शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

स्वच्छता अभियानात मिळणार मूल्यमापनानुसार गुण

By admin | Updated: November 2, 2016 00:40 IST

शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला होता.

प्रत्येक ग्रामपंचायतीला राबवावी लागणार स्वच्छग्राम स्पर्धासचिन देवतळे  विरूळ (आकाजी)शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला होता. अनेक गावे आरशासारखी स्वच्छता झाली होती; पण आता नव्या शासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी ग्रा.पं.ने केलेल्या मुल्यमापनाचे निकष शासनाने जाहीर केले आहेत. यामुळे प्रत्येक ग्रा.पं. ला या नियमांची जाण ठेवणे गरजेचे आहे.या स्पर्धेत शौचालय व्यवस्थापनाला ४० गुण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १० गुण, घनचकरा व्यवस्थापन ५ गुण, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन २० गुण, घर गाव परिसर स्वच्छतेला ५ गुण, वैयक्तिक स्वच्छता ५ गुण तसेच लोकसहभाग आणि सामूदायिक स्वयं-पुढाकारातून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला १० गुण दिले जाणार आहेत.पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनाला कमाल २० गुण आहेत. यामध्ये पाणी पुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असल्यास आणि पाणी पट्टी वसुलीचे प्रमाण १०० टक्के असल्यास दोन गुण मिळणार आहेत. ग्रामपंचायतीकडे स्व-निर्मिती आणि सुरक्षितता आराखडा असल्यास दोन गुण, गावात पाणी पुरवठा योजनेतून दिलेल्या घरगुती नळ जोडण्यांची संख्या ९१ ते १०० टक्के असल्यास दोन गुण मिळणार आहेत. गावातील एकूण सर्व पाणी पुरवठ्याच्या सुविधांमधून कुठेही पाणी गळती नसल्यास दोन गुण, ९९ टक्केच्या खाली असल्यास एक गुण देण्यात येणार आहे.वैयक्तिक स्वच्छतेसाठी पाच गुण ठेवण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांना आरोग्याच्या योग्य सवई, नागरिकांच्या योग्य सवईसाठी गुण दिले जाणार आहेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार नसणे यावर गुण दिले जाणार आहेत. लोकसहभागातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तसेच गावात गत पाच वर्षांत जातीय दंगल न झाल्यास, गावात अतिक्रमण नसल्यास यावरही योग्य गुण दिले जाणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. गावासाठी आणि गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने जर स्वच्छ अभियान स्पर्धा मन लावून आणि कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता राबविली तर प्रत्येक गाव आरोग्य संपन्न होईल, हे निश्चित!