शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

अभिजात संगीत हे प्राचीन असून संस्कृतीचे धरोहर

By admin | Updated: February 8, 2016 02:19 IST

अध्यात्म हे गाण्यातून दिसते. संतांचे बोल हे सर्व भक्तांपर्यंत पोहोचवितो, तो स्वधर्म होय.

अजित कडकडे : मुलाखतीतून उलगडला प्रवासहिंगणघाट : अध्यात्म हे गाण्यातून दिसते. संतांचे बोल हे सर्व भक्तांपर्यंत पोहोचवितो, तो स्वधर्म होय. याच भावनेतून मी स्वरांच्या माध्यमातून पोहोचवून ईश्वरसेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. अभिजात संगीत हे प्राचीन असून आमच्या संस्कृतीचे धरोहर आहे. यामुळे काळाच्या ओघात ते कधीच नष्ट होणार नाही, असा आशावाद सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमानिमित्त येथे आले असता ते चर्चा करीत होते. अध्यात्म क्षेत्राकडे कसे वळलात, याबाबत बोलताना ते म्हणाले, अध्यात्माची माझ्या घरी कोणती परंपरा नव्हती; पण वयाच्या सातव्या वर्षी नरसोबाच्या वाडीला दर्शनाला गेलो असता नदीच्या पात्रात वाहत गेलो. बेशुद्ध अवस्थेत मला बाहेर काढले. माझा तो पुनर्जन्म होता. दत्तप्रभुच्या कृपेने मला नवीन जीवन मिळाले. त्यानंतर २० वर्षे मी नरसोबाच्या वाडीला गेलो नाही; पण ज्यावेळी गेलो त्यावेळी दत्तप्रभूची पूर्ण कृपा माझ्यावर झाली. त्या अनामिक शक्तीने मी अध्यात्माकडे वळलो. भक्तिगीताच्या माध्यमातून केलेला स्वरांचा रियाज हा ईश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्ग आहे. प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. त्याच्याच आशीर्वादाने मी ३५ वर्षांपासून या संगीत क्षेत्रात वावरत आहे. जनतेचे प्रचंड प्रेम मला मिळत गेले. देश -विदेशात मी आजवर अनेक कार्यक्रम घेतले व श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक व्यक्तीने आंतरिक अनुसंधान जपले पाहिजे. जग जेवढे पैशाच्या मागे धावत आहे, तेवढे अनुसंधान कमी होत आहे. धावपळीच्या युगात अनुसंधानासाठी वेळ नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. आज अभिरूचिहीन गाणी येत आहे. त्यामुळे अभिजात संगीताला धोका निर्माण होऊ शकतो काय, यावर लाटा या क्षणिक असतात. त्यामुळे महासागराचे नुकसान होत नाही. दर पाच वर्षांनी नवीन फॅशन येते व जुनी कालबाह्य होते. आजही शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी तरूण पिढी पुढे येत आहे, ही समाधानाची बाब आहे. टीव्ही चॅनलेवरील ‘रिअ‍ॅलिटी शो’मुळे युवक-युवतींना प्लॅटफार्म मिळत आहे. यातील नौटंकी टीआरपीसाठी असते, तरी प्रतिभांना जन्म मिळाला, हे वास्तव असल्याचेही कडकडे म्हणाले.(तालुका प्रतिनिधी)