शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

६ वर्षांत वर्धा जिल्ह्यातील सूतगिरण्या, साखर कारखाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 13:18 IST

विदर्भातील वर्धा जिल्ह्यात मागील सहा वर्षांत जवळपास ५ ते ७ उद्योग बंद पडल्याने १६ हजार कामगारांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली आहे.

ठळक मुद्दे१६ हजार कामगारांना फटकासरकारचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आदींच्या नावाखाली औद्योगिक विकास झाल्याचा दावा केंद्र सरकार करीत असले तरी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात मागील सहा वर्षांत जवळपास ५ ते ७ उद्योग बंद पडल्याने १६ हजार कामगारांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली आहे. या सर्व बाबींकडे केंद्र व राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे उद्योग क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. नागपूर पासून ७५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा जिल्ह्यात १५ वर्षांपूर्वी ५ एक्सप्लोझिव्ह कारखान्यांमध्ये १० हजार कामगार कार्यरत होते. याशिवाय, जिल्ह्यात २ सहकारी सूतगिरण्या व एका साखर कारखान्यात ५ हजार कामगार काम करीत होते. मात्र, या सूतगिरण्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे या कामगारांचाही रोजगार हिरावला गेला आहे.या उद्योगाच्या शेकडो एकरी जमीणी ओस पडल्या आहेत. काही जमिनींची विक्री करण्यात आली. मात्र, या उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे हित लक्षात घेण्यात आले नाही. सूतगिरण्या व साखर कारखाने हे राजकीय पुढाऱ्यांचे होते. यात सरकारचे भागभांडवल होते. हे उद्योग केवळ राजकीय लोकांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद झालेत. आज जिल्ह्यातील बेरोजगारांना दुसरी कोणतीही रोजगाराची संधी उपलब्ध राहिली नाही. त्यामुळे काही भूमिपुत्र पुन्हा शेती व्यवसायाकडे वळले आहेत. तर काही हे उद्योग सुरू होईल, अशी आशा बाळगून आहेत. यातील अनेक कामगारांचे पैसही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पडून आहेत. बँक बंद झाल्याने कामगार दुहेरी संकटात सापडले आहेत.वर्धा जिल्ह्यातील बंद उद्योगांची दारे उघडावी. दोनशे अमेरिकन कंपन्या चीन मधून भारतात येण्यास उत्सुक आहेत. वर्धा जिल्ह्यात बंद पडलेल्या उद्योगात त्यांना कार्य करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून, विदर्भातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.- सुधीर दंदे, सामाजिक कार्यकर्ते वर्धा

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने