शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

स्वच्छता अभियानात मिळणार मूल्यमापनानुसार गुण

By admin | Updated: November 2, 2016 00:40 IST

शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला होता.

प्रत्येक ग्रामपंचायतीला राबवावी लागणार स्वच्छग्राम स्पर्धासचिन देवतळे  विरूळ (आकाजी)शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला होता. अनेक गावे आरशासारखी स्वच्छता झाली होती; पण आता नव्या शासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी ग्रा.पं.ने केलेल्या मुल्यमापनाचे निकष शासनाने जाहीर केले आहेत. यामुळे प्रत्येक ग्रा.पं. ला या नियमांची जाण ठेवणे गरजेचे आहे.या स्पर्धेत शौचालय व्यवस्थापनाला ४० गुण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १० गुण, घनचकरा व्यवस्थापन ५ गुण, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन २० गुण, घर गाव परिसर स्वच्छतेला ५ गुण, वैयक्तिक स्वच्छता ५ गुण तसेच लोकसहभाग आणि सामूदायिक स्वयं-पुढाकारातून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला १० गुण दिले जाणार आहेत.पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनाला कमाल २० गुण आहेत. यामध्ये पाणी पुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असल्यास आणि पाणी पट्टी वसुलीचे प्रमाण १०० टक्के असल्यास दोन गुण मिळणार आहेत. ग्रामपंचायतीकडे स्व-निर्मिती आणि सुरक्षितता आराखडा असल्यास दोन गुण, गावात पाणी पुरवठा योजनेतून दिलेल्या घरगुती नळ जोडण्यांची संख्या ९१ ते १०० टक्के असल्यास दोन गुण मिळणार आहेत. गावातील एकूण सर्व पाणी पुरवठ्याच्या सुविधांमधून कुठेही पाणी गळती नसल्यास दोन गुण, ९९ टक्केच्या खाली असल्यास एक गुण देण्यात येणार आहे.वैयक्तिक स्वच्छतेसाठी पाच गुण ठेवण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांना आरोग्याच्या योग्य सवई, नागरिकांच्या योग्य सवईसाठी गुण दिले जाणार आहेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार नसणे यावर गुण दिले जाणार आहेत. लोकसहभागातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तसेच गावात गत पाच वर्षांत जातीय दंगल न झाल्यास, गावात अतिक्रमण नसल्यास यावरही योग्य गुण दिले जाणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. गावासाठी आणि गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने जर स्वच्छ अभियान स्पर्धा मन लावून आणि कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता राबविली तर प्रत्येक गाव आरोग्य संपन्न होईल, हे निश्चित!