शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

ढगाळ वातावरणाने हरभरा, तुरीवर संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सध्या तुरीचे पीक बहरले असून, हरभराही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण ...

ठळक मुद्देअळ्या पडण्याची भीती : फवारणीमुळे खर्चात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या तुरीचे पीक बहरले असून, हरभराही चांगल्या स्थितीत आहे. मात्र, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने या पिकांवर रोग पडण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.ढगाळ वातावरणाने तूर व हरभरा पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. तसेच फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. खरिपातील संकटातून सावरत नाही तोच नवे संकट शेतकºयापुढे उभे ठाकले आहे.सद्यस्थितीत पाने कुरतडणाºया अळीचा तूर पिकावर प्रादुर्भाव झाला असून, धुक्यामुळे फुलांची गळती होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. दोन दिवसांआड वातावरणात बदल होत असल्याने तुरीचे पीक संकटात आले आहे. ढगाळ वातावरण व धुक्यामुळे फुल गळती, पाने कुरतडणारे कीटक वाढले आहेत. तसेच अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरणामुळे सध्या बहरात आलेली तूर हातची जाण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी फुलांची मोठ्या प्रमाणात गळती होण्यास प्रारंभ झाला आहे. तसेच अळ्यांचा प्रादुर्भाव होण्यासही सुरुवात झाली आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणीच्या कामात व्यस्त असल्यामुळे तुरीकडे त्याचे लक्ष नसले तरी तुरीची पाहणी करून अळ्यांचा प्रादुर्भाव धोक्याची पातळी ओलांडणारा नाही ना, याची खात्री करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जर अळ्यांची पातळी धोकादायक असेल, तर कृषी विभागाच्यावतीने यासाठी फवारण्या करण्याचा सल्ला शेतकºयांना देण्यात येत आहे.या करा उपाययोजनासध्या तुरीचे पीक फुल व कळी येण्याच्या अवस्थेत आहे. येणाºया काळात शेंगा पोखरणाºया अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी क्लोरोपायरिफॉस १५ मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ५0 टक्के फुले व शेंगा असताना क्विनॉलफॉस २0 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दाणे भरताना शेंगा पोखरणाºया अळीसोबत शेंगमाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास इमामेक्टिन बॅझायेट चार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.शेतकºयांनी वातावरणातील बदल लक्षात घेता योग्य त्या उपाययोजना कराव्या, तसेच कृषी विभागाच्या अधिकाºयांचा सल्ला घेऊन फवारणी करावी. आगामी काळात अळ्यांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच दक्षता घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :weatherहवामानagricultureशेती