शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दहावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपाययोजना करण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथक तयार करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे७५ केंद्र सज्ज : १९ हजार ८६५ परीक्षार्थी प्रवेशित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी पूर्ण केली असून दहावीच्या परीक्षेकरिता जिल्ह्यातील आठही तालुक्यात एकूण ७५ परीक्षा केंद्र सज्ज आहे. या परीक्षा केंद्रावरुन १९ हजार ८६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.परीक्षा काळात गैरप्रकार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार उपाययोजना करण्यात येत आहे. कॉपीमुक्त परीक्षा राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात भरारी पथक तयार करण्यात आले आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये यापूर्वी दहावीच्या परीक्षेदरम्यान ज्या केंद्रावर गैरप्रकार आढळून आला तेथे बैठे पथकाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र परिसरात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार असून परीक्षेचे चित्रिकरणही केले जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मीटरपर्यंत कोणालाही फिरकता येणार नाही.सध्या बारावीची परीक्षा सुरु असून उद्यापासून दहावीचीही परीक्षा सुरु होत आहे. या दोन्ही परीक्षांची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर असल्याने शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या नेतृत्वात यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूणच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी प्रयत्न होणार असून विद्यार्थ्यांनीही वेळेच्या एक तासापूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता, दडपणहीशालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांकरिता व त्यांच्या पालकांना दहावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने पहिल्यांदाच विद्यार्थी शाळेबाहेरील परीक्षा केंद्रावर सर्व पेपर देण्यासाठी जात असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेसंदर्भात उत्सुकता आणि तितकेच दडपणही आहे. वर्षभरापासून परीक्षेची तयारी केली असताना आता तीन तासाच्या परीक्षेत कितपण यश मिळते. यावरच परीक्षेचा निकाल ठरणार आहे.सात भरारी पथकांची करडी नजरजिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी याकरिता सात भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी निरंतर शिक्षण, विशेष महिला भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या पथकाचा समावेश असून हे सातही पथक जिल्ह्यातील शाळांवर वॉच ठेवणार आहे. यासह तालुका पातळीवरही पथक नियुक्त करण्यात आले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी