शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

बसफेरी बंद केल्याने प्रवाश्यांचे हाल

By admin | Updated: March 7, 2016 01:59 IST

राज्य परिवहन महामंडळांतर्गत असलेल्या तळेगाव आगाराने तारासावंगा मार्गावरील बसफेरी बंद केली आहे.

आष्टी (शहीद) : राज्य परिवहन महामंडळांतर्गत असलेल्या तळेगाव आगाराने तारासावंगा मार्गावरील बसफेरी बंद केली आहे. विभागाला आर्थिक उत्पन्न देणारी बसफेरी बंद केल्याने याबाबत प्रवाश्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. आगार व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाचा फटका तारासावंगा, माणिकवाडा येथील प्रवाश्यांना सहन करावा लागत आहे. या मार्गावारील बसफेरी त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची प्रत पाठविली आहे. यावर कार्यवाहीकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. तळेगाव आगार अंतर्गत तळेगाव, आष्टी, साहुर, माणिकवाडा, तारासावंगाकरिता बस रात्री ७.४५ या वेळेत तळेगाव येथून सुटत होती. ही बस रुग्ण, शालेय विद्यार्थी यांना सोयीची होती. आष्टीपासून तारासावंगा हे गाव २५ किमी अंतरावर आहे; पण १५ दिवसांपूर्वी आगार व्यवस्थापक ढाणगे यांनी ही बसफेरी बंद केली. तसेच रात्रीच्या वेळेतील बस सकाळी ६ वाजता सुरू केली आहे. यावेळी प्रवासी संख्या कमी असते. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास विलंब होतो. येथील नागरिकांचे दिवसभराचे नियोजन या बसफेरीवर अवलंबून आहे; पण तळेगाव आगार व्यवस्थापकांना ही बाब सांगितली तरीही त्यांनी वेळेत बदल केला. ही बसफेरी शनिवार, रविवार व सणाच्या दिवशी बंद असते. या संदर्भात शाळकरी विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. त्यानंतर पुन्हा बस सुरू झाली होती; पण रात्रीची फेरी बंद करून समस्येत भर टाकली आहे. तारासावंगा येथील सरपंच रत्नपाल पाटील, माणिकवाडा सरपंच तारा खवशी यांनी १ मार्च रोजी तळेगाव आगार व्यवस्थापक यांच्यासमोर ठरावाद्वारे ही समस्या मांडली; पण अद्याप बसफेरी सुरू केली नाही. आठवडाभरात बसफेरी सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.(प्रतिनिधी)