीत हवेतील दाब वाढतीवर असल्याने थंडीला सुरुवात झाली आहे.

पारा घसरला : नोव्हेंबरमध्येच १५.६ पर्यंत घसरण श्रेया केने वर्धावातावरणातील दाबामुळे तापमानात चढउतार होतो. सद्य:स्थितीत हवेतील दाब वाढतीवर असल्याने थंडीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी तापमान १५.६ पर्यंत उतरले. आठवड्याभरापासून तापमानातील घटीमुळे थंडी जाणवत आहे. हवेतील दाब १ हजार १० मिलीबार पोहचल्याने तापमानात घट झाली. शिवाय आकाश स्वच्छ असल्याने वातावरणात गारवा जाणवत आहे. दक्षिण भारतात आलेल्या वादळामुळे राज्यातील हवामानावर याचा परिणाम होवू शकतो, असा अंदाज हवामानात तज्ज्ञांचा होता. दक्षिण भारतात वादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरण ढगाळ असून पाऊस पडत आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्यास ढगाळ वातावरण तयार होवून थंडीचे प्रमाण कमी झाले असते. मात्र हा कमी दाबाचा पट्टा अंदमानच्या दिशेने सरकल्याने ढगाळ वातावरणाचा धोका नाही. ढगाळ वातावरणामुळे पिकांवरही याचा विपरीत परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांन चिंंता व्यक्त होत होती मात्र सध्या हा धोका नसल्याने तज्ज्ञांनी सांगितले.महाराष्ट्र ते जम्मूपर्यंत आकाश निरभ्र असल्याने थंडी कायम जिल्ह्यातील तापमानात १३ नोव्हेंबरपासून घट जाणवत आहे. कमाल आणि किमान तापमान घसरल्याने थंडी जाणवायला लागली आहे. हवेतील ‘डिप्रेशन’मुळे सकाळच्या सुमारास वारा वाहतो. १८ नोव्हेंबरला किमान तापमान १५.६ पर्यंत खाली आल्याने थंडीची चाहुल लागली आहे. शिवाय कमी दाबाचा पट्टा दक्षिण दिशेने सरकल्याने महाराष्ट्र ते जम्मूपर्यंत आकाश निरभ्र असल्याची बाब उपग्रहाच्या छायाचित्रावरुन स्पष्ट झाली आहे. यामुळे थंडी कायम राहुन यात वाढ होईल असे दिसून येते.‘डिप्रेशन’मध्ये बदल होण्याची चिन्हे नाहीजिल्ह्यात साधारणत: १२ ते १५ नोव्हेंबरपासून थंडीला प्रारंभ होतो, असे आजवरचा नोंदीतून दिसून येते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात थंडीचा प्रकोप जाणवतो. उत्तरेत हिमवृष्टी झाल्यास कडाक्याची थंडी जाणवते. नोव्हेंबर महिन्यात थंडीची चाहुल जाणवायला लागते. वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असल्याने ‘डिप्रेशन’मध्ये बदल होण्याची चिन्हे नाही, अशी माहिती संबंधितांनी दिली.