शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तूर खरेदी बंद

By admin | Updated: April 16, 2017 00:53 IST

तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट रोखण्याकरिता शासनाने तूर खरेदी केली.

एफसीआयची माघार : नाफेडबाबत संभ्रमावस्था वर्धा : तूर उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट रोखण्याकरिता शासनाने तूर खरेदी केली. या खरेदीची शनिवारी (१५ एप्रिल) मुदत संपली. आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात ९३ हजार २३० क्विंटल तुरीची खरेदी झाल्याची नोंद आहे. शासकीय तूर खरेदी पुढे सुरू ठेवावी अशी शेतकऱ्यांची मागणी असताना भारतीय खाद्य निगमने तूर खरेदी करणार नसल्याचे जाहीर केले तर नाफेडकडून शेतकऱ्यांना आशा असताना सायंकाळपर्यंत त्यांच्याकडूनही वाढीव तारीख जाहीर झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी सुरू असलेल्या बाजार समितीत शेतकरी मुदत वाढ मिळण्याबाबत विचारणा करीत असल्याचे दिसून आले. तर ज्या केंद्रावर शेतकऱ्यांना टोकण देण्यात आले तिथे तूर खरेदी सुरू होती. बाजारात असलेल्या गर्दीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची तूर बाजारात आणली नाही. यामुळे आता त्यांना व्यापाऱ्यांशिवाय पर्याय नसल्याचे एकंदर चित्र आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे बोलत असलेल्या शासनाकडूनच विदर्भातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा हा प्रकार असल्याचे काही शेतकरी बोलत होते. यातच भारतीय खाद्य निगमने हात वर केल्याने शेतकऱ्यांना नाफेडकडून आशा आहे. मात्र त्यांचीही आज मुदत संपणार आहे. तिच्या वाढीबाबत शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र तोही निर्णय आला नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना हजार ते दीडहजार रुपयांचे नुकसान सहन करीत व्यापाऱ्यांना तूर विकल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या तुरीला हमीभाव मिळावा याकरिता शासकीय यंत्रणा म्हणून नाफेड आणि भारतीय खाद्य नियगमची निवड झाली. या दोन्ही यंत्रणेकडून कधी सुरू कधी बंद अशा अवस्थेत तुरीची खरेदी झाली. वर्धेत नाफेड आणि एफसीआयच्या ग्रेडरकडून तूर खरेदी सुरू झाली त्या काळापासूनच दोन्ही यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर शेतकऱ्यांकडून आक्षेप नोंदविण्यात आले. अशातच १५ मार्च रोजी शासकीय तूर खरेदीची अंतीम तारीख जवळ आली. यावेळी तूर उत्पादकांकडे मोठ्या प्रमाणात तुरी पडून असल्याने ही मुदत एक महिना वाढविण्यात आली. या महिन्यात शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी होईल, असे वाटत होते. मात्र शासकीय यंत्रणेची नित्याची कारणे, कधी कर्मचारी नाही तर कधी साधनांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रतीक्षा करणेच आले. परिणामी खरेदी मंदावली. यातच अखेरची तारीख आली. अनेक शेतकऱ्यांची तूर घरीच पडून आहे. यामुळे शासनाच्यावतीने तूर खरेदीची तारीख वाढवावी अशी मागणी जोर धरत आहे.(प्रतिनिधी) खरेदी वादातच वर्धेत शासकीय यंत्रणा म्हणून एफसीआय आणि नाफेडच्यावतीने खरेदी सुरू करण्यात आली. यात एफसीआयच्यावतीने तीन केंद्रावरून तर नाफेडच्यावतीने पाच केंद्रांवरून तूर खरेदी केली. ही खरेदी कधी बारदाणा तर कधी कर्मचाऱ्यांच्या अरेरावीनेच चर्चेत राहिली. या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या अरेरावीच्या कारणामुळे शेतकऱ्यांना आंदोलनेही करावी लागली. त्याचा काही उपयोग झाला नसल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचा नाकारलेला शेतमाल व्यापाऱ्यांकडून परत विकत घेण्याची किमया या नाफेडच्या कर्मचाऱ्यांनी येथे करून दाखविली. वर्धा बाजार समितीत ४० ते ५० शेतकऱ्यांकडून विचारणा वर्धा बाजार समितीत गत काही दिवसांपासून एफसीआयची खरेदी बंद आहे. यामुळे ही खरेदी सुरू केव्हा होणार याची विचारणा करण्याकरिता सुमारे ४० ते ५० शेतकरी आल्याची माहिती समितीच्या सचिवांकडून मिळाली. ही विचारणा सुरू असताना १५ एप्रिलनंतर भारतीय खाद्य निगमकडून तुरीची खरेदी होणार नसल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हा पणन विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्यांना त्यांची तूर व्यापाऱ्यांना विकल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून आले आहे. शासनाच्या तूर खरेदीची मुदत १५ एप्रिलला संपत आहे. यात भारतीय खाद्य निगमने खरेदी बंद केल्याचे कळविले आहे; मात्र नाफेडकडून खरेदी सुरू ठेवावी अथवा थांबवावी, या संदर्भात कुठल्याही सूचना आलेल्या नाहीत.- उमेश देशपांडे, जिल्हा पणन व्यवस्थापक, वर्धा