शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तूर खरेदी बंद

By admin | Updated: April 16, 2017 00:53 IST

तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट रोखण्याकरिता शासनाने तूर खरेदी केली.

एफसीआयची माघार : नाफेडबाबत संभ्रमावस्था वर्धा : तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट रोखण्याकरिता शासनाने तूर खरेदी केली. या खरेदीची शनिवारी (१५ एप्रिल) मुदत संपली. आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात ९३ हजार २३० क्विंटल तुरीची खरेदी झाल्याची नोंद आहे. शासकीय तूर खरेदी पुढे सुरू ठेवावी अशी शेतकऱ्यांची मागणी असताना भारतीय खाद्य निगमने तूर खरेदी करणार नसल्याचे जाहीर केले तर नाफेडकडून शेतकऱ्यांना आशा असताना सायंकाळपर्यंत त्यांच्याकडूनही वाढीव तारीख जाहीर झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी सुरू असलेल्या बाजार समितीत शेतकरी मुदत वाढ मिळण्याबाबत विचारणा करीत असल्याचे दिसून आले. तर ज्या केंद्रावर शेतकऱ्यांना टोकण देण्यात आले तिथे तूर खरेदी सुरू होती. बाजारात असलेल्या गर्दीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची तूर बाजारात आणली नाही. यामुळे आता त्यांना व्यापाऱ्यांशिवाय पर्याय नसल्याचे एकंदर चित्र आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे बोलत असलेल्या शासनाकडूनच विदर्भातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार असल्याचे काही शेतकरी बोलत होते. यातच भारतीय खाद्य निगमने हात वर केल्याने शेतकऱ्यांना नाफेडकडून आशा आहे. मात्र त्यांचीही आज मुदत संपणार आहे. तिच्या वाढीबाबत शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र तोही निर्णय आला नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हजार ते दीडहजार रुपयांचे नुकसान सहन करीत व्यापाऱ्यांना तूर विकल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा याकरिता शासकीय यंत्रणा म्हणून नाफेड आणि भारतीय खाद्य नियगमची निवड झाली. या दोन्ही यंत्रणेकडून कधी सुरू कधी बंद अशा अवस्थेत तुरीची खरेदी झाली. वर्धेत नाफेड आणि एफसीआयच्या ग्रेडरकडून तूर खरेदी सुरू झाली त्या काळापासूनच दोन्ही यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांकडून आक्षेप नोंदविण्यात आले. अशातच १५ मार्च रोजी शासकीय तूर खरेदीची अंतीम तारीख जवळ आली. यावेळी तूर उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात तुरी पडून असल्याने ही मुदत एक महिना वाढविण्यात आली. या महिन्यात शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी होईल, असे वाटत होते. मात्र शासकीय यंत्रणेची नित्याची कारणे, कधी कर्मचारी नाही तर कधी साधनांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रतीक्षा करणेच आले. परिणामी खरेदी मंदावली. यातच अखेरची तारीख आली. अनेक शेतकऱ्यांची तूर घरीच पडून आहे. यामुळे शासनाच्यावतीने तूर खरेदीची तारीख वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे.(प्रतिनिधी) खरेदी वादातच वर्धेत शासकीय यंत्रणा म्हणून एफसीआय आणि नाफेडच्यावतीने खरेदी सुरू करण्यात आली. यात एफसीआयच्यावतीने तीन केंद्रावरून तर नाफेडच्यावतीने पाच केंद्रांवरून तूर खरेदी केली. ही खरेदी कधी बारदाणा तर कधी कर्मचाऱ्यांच्या अरेरावीनेच चर्चेत राहिली. या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या अरेरावीच्या कारणामुळे शेतकऱ्यांना आंदोलनेही करावी लागली. त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचा नाकारलेला शेतमाल व्यापाऱ्यांकडून परत विकत घेण्याची किमया या नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी येथे करून दाखविली. वर्धा बाजार समितीत ४० ते ५० शेतकऱ्यांकडून विचारणा वर्धा बाजार समितीत गत काही दिवसांपासून एफसीआयची खरेदी बंद आहे. यामुळे ही खरेदी सुरू केव्हा होणार याची विचारणा करण्याकरिता सुमारे ४० ते ५० शेतकरी आल्याची माहिती समितीच्या सचिवांकडून मिळाली. ही विचारणा सुरू असताना १५ एप्रिलनंतर भारतीय खाद्य निगमकडून तुरीची खरेदी होणार नसल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा पणन विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना त्यांची तूर व्यापाऱ्यांना विकल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले आहे. शासनाच्या तूर खरेदीची मुदत १५ एप्रिलला संपत आहे. यात भारतीय खाद्य निगमने खरेदी बंद केल्याचे कळविले आहे; मात्र नाफेडकडून खरेदी सुरू ठेवावी अथवा थांबवावी, या संदर्भात कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत.- उमेश देशपांडे, जिल्हा पणन व्यवस्थापक, वर्धा