शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

कपाशीवर कोळशाचा हल्ला

By admin | Updated: December 25, 2016 02:19 IST

तालुक्यातील शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, नापिकी व आर्थिक कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहे.

आर्वीतील शेतकरी चिंतेत : अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम आर्वी : तालुक्यातील शेतकरी आधीच नैसर्गिक आपत्ती, नापिकी व आर्थिक कर्जबाजारीपणामुळे त्रस्त आहे. असे असताना तालुक्यात अचानक वाढलेल्या थंडीने कपाशीवर कोळसा रोगाचे आक्रमण केले आहे. या रोगामुळे कपाशीचे झाड पूर्णत: काळे पडून वाकत असल्याचे चित्र तालुक्यातील शेत शिवारात आहे. कपाशी पिकावर आलेल्या या रोगाने शेतकरी धास्तावला असून यामुळे त्याच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. आर्वी तालुक्यात नगदी व एकरकमी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. प्रारंभी तालुक्यात कपाशी पिकावर लाल्याचे आक्रमण झाले. त्यापूर्वी अतिवृष्टीच्या फटक्यामुळे पिकाच्या उत्पादनावर विपरित झाला. यामुळे कपाशी पिकावरील बोंडे खाली गळून पडली तर पिकाची वाढ खुंटली. या संकटातून शेतकऱ्यांची सुटका होते न होते तोच कपाशीवर कोळसा रोगाने हल्ला चढविला आहे. या रोगामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीची झाडे पूर्णत: काळी पडली आहेत. तालुक्यातील वागदा, वाठोडा, अहिरवाडा, देऊरवाडा, लाडेगाव, कर्माबाद, सर्कसपूर, राजापूर, नांदपूर, टाकरखेडा, एकलारा, जळगाव, वर्धमनेरी, वाढोणा, पिंपळखुटा, गुमगाव, रोहणा, नांदोरा, नेरी, खुबगाव, धनोडी, रसुलाबाद, दहेगाव, निंबोली (शेंडे) सह तालुक्यातील इतर गावांतील शेत शिवारात या रोगाचे चित्र आहे. या रोगामुळे पीक काळे पडल्याने शेतकऱ्यांनी शेताकडे जाणे टाळणे सुरू केल्याचे दिसून आले आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न झाल्याने कपाशीवर शेतकऱ्यांची आशा होती. यातही या पिकावर कोळशासारख्या रोगाचे आक्रमण झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाने या रोगाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन उपाययोजना सुचविण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी) २३,६०० हेक्टरवरील पीक धोक्यात तालुक्यातील बेनोडा येथील रामेश्वर जवंजाळ, नारायण भागवत, राजेंद्र चव्हाण, प्रज्वल गावंडे, रवींद्र वानखेडे, उमेश एकापूरे, पद्माकर गावंडे, सतीश भागवत, ओंकार गावंडे, दशरथ डेहनकर, जर्नादन मेश्राम यांच्यासह या परिसरात असलेल्या बेनोडा, मारोडा या दोन्ही गावातील ९० हेक्टर शेतपिकांच्या कपाशीवर या कोळसा रोगाचे आक्रमण झाले आहे. यात झाडाची पाने काळी पडून ती वाळू लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यात आर्वी तालुक्यातील २३ हजार ६०० हेक्टरचे कपाशी पीक धोक्यात आले आहे.